शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

हिंजवडी, देहूगावसह आठ गावांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 01:36 IST

महापालिकेत हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे, सांगवडे, गहुंजे व देहूगाव- विठ्ठलनगर ही आठ गावे समाविष्ट करण्याच्या विषयाला सर्वसाधारण सभेत आज मंजुरी दिली.

पिंपरी : महापालिकेत हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे, सांगवडे, गहुंजे व देहूगाव- विठ्ठलनगर ही आठ गावे समाविष्ट करण्याच्या विषयाला सर्वसाधारण सभेत आज मंजुरी दिली. मात्र, १९९७ मध्ये समाविष्ट केलेल्या अठरा गावांनाच अद्याप न्याय देऊ शकलो नाही़ रस्ते, कचरा, आरोग्य आणि पाण्याची समस्या गंभीर आहे, अशातच नवीन सात गावे महापालिकेत समाविष्ट करू नयेत, अशी भूमिका मांडत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विरोध दर्शविला.पिंपरी महापालिकेने पुण्याच्या विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून ही गावे महापालिका हद्दीत समावेश करण्याविषयी सरकारडे उचित अहवाल सादर करण्याची विनंती केली होती़ नवी गावे समावेशाचा विषय महापालिका सभेसमोर सोमवारी आलो होता. विषय मंजुरीपूर्वी चर्चा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. भाजपातील नगरसेवकांनी आणखी समाविष्ट गावांच्या समावेशाबाबत सकारात्म मते व्यक्त केली, तर राष्टÑवादी काँग्रेस व शिवसेनेतून संमिश्र मते व्यक्त झाली.दत्ता साने म्हणाले, ‘‘अगोदरच्या समाविष्ट गावांना न्याय मिळाला नाही, मग आणखी गावे कशासाठी घेत आहोत. यास आमचा विरोध आहे. देहू -आळंदीही पूर्णपणे घ्यायला हवीत.’’ पंकज भालेकर म्हणाले, ‘समाविष्ट गावांत पाणी, रस्ते आरोग्य सुविधेची वाणवा आहे. मूलभूत सुविधाही सक्षमपणे पुरवल्या जात नाहीत. मग अट्टाहस कशासाठी?’’अजित गव्हाणे म्हणाले, ‘‘नवीन गावे समाविष्ट करताना यावर प्रशासनाचे म्हणणे काय आहे. त्या गावांतील नागरिकांचे म्हणणे काय आहे, त्यांचीही भूमिका महत्त्वाची आहे.’’ भाऊसाहेब भोईर म्हणाले, ‘‘नवी गावे घेण्याविषयी प्रशासन खेळ तर करीत नाही ना? विश्वस्त म्हणून आपली जबाबदारी आहे, प्रत्येकाने जबाबदारीने वागायला हवे.’’राहुल कलाटे म्हणाले, ‘‘समाविष्ट गावात आजही पाण्याची समस्या गंभीर आहे. आणखी नवीन गावे घेताना काय नियोजन करणार आहोत, हे महत्त्वाचे आहे.’’>खासदारांनी किती विकासकामे केली ?समाविष्ट गावातील रस्ते विकासात रिंग झाल्याचा आरोप खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला होता. आज त्याचे नाव न घेता भाजपा सदस्यांनी जोरदार टीका केली. यासंदर्भात झालेल्या चर्चेत सचिन चिखले, संदीप वाघेरे, रेखा दर्शिले, अश्विनी जाधव, सारिका सस्ते, माई ढोरे, मीनल यादव, राहुल जाधव, विकास डोळस आणि सुवर्णा बुरडे यांनी सहभाग घेतला. भाजपाच्या नगरसेवकांनी समाविष्ट गावांना निधी दिल्याने खासदारांना पोटशूळ झाला आहे. त्यांनी किती विकासकामे केली हे दाखवावे, अशी टीका केली. समाविष्ट गावांच्या विकासासाठी काहीही न करणाºया खासदारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करून निधी मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आणि विकासाला खोडा घालणाºया विरोधकांचा समाचारही घेतला.>नियोजनबद्ध विकास होणारस्थायी समिती सभापती सीमा सावळे म्हणाल्या, ‘‘समाविष्ट गावे महापालिकेत घेतल्यानंतर विकासासाठी वीस वर्षे वाट पहावी लागली. आम्ही समाविष्ट गावांना निधी दिला तर विरोधकांना त्रास होत आहे. नवी गावे महापालिकेत घ्यायची असतील, तर त्यांच्यासाठी आपणास निधी उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. आजपर्यंत फोकस करून कामे होत नव्हती ती आम्ही करीत आहोत.’’ सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘शहराचा सर्वांगिण विकास करायचा आहे. जुन्या समाविष्ट गावांचाही विकास सुरू आहे. नवीन गावे आली तर त्यांचाही विकास करू. नियोजन करू. समाविष्ट गावात आम्हाला दुसरे पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, आणि वाकड करायचे आहे.’’>महापालिकेची वाढीव हद्दपिंपरी-चिंचवड पालिका हद्दीच्या पश्चिमेकडील हिंजवडी, जांभे, माण, मारुंजी, नेरे, गहुंजे व सांगवडे ही सात गावे, तसेच महापालिका हद्दीच्या उत्तरेकडील इंद्रायणी नदीचे नैसर्गिक हद्दीपर्यंतचे देहूगाव- विठ्ठलनगर या गावांचे देहूरोड कॅन्टोन्मेंट क्षेत्र सोडून उर्वरित क्षेत्र पिंपरी महापालिकेत समाविष्ट करण्याबाबतचा पुनश्च राज्य सरकारकडे हद्दवाढीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड