शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

हिंजवडी, देहूगावसह आठ गावांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 01:36 IST

महापालिकेत हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे, सांगवडे, गहुंजे व देहूगाव- विठ्ठलनगर ही आठ गावे समाविष्ट करण्याच्या विषयाला सर्वसाधारण सभेत आज मंजुरी दिली.

पिंपरी : महापालिकेत हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे, सांगवडे, गहुंजे व देहूगाव- विठ्ठलनगर ही आठ गावे समाविष्ट करण्याच्या विषयाला सर्वसाधारण सभेत आज मंजुरी दिली. मात्र, १९९७ मध्ये समाविष्ट केलेल्या अठरा गावांनाच अद्याप न्याय देऊ शकलो नाही़ रस्ते, कचरा, आरोग्य आणि पाण्याची समस्या गंभीर आहे, अशातच नवीन सात गावे महापालिकेत समाविष्ट करू नयेत, अशी भूमिका मांडत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विरोध दर्शविला.पिंपरी महापालिकेने पुण्याच्या विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून ही गावे महापालिका हद्दीत समावेश करण्याविषयी सरकारडे उचित अहवाल सादर करण्याची विनंती केली होती़ नवी गावे समावेशाचा विषय महापालिका सभेसमोर सोमवारी आलो होता. विषय मंजुरीपूर्वी चर्चा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. भाजपातील नगरसेवकांनी आणखी समाविष्ट गावांच्या समावेशाबाबत सकारात्म मते व्यक्त केली, तर राष्टÑवादी काँग्रेस व शिवसेनेतून संमिश्र मते व्यक्त झाली.दत्ता साने म्हणाले, ‘‘अगोदरच्या समाविष्ट गावांना न्याय मिळाला नाही, मग आणखी गावे कशासाठी घेत आहोत. यास आमचा विरोध आहे. देहू -आळंदीही पूर्णपणे घ्यायला हवीत.’’ पंकज भालेकर म्हणाले, ‘समाविष्ट गावांत पाणी, रस्ते आरोग्य सुविधेची वाणवा आहे. मूलभूत सुविधाही सक्षमपणे पुरवल्या जात नाहीत. मग अट्टाहस कशासाठी?’’अजित गव्हाणे म्हणाले, ‘‘नवीन गावे समाविष्ट करताना यावर प्रशासनाचे म्हणणे काय आहे. त्या गावांतील नागरिकांचे म्हणणे काय आहे, त्यांचीही भूमिका महत्त्वाची आहे.’’ भाऊसाहेब भोईर म्हणाले, ‘‘नवी गावे घेण्याविषयी प्रशासन खेळ तर करीत नाही ना? विश्वस्त म्हणून आपली जबाबदारी आहे, प्रत्येकाने जबाबदारीने वागायला हवे.’’राहुल कलाटे म्हणाले, ‘‘समाविष्ट गावात आजही पाण्याची समस्या गंभीर आहे. आणखी नवीन गावे घेताना काय नियोजन करणार आहोत, हे महत्त्वाचे आहे.’’>खासदारांनी किती विकासकामे केली ?समाविष्ट गावातील रस्ते विकासात रिंग झाल्याचा आरोप खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला होता. आज त्याचे नाव न घेता भाजपा सदस्यांनी जोरदार टीका केली. यासंदर्भात झालेल्या चर्चेत सचिन चिखले, संदीप वाघेरे, रेखा दर्शिले, अश्विनी जाधव, सारिका सस्ते, माई ढोरे, मीनल यादव, राहुल जाधव, विकास डोळस आणि सुवर्णा बुरडे यांनी सहभाग घेतला. भाजपाच्या नगरसेवकांनी समाविष्ट गावांना निधी दिल्याने खासदारांना पोटशूळ झाला आहे. त्यांनी किती विकासकामे केली हे दाखवावे, अशी टीका केली. समाविष्ट गावांच्या विकासासाठी काहीही न करणाºया खासदारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करून निधी मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आणि विकासाला खोडा घालणाºया विरोधकांचा समाचारही घेतला.>नियोजनबद्ध विकास होणारस्थायी समिती सभापती सीमा सावळे म्हणाल्या, ‘‘समाविष्ट गावे महापालिकेत घेतल्यानंतर विकासासाठी वीस वर्षे वाट पहावी लागली. आम्ही समाविष्ट गावांना निधी दिला तर विरोधकांना त्रास होत आहे. नवी गावे महापालिकेत घ्यायची असतील, तर त्यांच्यासाठी आपणास निधी उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. आजपर्यंत फोकस करून कामे होत नव्हती ती आम्ही करीत आहोत.’’ सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘शहराचा सर्वांगिण विकास करायचा आहे. जुन्या समाविष्ट गावांचाही विकास सुरू आहे. नवीन गावे आली तर त्यांचाही विकास करू. नियोजन करू. समाविष्ट गावात आम्हाला दुसरे पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, आणि वाकड करायचे आहे.’’>महापालिकेची वाढीव हद्दपिंपरी-चिंचवड पालिका हद्दीच्या पश्चिमेकडील हिंजवडी, जांभे, माण, मारुंजी, नेरे, गहुंजे व सांगवडे ही सात गावे, तसेच महापालिका हद्दीच्या उत्तरेकडील इंद्रायणी नदीचे नैसर्गिक हद्दीपर्यंतचे देहूगाव- विठ्ठलनगर या गावांचे देहूरोड कॅन्टोन्मेंट क्षेत्र सोडून उर्वरित क्षेत्र पिंपरी महापालिकेत समाविष्ट करण्याबाबतचा पुनश्च राज्य सरकारकडे हद्दवाढीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड