शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

अवजड वाहतूक निगडीकरांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 23:51 IST

औद्योगिकरणाचा परिणाम : भक्ती-शक्ती चौकामध्ये मालवाहतूक गाड्यांची वर्दळ

निगडी : औद्योगिकरणाचा झपाट्याने होणारा विकास यामुळे देशी, परदेशी कंपन्या शहरात तसेच तळेगाव, चाकण, भोसरी एमआयडीसीमध्ये आपला पाया भक्कम करत आहेत. परंतु वाढत्या कंपन्यांबरोबरच मालवाहतूक करणारी वाहने व बेशिस्त वाहणाचालकांत मोठी वाढ झाली आहे. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरक्षित नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.निगडीतील भक्ती-शक्ती चौक, अंकुश चौक, त्रिवेणीनगर, टिळक चौक, दुर्गानगर चौकातून भोसरी, चाकण, तळवडे एमआयडीसीकडे

जाणाऱ्या कामगारांच्या व माल वाहतूक करणाºया वाहनांची मोठी वर्दळ असते. अतिशय वेगाने वाहने चालवणारे वाहनचालक आपल्या कंपनीत वेळेवर पोहोचण्यासाठी वाहनचालक वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत आहे. यामुळे चौका चौकांत उभे असणारे वाहतूक पोलिसांना अशा भरधाव वेगात चालवणाºया बेशिस्त वाहन चालकांशी सामना करावा लागत आहे. यामुळे या रस्त्यावरून रोजच प्रवास करणाºया नागरिक, विद्यार्थी व ज्येष्ठ मंडळींना बेशिस्त वाहतूक डोकेदुखी ठरते. रोजच किरकोळ अपघातांना सामोरे जावे लागत आहे.एमआयडीसी परिसरात भुरट्या चोºयांत वाढनिगडीतील ट्रान्सपोर्टनगर, चिंचवड, भोसरी, चाकण एमआयडीसीमध्ये काम करणाºया कामगारांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एमआयडीसी परिसरात रोजच भुरट्या चोºयांत वाढ झाली आहे. एमआयडीसीतील कंपनीचे कामकाज तीन शिफ्टमध्ये चालू असते़ दुपार शिफ्टमधील कामगारांची सुटी रात्री १२ ते १ च्या सुमारास होते़ यामुळे एमआयडीसी परिसरातून घरी परतत असलेल्या कामगारांना रस्त्यात अडविण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मोबाइल हिसकावणे, पाकिटातील पैसे काढून घेण्याचे प्रकार सध्या एमआयडीसी परिसरात होत आहे़ यामुळे एमआयडीसी परिसरातील कामगारांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. यामुळे एमआयडीसी परिसरात रात्रीच्या वेळेत पोलिसांच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी कामगार वर्गातून होत आहे. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड