शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
3
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
4
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
5
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
6
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
7
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
8
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
9
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
10
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
11
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
12
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
13
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
14
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
15
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
16
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
17
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
18
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
19
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
20
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता

हिंजवडीत समस्यांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 05:57 IST

हिंजवडी परिसरातील आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे अभियंते, तसेच अन्य कर्मचारी यांना मोठ्या रकमेचा पगार मिळत असल्याने त्यांचे रहाणीमानसुद्धा उंचावलेले असते.

पिंपरी : हिंजवडी परिसरातील आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे अभियंते, तसेच अन्य कर्मचारी यांना मोठ्या रकमेचा पगार मिळत असल्याने त्यांचे रहाणीमानसुद्धा उंचावलेले असते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अथवा खासगी बस सुविधा सक्षम नाही. त्यामुळे ते स्वत:ची चारचाकी घेऊन कंपनीत जाण्यास प्राधान्य देतात. दुचाकी घेऊन जाणाºयांना हेल्मेटशिवाय कंपनीत प्रवेश दिला जात नाही. हेल्मेटशिवाय गेल्यास कंपनीच्या प्रवेशद्वारावरच दुचाकी स्वत:च्या जोखमीवर ठेवावी लागते. त्यामुळे चारचाकी वापरणे हाच पर्याय ते निवडतात. परिणामी सकाळी कंपनीत जाण्याच्या वेळी आणि सायंकाळी कंपनी सुटतेवेळी हिंजवडी, वाकड रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी निर्माण होते. ही वाहतूककोंडी सद्या डोकेदुखी ठरू लागली आहे.हिंजवडी आयटीपार्कमध्ये काम करणारे अनेक जण बावधन, पाषाण, वाकड, ताथवडे, पिंपळेगुरव, पिंपळेसौदागर आणि सांगवी परिसरातील राहणारे आहेत. त्यामुळे आयटी कंपन्या सुटण्याच्या वेळी हिंजवडी, वाकड आणि मुंबई -बंगळुरू महामार्गावर ताथवडे, वाकड परिसरात मोटारींच्या रांगा लागतात. एवढेच नव्हे तर नेरे आणि मारुंजी या आतील भागातील गावठाण रस्त्यांवरही वाहतूककोंडीचा परिणाम जाणवतो. आयटी कंपन्यांची सुद्धा अभियंत्यांसाठी वाहन सुविधा आहे. दूर अंतरावर राहणारे कंपनीच्या बससेवेचा लाभ घेतात. तसेच खासगी वाहतूक सुविधा सुरक्षित नसल्याने अभियंता तरुणी कंपनीच्या बसचा वापर करतात. जवळपास राहाणारे आयटी अभियंते स्वत:च्या मोटारी घेऊन कंपनीत जातात. स्वत:च्या मोटारी वापरण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे हिंजवडीतील वाहतूक समस्येत आणखी भर पडली आहे.हिंजवडी व वाकड येथून मुंबई -बंगळुरू महामार्ग जातो. या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ आहे. वाकड पूल आणि हिंजवडी येथे सततच्या वाहतूककोंडीमुळे अपघात घडण्याचे प्रमाणही अधिक आहे. हा परिसर केवळ आयटीयन्सनाच नव्हे तर अन्य नागरिकांसाठीही असुरक्षित ठरू लागला आहे. येथील वाहतूककोंडी टाळायची असेल तर पर्यायी मार्गही नाही. हिंजवडी, वाकड, माण, मारुंजी या परिसरातून अंतर्गत रस्त्याने गेले तरी वाहनांची वर्दळ दिसून येते.वाहतूककोंडी टाळण्यासाठी सकाळी ७ ते ३ आणि दुपारी ३ ते रात्री ११ यावेळेत वाहतूक कर्मचारी तैनात असतात. याशिवाय सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत या हद्दीतील सर्वच सिग्नल बंद केले जातात. हातवारे करून वाहतुकीचे नियमन केले जाते. यावेळेत कारवाई करण्यास मुभा नाही. महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या चौकात अतिरिक्त कर्मचाºयांची नेमणूक असते. दुचाकीसाठी स्वतंत्र लेन असून बस आणि मोटारसाठीही वेगळा ट्रॅक आहे. मात्र आणखी एक स्वतंत्र लेन करण्यासाठी दीडशे कर्मचारी, ५ वॉर्डन आणि २५ जॅमरची अशी यंत्रणा गरजेची आहे. तशी मागणी वाहतूक विभागाकडे नोंदवली आहे.- दत्तात्रय पाटील, पोलीस निरीक्षक (हिंजवडी वाहतूक विभाग)