शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
4
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
5
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
6
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
7
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
8
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
9
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
10
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
11
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
12
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
13
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
14
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
15
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
16
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
18
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
19
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
20
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?

हिंजवडीत समस्यांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 05:57 IST

हिंजवडी परिसरातील आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे अभियंते, तसेच अन्य कर्मचारी यांना मोठ्या रकमेचा पगार मिळत असल्याने त्यांचे रहाणीमानसुद्धा उंचावलेले असते.

पिंपरी : हिंजवडी परिसरातील आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे अभियंते, तसेच अन्य कर्मचारी यांना मोठ्या रकमेचा पगार मिळत असल्याने त्यांचे रहाणीमानसुद्धा उंचावलेले असते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अथवा खासगी बस सुविधा सक्षम नाही. त्यामुळे ते स्वत:ची चारचाकी घेऊन कंपनीत जाण्यास प्राधान्य देतात. दुचाकी घेऊन जाणाºयांना हेल्मेटशिवाय कंपनीत प्रवेश दिला जात नाही. हेल्मेटशिवाय गेल्यास कंपनीच्या प्रवेशद्वारावरच दुचाकी स्वत:च्या जोखमीवर ठेवावी लागते. त्यामुळे चारचाकी वापरणे हाच पर्याय ते निवडतात. परिणामी सकाळी कंपनीत जाण्याच्या वेळी आणि सायंकाळी कंपनी सुटतेवेळी हिंजवडी, वाकड रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी निर्माण होते. ही वाहतूककोंडी सद्या डोकेदुखी ठरू लागली आहे.हिंजवडी आयटीपार्कमध्ये काम करणारे अनेक जण बावधन, पाषाण, वाकड, ताथवडे, पिंपळेगुरव, पिंपळेसौदागर आणि सांगवी परिसरातील राहणारे आहेत. त्यामुळे आयटी कंपन्या सुटण्याच्या वेळी हिंजवडी, वाकड आणि मुंबई -बंगळुरू महामार्गावर ताथवडे, वाकड परिसरात मोटारींच्या रांगा लागतात. एवढेच नव्हे तर नेरे आणि मारुंजी या आतील भागातील गावठाण रस्त्यांवरही वाहतूककोंडीचा परिणाम जाणवतो. आयटी कंपन्यांची सुद्धा अभियंत्यांसाठी वाहन सुविधा आहे. दूर अंतरावर राहणारे कंपनीच्या बससेवेचा लाभ घेतात. तसेच खासगी वाहतूक सुविधा सुरक्षित नसल्याने अभियंता तरुणी कंपनीच्या बसचा वापर करतात. जवळपास राहाणारे आयटी अभियंते स्वत:च्या मोटारी घेऊन कंपनीत जातात. स्वत:च्या मोटारी वापरण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे हिंजवडीतील वाहतूक समस्येत आणखी भर पडली आहे.हिंजवडी व वाकड येथून मुंबई -बंगळुरू महामार्ग जातो. या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ आहे. वाकड पूल आणि हिंजवडी येथे सततच्या वाहतूककोंडीमुळे अपघात घडण्याचे प्रमाणही अधिक आहे. हा परिसर केवळ आयटीयन्सनाच नव्हे तर अन्य नागरिकांसाठीही असुरक्षित ठरू लागला आहे. येथील वाहतूककोंडी टाळायची असेल तर पर्यायी मार्गही नाही. हिंजवडी, वाकड, माण, मारुंजी या परिसरातून अंतर्गत रस्त्याने गेले तरी वाहनांची वर्दळ दिसून येते.वाहतूककोंडी टाळण्यासाठी सकाळी ७ ते ३ आणि दुपारी ३ ते रात्री ११ यावेळेत वाहतूक कर्मचारी तैनात असतात. याशिवाय सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत या हद्दीतील सर्वच सिग्नल बंद केले जातात. हातवारे करून वाहतुकीचे नियमन केले जाते. यावेळेत कारवाई करण्यास मुभा नाही. महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या चौकात अतिरिक्त कर्मचाºयांची नेमणूक असते. दुचाकीसाठी स्वतंत्र लेन असून बस आणि मोटारसाठीही वेगळा ट्रॅक आहे. मात्र आणखी एक स्वतंत्र लेन करण्यासाठी दीडशे कर्मचारी, ५ वॉर्डन आणि २५ जॅमरची अशी यंत्रणा गरजेची आहे. तशी मागणी वाहतूक विभागाकडे नोंदवली आहे.- दत्तात्रय पाटील, पोलीस निरीक्षक (हिंजवडी वाहतूक विभाग)