शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

सरकार उद्योजकांचे; कामगारांचे नाही

By admin | Updated: November 18, 2016 04:41 IST

केंद्र सरकार कामगारांचे नसून, उद्योजकांचे आहे. तरी मागण्यासांठी कामगारांनी एकजुटीने सरकार विरोधात लढायला हवे, असे मत

पिंपरी : केंद्र सरकार कामगारांचे नसून, उद्योजकांचे आहे. तरी मागण्यासांठी कामगारांनी एकजुटीने सरकार विरोधात लढायला हवे, असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी निर्धार परिषदेत व्यक्त केले.पिंपरी-चिंचवड कष्टकरी कामगार पंचायत संघटनेतर्फे असंघटित कष्टकरी कामगारासांठी आयोजित निर्धार परिषदेत वैद्य बोलत होते. या वेळी व्यासपीठावर श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष भारत पाटणकर, विदर्भ रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर, कष्टकरी कामगार पंचायत संघटनेचे अध्यक्ष बाबा कांबळे यांच्यासह विदर्भ, मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र या भागातील विविध कामगार संघटनेचे अध्यक्ष उपस्थित होते. वैद्य म्हणाले, विविध क्षेत्रांतील कामगारांना आज दैनंदिन जीवन जगणेदेखील अवघड झाले आहे. अनेक वर्षांपासून मागणी असूनदेखील त्यांच्या घरांचा, नोकरीचा प्रश्न सुटलेला नाही. अशा प्रकारे एकीकडे कामगारांवर अन्याय होत असताना, दुसरीकडे मात्र, उद्योजकांना करामध्ये सवलती देण्यात येत आहेत. त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात येत आहेत. सरकारने चलनातून हजार -पाचशेच्या नोटा रद्द केल्याने, याचा सर्वाधिक परिणाम सर्वसामान्यांना भोगावा लागत आहे. सकाळपासूनच नागरिक त्यांच्याकडील तुटपुंजी रक्कम बदलण्यासाठी बँकांसमोर रांगा लावत आहेत. या रांगेमध्ये टाटा, बिर्ला, नसून, गरीब माणूसच असल्याने हे कसले अच्छे दिन आले?. घरांच्या किमती वाढल्याने कोणी फुटपाथवर, तर कोणी झोपडीत राहत आहे. औषधांच्या किमती वाढल्याने उपचार करणे अवघड झाले आहे. शिक्षणासाठी लाखो रुपये डोनेशन लागत असल्याने कामगारांना मुलांना शिकवणेही कठीण झाले आहे. नोकरी मिळणे अवघड झाले असून, मिळाली तर ती कायमस्वरुपाची मिळत नाही. शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. मागण्या मान्य करण्यासाठी एकजुटीने येऊन लढा दिल्यावरच मागण्यांचा विचार होणार असल्याचेही वैद्य यांनी सांगितले. (प्रतिनिधी)