शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

सरकार उद्योजकांचे; कामगारांचे नाही

By admin | Updated: November 18, 2016 04:41 IST

केंद्र सरकार कामगारांचे नसून, उद्योजकांचे आहे. तरी मागण्यासांठी कामगारांनी एकजुटीने सरकार विरोधात लढायला हवे, असे मत

पिंपरी : केंद्र सरकार कामगारांचे नसून, उद्योजकांचे आहे. तरी मागण्यासांठी कामगारांनी एकजुटीने सरकार विरोधात लढायला हवे, असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी निर्धार परिषदेत व्यक्त केले.पिंपरी-चिंचवड कष्टकरी कामगार पंचायत संघटनेतर्फे असंघटित कष्टकरी कामगारासांठी आयोजित निर्धार परिषदेत वैद्य बोलत होते. या वेळी व्यासपीठावर श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष भारत पाटणकर, विदर्भ रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर, कष्टकरी कामगार पंचायत संघटनेचे अध्यक्ष बाबा कांबळे यांच्यासह विदर्भ, मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र या भागातील विविध कामगार संघटनेचे अध्यक्ष उपस्थित होते. वैद्य म्हणाले, विविध क्षेत्रांतील कामगारांना आज दैनंदिन जीवन जगणेदेखील अवघड झाले आहे. अनेक वर्षांपासून मागणी असूनदेखील त्यांच्या घरांचा, नोकरीचा प्रश्न सुटलेला नाही. अशा प्रकारे एकीकडे कामगारांवर अन्याय होत असताना, दुसरीकडे मात्र, उद्योजकांना करामध्ये सवलती देण्यात येत आहेत. त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात येत आहेत. सरकारने चलनातून हजार -पाचशेच्या नोटा रद्द केल्याने, याचा सर्वाधिक परिणाम सर्वसामान्यांना भोगावा लागत आहे. सकाळपासूनच नागरिक त्यांच्याकडील तुटपुंजी रक्कम बदलण्यासाठी बँकांसमोर रांगा लावत आहेत. या रांगेमध्ये टाटा, बिर्ला, नसून, गरीब माणूसच असल्याने हे कसले अच्छे दिन आले?. घरांच्या किमती वाढल्याने कोणी फुटपाथवर, तर कोणी झोपडीत राहत आहे. औषधांच्या किमती वाढल्याने उपचार करणे अवघड झाले आहे. शिक्षणासाठी लाखो रुपये डोनेशन लागत असल्याने कामगारांना मुलांना शिकवणेही कठीण झाले आहे. नोकरी मिळणे अवघड झाले असून, मिळाली तर ती कायमस्वरुपाची मिळत नाही. शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. मागण्या मान्य करण्यासाठी एकजुटीने येऊन लढा दिल्यावरच मागण्यांचा विचार होणार असल्याचेही वैद्य यांनी सांगितले. (प्रतिनिधी)