शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

पुरेसे पाणी मिळावे, वाहतूक व्हावी सुरळीत

By admin | Updated: January 12, 2017 02:50 IST

महेशनगर, वायसीएम हॉस्पीटल, संत तुकारामनगर, वल्लभनगर मिळून पिंपरीमधील मध्यवर्ती ठिकाण असणारा

पिंपरी : महेशनगर, वायसीएम हॉस्पीटल, संत तुकारामनगर, वल्लभनगर मिळून पिंपरीमधील मध्यवर्ती ठिकाण असणारा प्रभाग २० बनला आहे. महाविद्यालये, हॉस्पिटल, उद्यान, शौचालये, अग्निशामक केंद्र अशा अनेक सुविधांनी पुरक असा हा प्रभाग आहे. प्रभागाला भेडसावणारी मोठी समस्या म्हणज पाणीटंचाई आाहे. प्रभागात व्यावयायिकांचे प्रमाण जास्त आहे. जागोजागी खाद्यपदार्थांच्या टपऱ्या, स्टॉल लागलेले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचा वापर जास्त प्रमाणात होतो. या सर्व कारणांमुळे त्या ठिकाणील निवासी क्षेत्रास पाणी कमी प्रमाणात मिळते. शाळा, कॉलेज आणि हॉस्पिटलमुळे प्रभागात व्यावसायिकांची चलती आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने टपऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, तेथील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. याचा दुप्षरिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. वायसीएम ते डी. वाय. पाटील या रस्त्यावर सतत वाहतूककोंडी होत असते. विशेषत: सकाळी आणि संध्याकाळी कोंडी जास्त पहायला मिळते. महेशनगर येथील चौकात नियमबाह्य पद्धतीने रिक्षा उभ्या केल्या जात असल्याने वाहतूककोंडी होते. रिक्षाचालक बेकायदेशीर रीत्या बस स्थानकाजवळ रिक्षा उभे करताना  सर्रास आढळतात. या प्रभागातील कारंज्याजवळ सतत अनाधिकृत फ्लेक्स लावलेले असतात, त्यामुळेत्या कारंज्याची ओळख संपुष्टात येऊ लागली आहे, असे येथील नागरिकांचे मत आहे. पिंपरी ते काळेवाडी रस्ता हा गर्दीचा रस्ता आहे. या ठिकाणी कित्येकदा वाहकुकींच्या नियमाचे उल्लंघन होताना दिसून येते. उपाययोजना करुन प्रभागातील समस्या सोडविण्याची नागरिकांची मागणी आहे. (प्रतिनिधी)महेशनगर येथे सार्वजनिक शौचालयाची संख्या कमी आहे. पाणी पुराशा प्रमाणात येत नाही . गेल्या २ महीन्यापासून पाण्याचे मीटर बसवले आहे, परंतू त्याना प्रत्येक महीन्याचे बील आले नाही यामुळे त्यांना एकत्र बील भरणे गैरसोयीचे होईल. त्यामुळे पाण्यासाठी घराबाहेर वारंवार पडावे लागत आहे.- भगवान माने, महेशनगर

पिंपरी-काळेवाडी रस्त्यावर नेहमी गर्दी दिसून येत असते. या ठिकाणी रस्ता हा छोटा असल्यानेही गर्दी होत असते. तसेच अनेक चालक मनमानी करतात. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक पोलिसाची नेमणूक करणे गरजेचे आहे. शाळेजवळील रस्त्यांवर वेग मर्यादेचे चिन्हे लावल्यास अपघाताची शक्यता कमी होईल. - शालिनी तिवारी, पिंपरी या परीसरात गेल्या काही काळात उद्यान, शौचालय योग्य ती सोय झाली आहे. रस्त्यांची सुव्यवस्था असल्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रश्न निर्माण होत नाही. रस्त्याचे सुशोभिकरणही झाले आहे. परिसरात दोन मोठे हॉस्पीटल तसेच उद्याने, महाविद्यालये यामुळे परिसरास महत्त्व मिळाले आहे. - संतोष अभंग, संत तुकाराम नगर