शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

महासभेचा प्रस्ताव बासनात, अनधिकृत बांधकाम शास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 02:15 IST

महापालिका सर्वसाधारण सभेने अनधिकृत बांधकाम शास्ती माफीसंदर्भात केलेला प्रस्ताव महापालिका प्रशासनाने सरकारकडे पाठविला नसल्याची बाब सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी उघडकीस आणली आहे.

पिंपरी - महापालिका सर्वसाधारण सभेने अनधिकृत बांधकाम शास्ती माफीसंदर्भात केलेला प्रस्ताव महापालिका प्रशासनाने सरकारकडे पाठविला नसल्याची बाब सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी उघडकीस आणली आहे.पिंपरी-चिंचवड शहरात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना अनियमित बांधकामे नियमित व्हावीत संपूर्ण शास्तीकर माफ व्हावा, यासाठी मागण्यांबाबत विरोधी पक्षातील भाजप-शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. याच मुद्यावर आमदार लक्ष्मण जगताप यांनी राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीत खासदार श्रीरंग बारणे व विधानसभा निवडणुकीत आमदार लक्ष्मण जगताप, गौतम चाबुकस्वार, महेश लांडगे यांना निवडून दिले. सन २०१७ महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या ३ नगरसेवकांवरून ७७ नगरसेवक निवडून देऊन सत्तापरिवर्तन घडविले. अनियमित बांधकामांना शास्ती आकारण्याबाबत जानेवारी २०१७ ला महाराष्ट्र शासनाने अध्यादेश जारी केला होता. मात्र या अध्यादेशाला मंत्रिमंडळाची मंजुरी नव्हती. दि. २९ मे २०१८ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मंजुरी दिली. पिंपरी-चिंचवड शहरात ४ लाख ८६ हजार ७१५ मालमत्ता आहेत़ त्यापैकी ३ लाख १३ हजार ८५ बांधकामे नियामित आहेत. तर तब्बल १ लाख ७६ हजार ४८८ बांधकामे अवैध आहेत. या अवैध मालमत्तांना २०१२ पासून शास्ती लागू आहे. गेल्या ६ वर्षांपासून महापालिकेने १५०.१२ कोटी रुपयांचा शास्तीकर वसूल केला आहे. तर ४८५.२३ कोटी शास्तीची थकबाकी आहे. सहाशे चौ. फू. पर्यंतची ३२ हजार ७७४ आहेत. याचा कर माफ होणार आहे. तर ६०१ ते १००० च्या पुढील अवैध बांधकामे १९ हजार २५८ आहेत या बांधकामांना निम्मा शास्तीकर आकारण्यात येणार आहे, तर १००१ चौरस फुटाच्या पुढील १७ हजार ९१५ मालमत्ता आहेत. म्हणजेच दुप्पट शास्ती लागू करण्यात येणार होता.मंत्रिमंडळाच्या मंजुरी नंतरही पूर्वीप्रमाणेच सर्वसामान्य नागरिकांना भूर्दंड पडणार आहे. सर्वसाधारण सभेत चर्चा होऊन १००० चौ. फू़ पर्यंतच्या घरांना शंभर टक्के शास्तीकर माफ करावा, असा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्याचा ठराव सभागृहातील सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमताने मंजूर केला होता. या ठरवानुसार महापालिका आयुक्त व प्रशासनानी तसा प्रस्ताव शासनाच्या विचारार्थ पाठविणे आवश्यक होते़ मात्र सर्वसाधारण सभेचा ठराव बासनात गुंढाळून ठेवलाआहे. अध्यादेशाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी, अशा आशयाचा प्रस्ताव पाठविल्याचे भापकर यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या