शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

आपत्ती व्यवस्थापनासाठी मिळेना पूर्णवेळ अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 03:47 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पूरनियंत्रण आराखडा तयार केला आहे. आपत्तीनिवारणासाठी महापालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही, यासाठी पूर्णवेळ अधिकारी गेल्या अनेक वर्षांपासून मिळालेला नाही. दर सहा महिन्यांना मानधन तत्त्वावर निवड केली जात आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पूरनियंत्रण आराखडा तयार केला आहे. आपत्तीनिवारणासाठी महापालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही, यासाठी पूर्णवेळ अधिकारी गेल्या अनेक वर्षांपासून मिळालेला नाही. दर सहा महिन्यांना मानधन तत्त्वावर निवड केली जात आहे.शहरातून इंद्रायणी, पवना आणि मुळा या तीन नद्या वाहतात. पावसाळा सुरू असल्याने अतिवृष्टी झाल्यास किंवा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यास नदीकाठच्या भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण होते. संभाव्य महापालिकेने मुख्य प्रशासकीय इमारतीत पूरनियंत्रण आपत्ती निवारण कक्ष सुरू केला असून,आठ प्रभाग कार्यालयांतही कक्षाची स्थापना केली. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग व अग्निशामक विभागाच्या वतीने पूर नियंत्रण आराखडा तयार केला आहे.चार महिन्यांचे नियोजनपावसाळ्यात सप्टेंबरपर्यंत आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी नियोजन केले आहे. मुख्य इमारतीमध्ये मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्षाची आणि आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये देखील पूरनियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे.संक्रमण ठिकाणे निश्चितनदीकाठच्या नागरिकांना मदत करण्यासाठी संक्रमण ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी अत्यावश्यक सोयीसुविधा पुरविण्याबाबत क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.साहित्यही सज्जअग्निशामक विभागही सज्ज असून त्यांनी पूर नियंत्रण साहित्यतयार ठेवले आहे. त्यामध्येलाइफ रिंंग्ज, लाइफ जॅकेट, रबरबोट, रोप, गळ, विमोचन साहित्य, मोठी दोरी, जवानांची पथके तयार आहेत. मध्यवर्ती कक्षातून पवनाधरण व मुळशी धरण येथीलपाण्याची पातळी व होणारा विसर्ग याची माहिती नियमितपणे घेतली जाणार आहे. स्थलांतरित करावयाची व्यवस्था क्षेत्रीय कार्यालय स्तरावर केली आहे.ही आहे पूरस्थितीची ठिकाणेपवना नदीकाठावरील माता रमाबाई, भाटनगर, बौद्धनगर, केशवनगर, मोरया गोसावी मंदिर परिसर, पिंपळे गुरव परिसर, बोपखेल गावठाण, पिंपरी, संजय गांधीनगर, रहाटणीमधीलमधुबन सोसायटी, संगमनगर, ममतानगर, दापोडी बौद्धविहार, स्मशानभूमी, नदीकाठचा परिसर, पवनावस्ती परिसर आदी परिसरात पाणी शिरते. त्यामुळे या भागात अधिक दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत. पूरबाधित नागरिकांना महापालिकेच्या निवास, भोजन व पाणी आदी सुविधा पुरविल्या जाणार आहेत.मनुष्यबळ अपूर्णआपत्तीनिवारण विभाग नावापुरताच आहे. या विभागाला पुरेशी जागाही नाही. तसेच स्वतंत्र मनुष्यबळ नाही. अधिकाºयाची नियुक्तीही पूर्णवेळ केली जात नाही. दर सहा महिन्यांनी नवीन करार केला जातो. या विभागासाठी माहिती असणारा स्वतंत्र अधिकारी असणे गरजेचे आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड