शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती व्यवस्थापनासाठी मिळेना पूर्णवेळ अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 03:47 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पूरनियंत्रण आराखडा तयार केला आहे. आपत्तीनिवारणासाठी महापालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही, यासाठी पूर्णवेळ अधिकारी गेल्या अनेक वर्षांपासून मिळालेला नाही. दर सहा महिन्यांना मानधन तत्त्वावर निवड केली जात आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पूरनियंत्रण आराखडा तयार केला आहे. आपत्तीनिवारणासाठी महापालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही, यासाठी पूर्णवेळ अधिकारी गेल्या अनेक वर्षांपासून मिळालेला नाही. दर सहा महिन्यांना मानधन तत्त्वावर निवड केली जात आहे.शहरातून इंद्रायणी, पवना आणि मुळा या तीन नद्या वाहतात. पावसाळा सुरू असल्याने अतिवृष्टी झाल्यास किंवा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यास नदीकाठच्या भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण होते. संभाव्य महापालिकेने मुख्य प्रशासकीय इमारतीत पूरनियंत्रण आपत्ती निवारण कक्ष सुरू केला असून,आठ प्रभाग कार्यालयांतही कक्षाची स्थापना केली. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग व अग्निशामक विभागाच्या वतीने पूर नियंत्रण आराखडा तयार केला आहे.चार महिन्यांचे नियोजनपावसाळ्यात सप्टेंबरपर्यंत आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी नियोजन केले आहे. मुख्य इमारतीमध्ये मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्षाची आणि आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये देखील पूरनियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे.संक्रमण ठिकाणे निश्चितनदीकाठच्या नागरिकांना मदत करण्यासाठी संक्रमण ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी अत्यावश्यक सोयीसुविधा पुरविण्याबाबत क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.साहित्यही सज्जअग्निशामक विभागही सज्ज असून त्यांनी पूर नियंत्रण साहित्यतयार ठेवले आहे. त्यामध्येलाइफ रिंंग्ज, लाइफ जॅकेट, रबरबोट, रोप, गळ, विमोचन साहित्य, मोठी दोरी, जवानांची पथके तयार आहेत. मध्यवर्ती कक्षातून पवनाधरण व मुळशी धरण येथीलपाण्याची पातळी व होणारा विसर्ग याची माहिती नियमितपणे घेतली जाणार आहे. स्थलांतरित करावयाची व्यवस्था क्षेत्रीय कार्यालय स्तरावर केली आहे.ही आहे पूरस्थितीची ठिकाणेपवना नदीकाठावरील माता रमाबाई, भाटनगर, बौद्धनगर, केशवनगर, मोरया गोसावी मंदिर परिसर, पिंपळे गुरव परिसर, बोपखेल गावठाण, पिंपरी, संजय गांधीनगर, रहाटणीमधीलमधुबन सोसायटी, संगमनगर, ममतानगर, दापोडी बौद्धविहार, स्मशानभूमी, नदीकाठचा परिसर, पवनावस्ती परिसर आदी परिसरात पाणी शिरते. त्यामुळे या भागात अधिक दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत. पूरबाधित नागरिकांना महापालिकेच्या निवास, भोजन व पाणी आदी सुविधा पुरविल्या जाणार आहेत.मनुष्यबळ अपूर्णआपत्तीनिवारण विभाग नावापुरताच आहे. या विभागाला पुरेशी जागाही नाही. तसेच स्वतंत्र मनुष्यबळ नाही. अधिकाºयाची नियुक्तीही पूर्णवेळ केली जात नाही. दर सहा महिन्यांनी नवीन करार केला जातो. या विभागासाठी माहिती असणारा स्वतंत्र अधिकारी असणे गरजेचे आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड