शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

मृत्यूच्या दाढेतून प्रवास, खापरे ओढा पूल केव्हाही कोसळण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 02:55 IST

सांगवी-वडगाव मावळ रस्त्यातील खापरे ओढ्यावरील पूल शेवटच्या घटका मोजत आहे. या अतिधोकादायक पुलाच्या दुरुस्तीअभावी ग्रामस्थांचा मृत्यूच्या दाढेतून प्रवास सुरू आहे. या पुलाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

वडगाव मावळ - सांगवी-वडगाव मावळ रस्त्यातील खापरे ओढ्यावरील पूल शेवटच्या घटका मोजत आहे. या अतिधोकादायक पुलाच्या दुरुस्तीअभावी ग्रामस्थांचा मृत्यूच्या दाढेतून प्रवास सुरू आहे. या पुलाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग कधी येणार, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. या अतिधोकादायक पुलावरून वाहतूक सुरू आहे. त्यामुळे पूल कोसळण्याच्या अवस्थेत असून, तो कोसळल्यास सांगवी गावचा संपर्क तुटून ग्रामस्थांना पर्यायी मार्ग उरणार नाही.मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव शहराला जोडणाºया सांगवी रस्त्यातील खापरे ओढ्यावरील पुलाचे दगडी बांधकाम पुणे जिल्हा परिषदेने ५५ वर्षांपूर्वी केले. या पुलाची अनेक वेळा तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती. या पुलाचे संरक्षक कठडे तुटले असून, पुलाचा बराच भाग खचला आहे. पूल कधीही कोसळून भीषण अपघात होण्याची भीती आहे.पुलावरून विद्यार्थी, कामगार, दुग्ध व्यावसायिक, शेतकरी व ग्रामस्थांच्या दुचाकी व चारचाकींची वर्दळ सुरू असते. पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने या गावाचा संपर्क तुटतो. काही विद्यार्थी व ग्रामस्थ जीव धोक्यात घालून वाहत्या पाण्यातून ये-जा करतात.रस्ता खड्डेमय : पुढाºयांकडून केवळ आश्वासनपावसाळ्यात रस्ता मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने रस्ता खड्डेमय झाला आहे. निवडणूक काळात केवळ पूल दुरुस्तीच्या घोषणांचे आश्वासन पुढारी देतात. महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल वाहून गेल्याने मावळ तालुक्यातील ब्रिटिशकालीन व धोकादायक पुलांच्या सुरक्षेच्या धर्तीवर या पुलाची केवळ प्रशासनाकडून पाहणी करून अवजड वाहने जाण्यास मज्जाव केल्याचा सूचनाफलक लावला आहे. मात्र, या फलकाकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. यामुळे दिवसेंदिवस या पुलाची अवस्था जीर्ण झाली असून, हा अतिधोकादायक पूल कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. पुलाच्या दुरुस्तीसाठी वारंवार ग्रामस्थ प्रशासनाकडे मागणी करीत असून, केवळ त्यांच्या पदरी निराशा पडत आहे. गैरसोय होत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी आहे. जीवितहानी झाल्यावरच पुलाची दुरुस्ती करणार का, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या