शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूच्या दाढेतून प्रवास, खापरे ओढा पूल केव्हाही कोसळण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 02:55 IST

सांगवी-वडगाव मावळ रस्त्यातील खापरे ओढ्यावरील पूल शेवटच्या घटका मोजत आहे. या अतिधोकादायक पुलाच्या दुरुस्तीअभावी ग्रामस्थांचा मृत्यूच्या दाढेतून प्रवास सुरू आहे. या पुलाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

वडगाव मावळ - सांगवी-वडगाव मावळ रस्त्यातील खापरे ओढ्यावरील पूल शेवटच्या घटका मोजत आहे. या अतिधोकादायक पुलाच्या दुरुस्तीअभावी ग्रामस्थांचा मृत्यूच्या दाढेतून प्रवास सुरू आहे. या पुलाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग कधी येणार, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. या अतिधोकादायक पुलावरून वाहतूक सुरू आहे. त्यामुळे पूल कोसळण्याच्या अवस्थेत असून, तो कोसळल्यास सांगवी गावचा संपर्क तुटून ग्रामस्थांना पर्यायी मार्ग उरणार नाही.मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव शहराला जोडणाºया सांगवी रस्त्यातील खापरे ओढ्यावरील पुलाचे दगडी बांधकाम पुणे जिल्हा परिषदेने ५५ वर्षांपूर्वी केले. या पुलाची अनेक वेळा तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती. या पुलाचे संरक्षक कठडे तुटले असून, पुलाचा बराच भाग खचला आहे. पूल कधीही कोसळून भीषण अपघात होण्याची भीती आहे.पुलावरून विद्यार्थी, कामगार, दुग्ध व्यावसायिक, शेतकरी व ग्रामस्थांच्या दुचाकी व चारचाकींची वर्दळ सुरू असते. पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने या गावाचा संपर्क तुटतो. काही विद्यार्थी व ग्रामस्थ जीव धोक्यात घालून वाहत्या पाण्यातून ये-जा करतात.रस्ता खड्डेमय : पुढाºयांकडून केवळ आश्वासनपावसाळ्यात रस्ता मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने रस्ता खड्डेमय झाला आहे. निवडणूक काळात केवळ पूल दुरुस्तीच्या घोषणांचे आश्वासन पुढारी देतात. महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल वाहून गेल्याने मावळ तालुक्यातील ब्रिटिशकालीन व धोकादायक पुलांच्या सुरक्षेच्या धर्तीवर या पुलाची केवळ प्रशासनाकडून पाहणी करून अवजड वाहने जाण्यास मज्जाव केल्याचा सूचनाफलक लावला आहे. मात्र, या फलकाकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. यामुळे दिवसेंदिवस या पुलाची अवस्था जीर्ण झाली असून, हा अतिधोकादायक पूल कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. पुलाच्या दुरुस्तीसाठी वारंवार ग्रामस्थ प्रशासनाकडे मागणी करीत असून, केवळ त्यांच्या पदरी निराशा पडत आहे. गैरसोय होत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी आहे. जीवितहानी झाल्यावरच पुलाची दुरुस्ती करणार का, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या