शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

अपेक्षा दमदार पावसाची

By admin | Updated: July 9, 2015 02:36 IST

पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी सकाळपासून किवळे, गहुंजे, सांगवडे परिसरात पावसाच्या हलक्या व तुरळक सरींनी अधूनमधून हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

किवळे : पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी सकाळपासून किवळे, गहुंजे, सांगवडे परिसरात पावसाच्या हलक्या व तुरळक सरींनी अधूनमधून हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. भात व खरिपातील इतर पिकांसाठी हा पाऊस पोषक असला, तरी आणखी पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.मोठ्या विश्रांतीनंतर देहूरोड, किवळे, रावेत, मामुर्डी, गहुंजे व सांगवडे भागात बुधवारी सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी येत होत्या. बुधवारी सायंकाळपर्यंत पडलेल्या हलक्या पावसाने भुईमूग, कडधान्ये, भातरोपांना काहीसा दिलासा दिला आहे. मध्यंतरीच्या उघडिपीने भुईमूग, घेवडा, मूग, पावटा या पिकांची पेरणी केलेले शेतकरी चिंतेत होते. नदीच्या अगर विहिरीच्या पाण्याची सोय असलेल्या काही मोजक्या शेतकऱ्यांची भातलागवड झाली असून, पाण्याची सोय नसणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातील भातरोपे जळू लागली होती. हा पाऊस पिकांसाठी अनुकूल असला, तरी दमदार पाऊस आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रामुख्याने उशिरा भातलागवड करण्यासाठी बहुतांश शेतकरी दमदार पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. भातरोपांचे नुकसानशिवणे : पवन मावळात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने काही शेतकऱ्यांचे भातरोपांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भातखाचरे कडक उन्हाने पार करपून गेली आहेत. पुढील काही दिवसांत पाऊस पडला नाही, तर शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहणार आहे. नदीशेजारील शेतात शेतकऱ्यांनी मोटारीच्या साहाय्याने पाणी सोडून पिके वाचविण्याचा प्रयत्न केला. (वार्ताहर)