शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

सत्तेची गणिते जुळविण्यासाठी कसरत

By admin | Updated: August 8, 2015 00:34 IST

मावळ तालुक्यात ४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी झाली. आॅगस्टअखेर ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुका होणार असल्याने

महादेव वाघमारे, वडगाव मावळमावळ तालुक्यात ४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी झाली. आॅगस्टअखेर ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुका होणार असल्याने ग्रामपंचायतीवर आपल्याच पक्षाची सत्ता आणण्यासाठी पक्षाचे राजकीय नेते ग्रामपंचायतीमध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठी सदस्यांचे गणित जुळविण्यासाठी कसरत करत आहेत.निवडणुका गावकी व भावकीच्या जोरावर स्थानिक पॅनलच्या वतीने निवडणुका लढविल्या गेल्या. यात कोणत्याही उमेदवाराने राजकीय पक्षाच्या चिन्हावर ग्रामपंचायत निवडणुका लढविल्या नाही. तरी, पक्षाचे राजकीय नेते मावळ तालुक्यात आमच्या पक्षाचे उमेदवार सर्वाधिक निवडून आले आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा व लोकसभा निवडणुका भवितव्य ग्रामपंचायतीवरील वर्चस्वावर असते. ग्रामपंचायतीवर सत्ता कायम राहण्यासाठी आजी-माजी सदस्यांनी आरक्षण जागेचा विचार करता त्यांच्याच घरातील उमेदवार निवडून आणले आहे. केवळ सरपंच व उपसरपंचपद मिळविण्यासाठी बहुमत सिद्ध करण्यासाठी माजी सदस्य व राजकीय नेते प्रत्येक सदस्याला पदाचे व पैशाचे आमिष दाखवून पाठिंबा मिळवत आहेत. काही ग्रामपंचायतींत सत्ता काबीज करण्यासाठी एकाच सदस्याची आवश्यकता आहे. अशा ग्रामपंचायतींच्या सदस्याला पद व मोठ्या रकमेचे आमिष दिले जात आहे. काही राजकीय नेत्यांनी अशा महत्त्वाच्या सदस्याला काबीज करून त्यांना अनाथ स्थळी ठेवल्याची चर्चा आहे. निवडणुकीच्या अगोदर २४ तास मोबाईल चालू ठेवणारे व मतदाराला सतत दर्शन देणाऱ्या उमेदवारांचे मतमोजणीनंतर फोन बंद असून, त्यांचा शोध मतदार घेत आहे. कुणबीच्या दाखल्याने ओबीसी जागांवर आजी-माजी सदस्यांच्या महिला व मुलांची बाजी असून, ५० टक्के महिलाराज व तरुणाईचा सहभाग वाढल्याने ग्रामपंचायती निवडणुकीत चैतन्य आल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी घराणेशाही सुरू असल्याचे दिसत आहे.निवडणुकीत आश्वासन देणारे विजयी उमेदवार निवडणूक संपल्यावर ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. बहुमताचे गणित जुळविताना विजयी सदस्य मिळत नसल्याने त्या सदस्यांच्या नातेवाइकाच्या घरी राजकीय नेते चकरा मारत असून, तेथे नसल्याचे समजल्यास राजकीय नेते निराश होत आहेत. सत्ता आमची असल्याचा दावा करणाऱ्या काही नेत्यांच्या हातून सत्ता बहुमताचे गणित न जुळल्याने हातून निसटत आहेत. सरपंच व उपसरपंच निवडणुकीपर्यंत विजयी सदस्यांची मनधरणी करताना नेत्यांना कसरत करावी लागत आहे.विजयी सदस्याचा काही तास फोन बंद असल्यास नेते त्याच्या घरी पोहोचत आहेत. त्यास कोणी आमिष दाखवून परिवर्तन करणार नाही, यासाठी पाहिजे ती मदत करण्याचे आश्वासन देण्यात येत आहे.