शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

न्यायालय आदेशामुळे दहीहंडी आयोजकांमध्ये उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 03:54 IST

वर्षांहून लहान वयाच्या बालगोविंदांना बंदी घालण्याची हमी राज्य सरकारने दिल्यानंतर उच्च न्यायालयाने दहीहंडीच्या थरांवरील २० फुटांच्या उंचीचे बंधनही मागे घेतले आहे.

पिंपरी : १४ वर्षांहून लहान वयाच्या बालगोविंदांना बंदी घालण्याची हमी राज्य सरकारने दिल्यानंतर उच्च न्यायालयाने दहीहंडीच्या थरांवरील २० फुटांच्या उंचीचे बंधनही मागे घेतले आहे. त्यामुळे आयोजकांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख दहीहंडी उत्सव आयोजकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे आम्ही स्वागतच करतो. या आदेशामुळे यंदाच्या दहीहंडी उत्सवात आणखीच रंगत येणार आहे. न्यायालयाने निर्बंध हटवले असले, तरी पथक आणि आयोजकांनी गोपाळांच्या सुरक्षेबाबत कोणतीही कसर सोडता कामा नये. सुरक्षेला प्राधान्य देऊन उत्सव साजरा करणार आहोत. तसेच शासनाकडून आलेले आदेशही पाळण्यात यावेत.त्यामुळे सणांचा उत्साह कायम राहील.दहीहंडीसारख्या पारंपरिक उत्सवावर कठोर निर्बंध असल्यामुळे तरुणांमध्ये नाराजी होती. मात्र, काल न्यायालयाने निर्बंध हटविल्यामुळे गोपाळ पथक आणि आयोजकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या त्या आयोजकांनी आणि पथकांनी सुरक्षेबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे. तसेच उत्सवादरम्यान काही अनुचित घडणार नाही, यासाठी तत्पर असणे गरजेचे आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर चैैतन्य निर्माण झाले असले, तरी सुरक्षेबाबत हयगय नको.न्यायालयाच्या आदेशाचे निश्चित स्वागत आहे. सुरक्षेबाबत पथकांनी आणि आयोजकांनी आपापल्या परिने काळजी घेणे अपेक्षित आहे. पथकांनी सुरक्षा साधनांबाबतही जागरूक राहावे. दहीहंडी उत्सवावेळी लाऊड स्पीकरच्या आवाजाबाबत काही बाबींची अद्याप स्पष्टता नाही. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर यंदाच्या दहीहंडी उत्सवात चैैतन्य येणार हे नक्की आहे. - राजू मिसाळउच्च न्यायालयाने सोमवारी दहीहंडीवरील निर्बंध उठवले. या निर्णयाकडे मी सकारात्मक दृष्टिकोनातूनच पाहतो. मात्र, आयोजकांनी दहीहंडीच्या ठिकाणी सुरक्षेबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवल्या पाहिजेत. जेणेकरून काही अपघात झालाच, तर लगेच परिस्थिती नियंत्रणात आणता येईल. एकंदरीत आयोजक आणि पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उत्सव साजरा करीत असताना तो निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी योग्य त्या उपाययोजना राबविण्यात यावे.थरांचे निर्बंध उठविल्याचा आनंदच आहे. परंपरागत सणांवर असे निर्बंध असूच नयेत. त्यामुळे तो साजरा करताना उत्साह मावळतो. मात्र, यंदा न्यायालयाच्या आदेशाने आनंदाचे वातावरण नक्क ी निर्माण होईल. शक्यतो गोविंदा पथकातील गोविंदा प्रशिक्षित असतात. त्यामुळे अपघाताची शक्यता नसते. क्वचित अपघात झालाच, तर आयोजकांनीही आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवावी. सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. - संदीप कस्पटे