शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

संरक्षण उद्योग सक्षम करा

By admin | Updated: April 21, 2016 00:41 IST

परेदशातून साहित्याची खरेदी बंद करून संरक्षण उद्योग सक्षम करून तेथेच त्याची निर्मिती करावी. यामुळे देशात रोजगार वाढून बेरोजगारी कमी होईल

खडकी : परेदशातून साहित्याची खरेदी बंद करून संरक्षण उद्योग सक्षम करून तेथेच त्याची निर्मिती करावी. यामुळे देशात रोजगार वाढून बेरोजगारी कमी होईल, असे मत भारतीय मजदूर संघाचे (बीएमएस) राष्ट्रीय अध्यक्ष बैद्यनाथ राय यांनी केले आहे. भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाचे १७वे त्रैवार्षिक अधिवेशन खडकीतील आलेगावकर विद्यालयात बुधवारी सुरू झाले. उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर संघाचे उपाध्यक्ष के. एन. शर्मा, साधू सिंह, भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाचे अध्यक्ष नरेंद्र तिवारी, सचिव एम. पी. सिंह, देहूरोड आॅर्डनन्स फॅक्टरीचे सरव्यवस्थापक आर. के. तिवारी, संजय श्रीवास्तव आदी उपस्थित होते. राय म्हणाले, ‘‘राष्ट्रीय हित लक्षात घेऊन संरक्षण उद्योगात देशी उत्पादनास चालना दिली जावी. राष्ट्र सक्षम झाले, तर कामगार स्वावलंबी होतील. देशभक्तीवर आधारित समाज घडविण्याचे कार्य संघटना करीत आहे.’’ सध्या सुरू असलेल्या ‘भारतमाता की जय’चा वादावर ते म्हणाले, ‘‘कम्युनिस्ट पक्षाची विचारधारा रशिया व चीन येथील कामगार चळवळीच्या विचारधारेशी मिळतीजुळती आहे. कम्युनिस्ट विचारधारा अंगीकारल्याने त्यांची देशातील विचारधारेच्या प्रवाहाच्या विरोधात भूमिका दिसून येते.बापट म्हणाले, ‘‘केंद्र सरकार कामगार प्रश्नांबाबत सकारात्मक आहे. अनुकंपा आधारित जाचक अटी शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सातवे वेतन आयोग लवकरच लागू केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नियोजनामुळे यापुढे कामगारांना त्यांच्या हक्कासाठी लढावे लागणार नाही. चर्चा करून अनेक प्रश्न सोडवले जातील. संरक्षण क्षेत्रात काम करणारे कामगार हे सीमेवर लढणाऱ्या सैनिकांइतकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे या सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी बांधिल आहोत.’’ नरेंद्र तिवारी म्हणाले, ‘‘पुण्यातील सांस्कृतिक भूमीत होणारे हे अधिवेशन राष्ट्राला नवी चालना देणारी आहे. देश अधिकाधिक मजबूत होण्याचे काम अधिवेशनातून होणार आहे.’’ (प्रतिनिधी)