शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ‘या’ गावांत पोहोचली वीज; मुलभूत सुविधांची मात्र वानवाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 15:52 IST

कामशेत पासून सुमारे सोळा किलोमीटर अंतरावर असलेल्या नाणे मावळातील अतिदुर्गम भागात स्वातंत्र्य काळापासून अनेक मूलभूत सुविधांची वानवा आहे.

ठळक मुद्देनाणे ते नाणोलीपर्यंत पक्का रस्ता असून त्या पुढे दहा किलोमीटर कच्चा रस्तासुशिक्षित तरुणांनी एकत्र येऊन वीज आणण्यासाठी मागील काही वर्षांपासून केली मेहनत

कामशेत : कामशेत पासून सुमारे सोळा किलोमीटर अंतरावर असलेल्या नाणे मावळातील अतिदुर्गम भागात स्वातंत्र्य काळापासून अनेक मूलभूत सुविधांची वानवा आहे. येथे जाण्यासाठी नाणे ते नाणोलीपर्यंत पक्का रस्ता असून त्या पुढे दहा किलोमीटर कच्चा रस्ता आहे. या रस्त्याचे काम आजपर्यंत झाले नाही. सात वर्षांपूर्वी पवन चक्की प्रकल्प उभा राहिला त्यावेळी हा कच्चा रस्ता बनवण्यात आला होता. तोच अजूनही सुरू आहे. या वस्त्यांमध्ये वीज नाही. मात्र गावातील सुशिक्षित तरुणांनी एकत्र येऊन आपल्या भागात वीज आणण्यासाठी मागील काही वर्षांपासून अतोनात मेहनत घेत अनेकांचे उंबरे झिजवले. त्यांच्या या मेहनतीला यश आले असून काही दिवसांपूर्वी गावात वीज पोहचली असल्याने त्यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे.नाणे मावळातील डोंगर माथ्यावर असणाऱ्या आठ धनगर वाड्या असून पूर्ण वाड्या मिळून १७० कुटुंब येथे राहतात. या आठ वाड्या ह्या प्रत्येकी वेगवेगळ्या ग्रामपंचायतीत समाविष्ट आहेत. परंतु आतापर्यंत कोणत्याही ग्रामपंचायतीने या वाड्यांना मूलभूत सुविधा पुरवण्याचे कष्ट घेतले नाही. येथील नागरिकांचा फक्त निवडणुकीसाठीच विचार केला जातो. मतदानापुरताच येथे स्थानिक राजकिय कार्यकर्ते उपस्थित राहून आश्वासन द्यायचे ते फक्त आश्वासनच रहायचे परंतु कुठलाच विकास या वाड्यांचा करू शकले नाही.यातील करंजगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मोरमारवाडी पठार धनगर वस्ती भागात वीज आली असून याचप्रमाणे इतर भागात लवकरच वीज येणार असल्याची माहिती मिळाली आहे. यावर काही स्थानिक सुशिक्षित तरुणांनी पुढे येऊन सामाजिक कर्तव्य समजून आपल्या धनगर वाड्यांना सुविधा मिळाल्या पाहिजे, या उद्देशाने आमदार बाळा भेगडे यांच्या नावाने निवेदन तयार करून ते त्यांना दिले. लवकरच या सुविधा पोहचू असे आश्वासन त्यांनी दिले व त्यानंतर त्यांनी महावितरण कंपनीला सर्व्हे करण्यास सांगितले. यावर महावितरण कंपनीच्या लोकांनी स्थानिक लोकांची मदत घेत सर्व्हे केला व त्याचे इस्टमेंट बनवून मंजुरीसाठी पाठवले त्यावर स्थानिक तरुणांनी सतत आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे यांच्याकडे व महावितरण कंपनीकडे पाठपुरावा केला यावर आमदार बाळा भेगडे यांनी येथील सुविधा  वंचित असलेल्या वाड्यांची स्थिती पाहता तेथील पहिल्या टप्प्या साठी मोरमारवाडी येथील पठारावरील धनगर वाडीला डीपीडीसी स्कीममधून थ्री फेज लाईट मंजूर करून पहिल्या टप्याचे काम चालू केले आहे तेथील पूर्ण लाईन ओढून झाली आहे.

या वाड्यांच्या वतीने सतत पाठपुरावा करण्यासाठी नामदेव शेडगे, दत्ता आखाडे, विठ्ठल शेडगे, भाऊ शेडगे यांनी मेहनत घेतली तर आमदारांच्या वतीने नितीन गाडे यांनी सतत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून मोलाचे सहकार्य त्यांनी केले. या शिवाय माऊ ची मोरमारवाडी ते डोंगरवाडी सटवाई वाडी या भागात खासदार निधीतून रस्त्याचे काम सुरू आहे. हा रस्ता पठारावरील मोरमारवाडी पठार, वडेश्वर पठार, उकसान पठार, पाले पठार, कुसवली पठार, कांबरे पठार, शिरदे पठार, कुसुर पठार आदी वस्त्यांपर्यंत करावा, अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी आहे.

टॅग्स :kamshetकामशेतpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड