शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ‘या’ गावांत पोहोचली वीज; मुलभूत सुविधांची मात्र वानवाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 15:52 IST

कामशेत पासून सुमारे सोळा किलोमीटर अंतरावर असलेल्या नाणे मावळातील अतिदुर्गम भागात स्वातंत्र्य काळापासून अनेक मूलभूत सुविधांची वानवा आहे.

ठळक मुद्देनाणे ते नाणोलीपर्यंत पक्का रस्ता असून त्या पुढे दहा किलोमीटर कच्चा रस्तासुशिक्षित तरुणांनी एकत्र येऊन वीज आणण्यासाठी मागील काही वर्षांपासून केली मेहनत

कामशेत : कामशेत पासून सुमारे सोळा किलोमीटर अंतरावर असलेल्या नाणे मावळातील अतिदुर्गम भागात स्वातंत्र्य काळापासून अनेक मूलभूत सुविधांची वानवा आहे. येथे जाण्यासाठी नाणे ते नाणोलीपर्यंत पक्का रस्ता असून त्या पुढे दहा किलोमीटर कच्चा रस्ता आहे. या रस्त्याचे काम आजपर्यंत झाले नाही. सात वर्षांपूर्वी पवन चक्की प्रकल्प उभा राहिला त्यावेळी हा कच्चा रस्ता बनवण्यात आला होता. तोच अजूनही सुरू आहे. या वस्त्यांमध्ये वीज नाही. मात्र गावातील सुशिक्षित तरुणांनी एकत्र येऊन आपल्या भागात वीज आणण्यासाठी मागील काही वर्षांपासून अतोनात मेहनत घेत अनेकांचे उंबरे झिजवले. त्यांच्या या मेहनतीला यश आले असून काही दिवसांपूर्वी गावात वीज पोहचली असल्याने त्यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे.नाणे मावळातील डोंगर माथ्यावर असणाऱ्या आठ धनगर वाड्या असून पूर्ण वाड्या मिळून १७० कुटुंब येथे राहतात. या आठ वाड्या ह्या प्रत्येकी वेगवेगळ्या ग्रामपंचायतीत समाविष्ट आहेत. परंतु आतापर्यंत कोणत्याही ग्रामपंचायतीने या वाड्यांना मूलभूत सुविधा पुरवण्याचे कष्ट घेतले नाही. येथील नागरिकांचा फक्त निवडणुकीसाठीच विचार केला जातो. मतदानापुरताच येथे स्थानिक राजकिय कार्यकर्ते उपस्थित राहून आश्वासन द्यायचे ते फक्त आश्वासनच रहायचे परंतु कुठलाच विकास या वाड्यांचा करू शकले नाही.यातील करंजगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मोरमारवाडी पठार धनगर वस्ती भागात वीज आली असून याचप्रमाणे इतर भागात लवकरच वीज येणार असल्याची माहिती मिळाली आहे. यावर काही स्थानिक सुशिक्षित तरुणांनी पुढे येऊन सामाजिक कर्तव्य समजून आपल्या धनगर वाड्यांना सुविधा मिळाल्या पाहिजे, या उद्देशाने आमदार बाळा भेगडे यांच्या नावाने निवेदन तयार करून ते त्यांना दिले. लवकरच या सुविधा पोहचू असे आश्वासन त्यांनी दिले व त्यानंतर त्यांनी महावितरण कंपनीला सर्व्हे करण्यास सांगितले. यावर महावितरण कंपनीच्या लोकांनी स्थानिक लोकांची मदत घेत सर्व्हे केला व त्याचे इस्टमेंट बनवून मंजुरीसाठी पाठवले त्यावर स्थानिक तरुणांनी सतत आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे यांच्याकडे व महावितरण कंपनीकडे पाठपुरावा केला यावर आमदार बाळा भेगडे यांनी येथील सुविधा  वंचित असलेल्या वाड्यांची स्थिती पाहता तेथील पहिल्या टप्प्या साठी मोरमारवाडी येथील पठारावरील धनगर वाडीला डीपीडीसी स्कीममधून थ्री फेज लाईट मंजूर करून पहिल्या टप्याचे काम चालू केले आहे तेथील पूर्ण लाईन ओढून झाली आहे.

या वाड्यांच्या वतीने सतत पाठपुरावा करण्यासाठी नामदेव शेडगे, दत्ता आखाडे, विठ्ठल शेडगे, भाऊ शेडगे यांनी मेहनत घेतली तर आमदारांच्या वतीने नितीन गाडे यांनी सतत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून मोलाचे सहकार्य त्यांनी केले. या शिवाय माऊ ची मोरमारवाडी ते डोंगरवाडी सटवाई वाडी या भागात खासदार निधीतून रस्त्याचे काम सुरू आहे. हा रस्ता पठारावरील मोरमारवाडी पठार, वडेश्वर पठार, उकसान पठार, पाले पठार, कुसवली पठार, कांबरे पठार, शिरदे पठार, कुसुर पठार आदी वस्त्यांपर्यंत करावा, अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी आहे.

टॅग्स :kamshetकामशेतpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड