शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

‘त्या’ इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करा!

By admin | Updated: December 22, 2015 01:15 IST

पूर्णानगर येथील मीरा हाइट्सच्या इमारतीची तपासणी करण्याचे व स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचा आदेश महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी दिला.

पिंपरी : पूर्णानगर येथील मीरा हाइट्सच्या इमारतीची तपासणी करण्याचे व स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचा आदेश महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी दिला. सीमाभिंत पाडून ती पूर्णपणे नव्याने बांधण्याचा आदेशही बांधकाम व्यावसायिकाला देण्यात आला. महापालिकेचे आयुक्त जाधव व प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव यांनी इमारतीची पाहणी केली. ही इमारत राहण्यायोग्य आहे का नाही, हे ठरविण्यात येणार आहे. मातीचा भराव खचल्याने पूर्णानगर येथील मीरा हाइट्स या इमारतीची सीमाभिंत शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास कोसळली. त्यामुळे इमारतीला धोका निर्माण झाला असून, प्राधिकरणाने रहिवाशांना घर खाली करण्यास सांगितले होते. या भागात खाणी व नाले बुजवून इमारती उभ्या केल्या आहेत. त्यामुळे जमीन खचण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. वर्षभरातील ही दुसरी घटना आहे. या इमारतीच्या तळात मुरमाऐवजी मातीचा भराव टाकला आहे. या इमारतीत १२ सदनिका आहेत. या वेळी प्राधिकरणाचे उपसंचालक एम. वाय. देवडे, धैर्यशील खैरे, नगरसेवक दत्ता साने व अजय सायकर उपस्थित होते.चिखली, पूर्णानगर, शिवतेजनगर हा संपूर्णत: खाणी व नाल्यांचा परिसर आहे. बिल्डर लॉबीने प्राधिकरणाकडून जमिनी खरेदी केल्या. या खाणीत दगड, मातीचा भराव टाकून बहुमजली इमारती उभ्या केल्या. मातीच्या भरावामुळे जमीन खचून वारंवार अपघात होत आहेत. माती व दगडाच्या भरावावर उभारलेल्या इमारतींना भविष्यात धोका संभवू शकतो. पैसा जमा करून आयुष्याची पुंजी घरासाठी लावणाऱ्या रहिवाशांच्या मनात असुरक्षिततेची भावना आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचे येथील नागरिक सांगत आहेत. येथील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्राधिकरणाने इमारतींना ना हरकत प्रमाणपत्र देताना इमारतीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने असलेल्या सर्व बाजू तपासाव्यात. तसेच परिसरात आजही अशा इमारती उभारल्या जात असून, त्याबाबतही प्राधिकरणाने त्वरित निर्णय घ्यावा. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना टाळता येतील, असे नागरिकांचे म्हणणे आहे. अधिकारी बिल्डरधार्जिणे निर्णय का घेतात, पूर्णानगरसारख्या घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असे प्रश्न विचारले जात आहेत.(प्रतिनिधी)उत्कृष्ट दर्जाचे काम केले, तर असे प्रकार घडणार नाहीत. पाया भक्कम नसेल आणि वर कितीही चांगले काम केले, तर त्याचा उपयोग नाही. सीमाभिंत ताबडतोब बांधून घेऊन इमारतीच्या पायाशी भर घालावी. इमारतीचे सांडपाणी बाहेर जाण्यासाठी वाट नाही. त्यासाठी वाट निर्माण करावी लागेल. या परिसरात जे मोकळे भूखंड आहेत. तेथे भराव टाकण्यात येणार आहे.- सुरेश जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी