शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘पीएमपी’कडून होतेय धूळफेक

By admin | Updated: June 12, 2017 01:26 IST

पीएमपीने पिंपरी-चिंचवडमध्ये किती बस वाढविल्या आणि उत्पन्नात किती वाढ झाली, हे सांगणे म्हणजे नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पीएमपीने पिंपरी-चिंचवडमध्ये किती बस वाढविल्या आणि उत्पन्नात किती वाढ झाली, हे सांगणे म्हणजे नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार आहे. २००७ आणि २०१७ च्या लोकसंख्येत दुप्पट वाढ झाली असताना शहरांतर्गत बससेवा सक्षम नाही, हा खरा मुद्दा आहे. शहरांतर्गत बससेवेची काय स्थिती आहे, याबाबत पीएमपीचे अध्यक्षांनी जनतेला सांगावे. शहरात फेरफटका मारून वस्तुस्थिती जाणून घ्यावी, अशी मागणी स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी केली आहे. सावळे म्हणाल्या, ‘‘पिंपरी-चिंचवडमधील अंतर्गत बसव्यवस्था सक्षम करावी आणि आसपासच्या गावांना शहराशी जोडण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. परंतु, पीएमपी प्रशासन २००७ आणि २०१७ मधील आकडेवारी प्रसिद्ध करून केवळ स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. २००७ मध्ये पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या दहा लाखांच्या घरात होती. २०१७ मध्ये ती २२ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. या दहा वर्षांत पुण्याचीही लोकसंख्या दुप्पट झाली आहे. त्यामुळे पुण्यातील प्रवासीही पिंपरी-चिंचवडमध्ये दररोज हजारोंच्या संख्येने येतात. लोकसंख्या दुप्पट झाली म्हणून पीएमपीच्या उत्पन्नातही वाढ होणे अपेक्षित आहे आणि तशी वाढ झाली आहे. पूर्व पीएमपी आणि पूर्व पीसीएमटी अस्तित्वात असताना शहरातून पुण्याच्या सर्व प्रमुख भागात बस धावत होत्या.