शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे रस्ते पाण्याखाली, थेरगावातील घरे, दुकानांमधील साहित्य भिजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 01:59 IST

अनेक दिवसांपासून पावसाची वाट पाहणाऱ्या नागरिकांचे एका दिवसात पावसाने तोंडचे पाणी पळविले. गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसाने थेरगावमधील नागरिकांची व वाहनचालकांची धांदल उडवली.

थेरगाव : अनेक दिवसांपासून पावसाची वाट पाहणाऱ्या नागरिकांचे एका दिवसात पावसाने तोंडचे पाणी पळविले. गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसाने थेरगावमधील नागरिकांची व वाहनचालकांची धांदल उडवली. शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी तीन वाजता आकाशात ढगांची गर्दी वाढली. त्यामुळे परिसरात आकाश अंधारून आले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. थेरगावमधील प्रत्येक रस्त्यांवरून पावसाच्या पाण्याचे लोंढे वाहत होते.गणेशनगर येथील शिव कॉलनीत गुडघाभर पाणी साठल्याने रहिवाशांना काही तास घराच्या बाहेर पडणे मुश्कील झाले होते. येथील उधारे यांच्या घरात ड्रेनेजचे मैलामिश्रित पाणी शिरल्याने त्यांना मोठी कसरत करावी लागली. गणेशनगर येथील पंचशील कॉलनी क्रमांक दोनमध्ये अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. आदर्श कॉलनीतील नंदकुमार धुमाळ यांच्या घरात गुडघाभर पाणी साठल्याने या कुटुंबीयांची मोठी वाताहत झाली.दगडू पाटीलनगर येथे ‘ग’ प्रभाग कार्यालयाजवळ कंबरे इतके पाणी साठल्याने संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली होती. रस्त्यावर शाळेची बस, चारचाकी वाहने या तलावात अर्धी बुडाली होती. यानंतर येथील नगरसेवक कैलास बारणे सहकाºयांसह स्वत: पाण्यात उतरले. साचलेले पाणी वाहून जाण्यासाठी चेंबरची झाकणे उघडली. त्यामुळे रस्त्यावरील पाणी कमी झाले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर पावसाळी पाण्याच्या वाहिन्यांची दुरवस्था झाली आहे. या वाहिन्यांच्या चेंबरवरील जाळ्या आणि झाकणे तुटलेली तर त्यात कचरा अडकून पाण्याचा निचरा होण्यास अडथळा होत आहे. पावसाळ्यापूर्वीच या चेंबरची आणि त्यावरील जाळ्यांची दुरुस्ती करणे आवश्यक होते. महापालिका आयुक्तांनी तसे आदेशही दिले होते. मात्र, महापालिका प्रशासनाने त्या आदेशानुसार कार्यवाही केली नाही. ेचेंबरच्या जाळ्यांची दुरुस्ती केवळ कागदोपत्री दाखविण्यात आले. परिणामी रस्त्यावर पाणी साचले.>आठ दुकानांमध्ये पाणी शिरून नुकसान१६ नं. येथे पावसामुळे अक्षय पार्क या व्यावसायिक इमारतीत तळ मजल्यात असलेल्या आठ दुकानांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले. अचानक जोरदार आलेल्या पावसामुळे साहित्य हलविण्यास देखील वेळ मिळाला नाही. ऐनवेळी प्रभाग सदस्य संदीप गाडे यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते किशोर सकुंडे, मोहन पांचाळ, अनुराग कांबळे, भरत शिंदे, दिलशाद खान यांनी येथील व्यावसायिकांना मदत करून साहित्य इतरत्र हलविले; मात्र येथील बीआरटीएस रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागली. येथील वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर जेसीबीने रस्त्यामधील चेंबर फोडून पाणी जाण्यास मार्ग मोकळा केला. त्यानंतर काही वेळात रस्त्यावरील पाणी ओसरले व वाहतुकीस मार्ग मोकळा झाला.