शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

पावसामुळे रस्ते पाण्याखाली, थेरगावातील घरे, दुकानांमधील साहित्य भिजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 01:59 IST

अनेक दिवसांपासून पावसाची वाट पाहणाऱ्या नागरिकांचे एका दिवसात पावसाने तोंडचे पाणी पळविले. गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसाने थेरगावमधील नागरिकांची व वाहनचालकांची धांदल उडवली.

थेरगाव : अनेक दिवसांपासून पावसाची वाट पाहणाऱ्या नागरिकांचे एका दिवसात पावसाने तोंडचे पाणी पळविले. गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसाने थेरगावमधील नागरिकांची व वाहनचालकांची धांदल उडवली. शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी तीन वाजता आकाशात ढगांची गर्दी वाढली. त्यामुळे परिसरात आकाश अंधारून आले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. थेरगावमधील प्रत्येक रस्त्यांवरून पावसाच्या पाण्याचे लोंढे वाहत होते.गणेशनगर येथील शिव कॉलनीत गुडघाभर पाणी साठल्याने रहिवाशांना काही तास घराच्या बाहेर पडणे मुश्कील झाले होते. येथील उधारे यांच्या घरात ड्रेनेजचे मैलामिश्रित पाणी शिरल्याने त्यांना मोठी कसरत करावी लागली. गणेशनगर येथील पंचशील कॉलनी क्रमांक दोनमध्ये अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. आदर्श कॉलनीतील नंदकुमार धुमाळ यांच्या घरात गुडघाभर पाणी साठल्याने या कुटुंबीयांची मोठी वाताहत झाली.दगडू पाटीलनगर येथे ‘ग’ प्रभाग कार्यालयाजवळ कंबरे इतके पाणी साठल्याने संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली होती. रस्त्यावर शाळेची बस, चारचाकी वाहने या तलावात अर्धी बुडाली होती. यानंतर येथील नगरसेवक कैलास बारणे सहकाºयांसह स्वत: पाण्यात उतरले. साचलेले पाणी वाहून जाण्यासाठी चेंबरची झाकणे उघडली. त्यामुळे रस्त्यावरील पाणी कमी झाले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर पावसाळी पाण्याच्या वाहिन्यांची दुरवस्था झाली आहे. या वाहिन्यांच्या चेंबरवरील जाळ्या आणि झाकणे तुटलेली तर त्यात कचरा अडकून पाण्याचा निचरा होण्यास अडथळा होत आहे. पावसाळ्यापूर्वीच या चेंबरची आणि त्यावरील जाळ्यांची दुरुस्ती करणे आवश्यक होते. महापालिका आयुक्तांनी तसे आदेशही दिले होते. मात्र, महापालिका प्रशासनाने त्या आदेशानुसार कार्यवाही केली नाही. ेचेंबरच्या जाळ्यांची दुरुस्ती केवळ कागदोपत्री दाखविण्यात आले. परिणामी रस्त्यावर पाणी साचले.>आठ दुकानांमध्ये पाणी शिरून नुकसान१६ नं. येथे पावसामुळे अक्षय पार्क या व्यावसायिक इमारतीत तळ मजल्यात असलेल्या आठ दुकानांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले. अचानक जोरदार आलेल्या पावसामुळे साहित्य हलविण्यास देखील वेळ मिळाला नाही. ऐनवेळी प्रभाग सदस्य संदीप गाडे यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते किशोर सकुंडे, मोहन पांचाळ, अनुराग कांबळे, भरत शिंदे, दिलशाद खान यांनी येथील व्यावसायिकांना मदत करून साहित्य इतरत्र हलविले; मात्र येथील बीआरटीएस रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागली. येथील वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर जेसीबीने रस्त्यामधील चेंबर फोडून पाणी जाण्यास मार्ग मोकळा केला. त्यानंतर काही वेळात रस्त्यावरील पाणी ओसरले व वाहतुकीस मार्ग मोकळा झाला.