शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

रस्ता खोदल्याने वाहतुकीस अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 02:39 IST

वाल्हेकरवाडी, रावेत, किवळे मार्गावरील मुख्य रस्ता महावितरण कंपनीच्या ठेकेदाराने केबल टाकण्यासाठी सर्वत्र खोदला आहे. वाल्हेकरवाडी ते रावेत मुख्य बीआरटीएस चौकापर्यंतचा रस्ता अर्धवट बुजविल्याने येथील अपघात आणि वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. त्यामुळे खड्डे पूर्णपणे बुजवून रस्ता दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

रावेत - वाल्हेकरवाडी, रावेत, किवळे मार्गावरील मुख्य रस्ता महावितरण कंपनीच्या ठेकेदाराने केबल टाकण्यासाठी सर्वत्र खोदला आहे. वाल्हेकरवाडी ते रावेत मुख्य बीआरटीएस चौकापर्यंतचा रस्ता अर्धवट बुजविल्याने येथील अपघात आणि वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. त्यामुळे खड्डे पूर्णपणे बुजवून रस्ता दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.महावितरण कंपनीने या मार्गावर विविध ठिकाणचे रस्ते आणि पदपथ खोदल्याने रावेतकरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच सेवा उपयोगिता कंपन्यांनी केबल टाकण्यासाठी चर खणण्यास सुरुवात केली आहे. परिणामी वाल्हेकरवाडी, रावेत, किवळे या रस्त्यांचा पुरता बोजवारा उडाला आहे. ‘खड्डेच खड्डे चोहीकडे’ अशी परिस्थिती आहे. अनेक ठिकाणचे लहान-मोठे रस्ते खड्डे खणून ठेवल्यामुळे व काही अर्धवट अवस्थेत बुजविल्याने त्याचा राडारोडा रस्त्यावर पडलेला आहे. काही ठिकाणी केबल व्यवस्थित न लावल्याने रस्त्यावरच पडून आहेत. त्यामुळे वाहतुकीचे मार्ग वळवावे लागले आहेत. काही ठिकाणी रस्ता खोदून, अर्धा रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला आहे. मात्र वाहतुकीसाठी उपलब्ध असलेल्या निम्म्या रस्त्यावर वाहनांची प्रचंड कोंडी होत आहे. त्याचा फटका पादचाऱ्यांनाही बसू लागला आहे. काही पदपथांवरील पेव्हर ब्लॉक या कामासाठी उखडण्यात आले आहेत. हे ब्लॉक रस्त्यावर पडून असल्याने वाहतुकीस अडथळा ठरत आहे. पदपथ खोदल्याने पादचाºयांना रस्त्यांवरून चालावे लागत आहे.आयुक्तांनादिले निवेदनरस्ता खोदल्याने वाहनचालकांना येथे कसरत करावी लागत आहे. त्यामुळे खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी केली आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे त्याबाबत निवेदन देण्यात आले आहे. ठेकेदाराकडून तत्काळ या मार्गावरील सर्व खड्डे बुजवून खोदलेला रस्ता डांबरीकरण करून पूर्ववत करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.सुरक्षेबाबत दक्षता न घेता रस्ताखोदाईरावेत बीआरटीएस चौक ते किवळेपर्यंतचा रस्ता चुकीच्या पद्धतीने खोदल्याने व त्याचा राडारोडा रस्त्यावरच टाकल्याने दररोज सायंकाळी येथे वाहतूककोंडी होत आहे. ठेकेदाराने काम करताना दक्षता घेतल्याचे दिसून येत नाही. काम सुरू असल्याबाबतचे सूचना फलक, बॅरिकेडस, दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रस्त्यावर असणारे खड्डे आणि केबल लक्षात येत नाही. त्यामुळे अपघातासह वाहतूककोंडीत वाढ झाली आहे. राडारोडा हळूहळू पूर्ण रस्त्यावर पसरला आहे. त्यामुळे वाहने घसरून अपघात होत आहेत. याच मार्गावर केबल उघड्यावरच ठेवल्या आहेत. त्यामुळेसुद्धा वाहतूककोंडी होत आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड