शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडे एका व्यक्तीशिवाय पर्याय आहे का?; सुषमा अंधारेंचा सवाल

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: August 31, 2023 23:27 IST

पिंपरीत उद्धवश्री पुरस्कारांचे वितरण

पिंपरी : भाजपविरोधात २८ पक्ष एकत्र आले आहेत. यातील सगळे पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत आहेत. त्यामुळे इंडिया आघाडी टिकणार नाही, अशी टीका भाजप व त्यांनी नेमलेले कंत्राटदार करत आहेत. मात्र, इंडियाकडे एकसे बढकर एक पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत. तेवढ्या ताकदीचे आणि शिकलेले ते आहेत. मात्र, गेली नऊ वर्षे झाली भाजपकडे पंतप्रधान म्हणून एकच व्यक्ती आहे. त्यांच्याकडे एकाशिवाय पर्याय आहे का, असा सवाल शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला.

पिंपरीमध्ये उद्धवश्री पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी अंधारे बोलत होत्या. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, शिवसेनेचे नेते रवींद्र मिर्लेकर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार आदी उपस्थित होते. अंधारे म्हणाल्या, सध्या संविधानिक चौकट उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. ती वाचविण्याचे काम इंडिया करत आहे. दुरुस्त्या करण्याला विरोध नाही. पण जाणीवपूर्वक राजकारणात धर्म आणला जात आहे. ते चुकीचे आहे. त्यामुळे इंडिया आघाडीची आज गरज आहे. शिवसेना फुटली तेव्हा उद्धव ठाकरेंवर टीका झाली. त्यात भाजपने सुपाऱ्या दिलेले राणे, राणा कंत्राटदार आघाडीवर आहेत. मी नीलेश अन् नितेश राणेबद्दल बोलणार नाही. त्यांच्यात संस्कार नावाच्या व्हिटॅमिन्सची कमतरता आहे. राणांना उद्धव ठाकरेंचा दम पाहायची इच्छा झाली. सगळी भाजपातील नेतेमंडळी इंडियातील २८ पक्षांपेक्षा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. त्यावरून उद्धव ठाकरेंमध्ये किती दम आहे, हे सिद्ध झाले आहे.-

त्यांच्या कपटी राजकारणाला ‘शाह’ यांचा शह

अंधारे म्हणाला, फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी कपटी राजकारण केले. त्यामुळे त्यांचा कार्यकाल हा कपटी मुख्यमंत्री म्हणूनच ओळखला जाईल.अमित शहा यांनी अजित पवारांना सोबत घेत फडणवीस यांच्या कपटी राजकारणाला शह दिला आहे. त्यामुळे फडणवीस यांचे राजकारण संपुष्टात आले असल्याचे अंधारे यांनी सांगितले.त्यांचे तीर्थ पिऊन पवित्र झालात

महाराष्ट्रात भाजपने अजित पवारांच्या धरण वाक्यावर रान उठवले होते. शेवटी भाजपने पवारांना सत्तेत घेतले. त्यांनी धरणात जे केले त्यांचे तीर्थ घेऊन पवित्र झाले का, असा सवालही अंधारे यांनी भाजपला केला. इंडियाची बैठक मुंबईत होणार आहे. त्याची भीती सत्ताधाऱ्यांना आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरची किंमत कमी केली. सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या हिताची व्याख्या ही अदानीशी आहे. त्यांना सामान्यांचं पडलेलं नाही, असा टोलाही अंधारे यांनी लगावला.शिल्लक सेनेतील लेकरे मांडीवर का घेता

भाजपचे नेते अन् सोशल मीडिया ट्रोल्स म्हणतात, आता शिवसेना राहिली नसून ती शिल्लक सेना झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे जर शिल्लक कोणी नाही राहिले तर शिल्लक सेनेतील लेकरे मांडीवर का घेता अन् स्वत:चे उपाशी ठेवता, असे म्हणत अंधारे यांनी भाजपला टोला लगावला.ऊठ दुपारी अन् घे सुपारी

दुपारी उठणाऱ्या सुपारीबाजांना आता शेतकऱ्यांचा कळवळा आला आहे. मात्र, समृद्धी महामार्गावर २७ लोकांचे जीव गेले. त्यांच्यावर सामूहिक अंत्यविधी होत असताना भाजप एक पक्ष फोडून शपथविधी करत होता. तेव्हा नैतिकतेच्या, महाराष्ट्राच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचे बोलणारे सुपारीबाज कुठे होते, असा खरमरीत सवालही अंधारे यांनी केला. 

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेBJPभाजपाprime ministerपंतप्रधानShiv Senaशिवसेना