शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

झोपडपट्टी पुनर्वसनाचा सर्व्हे करा

By admin | Updated: September 15, 2015 04:15 IST

महापालिकेच्या वतीने शहरात अनेक महत्त्वाच्या मोकळ्या जागी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविला गेला आहे. या प्रकल्पाचे फेर सर्वेक्षण करणे गरजेचे आहे.

- राहुल वडमारे,  पिंपरी महापालिकेच्या वतीने शहरात अनेक महत्त्वाच्या मोकळ्या जागी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविला गेला आहे. या प्रकल्पाचे फेर सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. तेथील झोपडपट्टी नाल्यांवर, गटारींवर होत्या. घाण कचरा, दुर्गंधी, दर वर्षी येणारा नदीला पूर यांमुळे तेथील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. एवढ्या मोठा सामना करत असतानाही झोपडपट्टीधारक संकटाच्या वेळेस एकमेकांकरिता धावून जायचे. मदत करायचे. दादागिरी, गुंडगिरी, फसवेगिरी करणाऱ्यांविरुद्ध एकत्र येऊन विरोध करायचे. जसेच्या तसे उत्तर द्यायचे. अशांना पोलीस पकडायला आले, तर ते सापडायचे नाहीत. कारण झोपडपट्टीतल्या नागरिकालाच माहीत होते की, कुठली गल्ली बाहेर पडायची आहे. त्यामुळे पोलिसांची दमछाक व्हायची. अशा प्रकारे झोपडपट्टीतले लोकजीवन जगत होते.या सर्वांतून झोपडपट्टीधारकांना बाहेर काढण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात आला. मात्र, सत्य आज उलट आहे. ज्या वेळेस हे लोक झोपडपट्टीत राहत होते, तेव्हा ते समाधानी व गुण्यागोविंदाने राहत होते. परंतु, आज हे लोक चांगल्या स्वरूपातील घरे मिळूनही आम्हाला झोपडपट्टीच बरी होती, असे म्हण्याची वेळ आली आहे. कारण, या लोकांना येथे अनेक प्रकारच्या दादागिरीला, गुंडगिरीला नेतेगिरीला सामोरे जावे लागत आहे. दर आठ दिवसांनी या ठिकाणी काही तरी भांडणे होत आहेत. रात्री-बेरात्री आरडा ओरडीला सामोरे जावे लागत आहे. ही लोक अशिक्षित असल्यामुळे ते काय, अन्यायाविरुद्ध आवाज उठविणार आहेत. गरीब लोक काय न्याय मागणार आहेत? महापालिकेने ज्या उद्देशाने हा प्रकल्प राबविला, तो यशस्वी झाला का, याचे सर्वेक्षण झाले पाहिजे. ही संपत्ती महापालिकेचीच आहे. चुकीच्या गोष्टींवर निर्बंध लादणे हे गरजेचे आहे. लेखक - धम्मदीप प्रतिष्ठानाचे संस्थापक-अध्यक्ष आहेत.