शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

‘शास्ती’च्या नावाखाली लूट, मनमानी कारभाराबाबत नागरिकांमध्ये असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 06:17 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेने हद्दीतील अनधिकृत बाधकामांना शास्तीकर लागू केला आहे. या शास्तीकर दंडाच्या रकमेतून महापालिकेला ५३० कोटी एवढी रक्कम मिळणार आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने हद्दीतील अनधिकृत बाधकामांना शास्तीकर लागू केला आहे. या शास्तीकर दंडाच्या रकमेतून महापालिकेला ५३० कोटी एवढी रक्कम मिळणार आहे. भाजपाने महापालिका निवडणुकीमध्ये सत्ता आल्यास शास्तीकर पूर्णत: माफ करण्याचे आश्वासन दिले होते. आता शास्तीकर माफ होऊ शकला नाही. महापालिकेने नागरिकांना शास्तीकराबरोबरच चक्रवाढ व्याज लावून नोटीस दिल्या आहेत. शास्तीकर भरला नाही, तर मिळकती जप्त करण्यात येतील, अशीही नोटीस बजावली आहे. त्यामुळे पालिकेने शास्तीकराच्या नावाखाली सावकारी धंदाच सुरू केला आहे, असा आरोप खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन व सत्ताधारी भाजपाच्या या मनमानी कारभाराविरुद्ध नागरिकांमध्ये मोठा असंतोष पसरला आहे. शहरातील अनेक नागरिकांनी रविवारी खासदार बारणे यांची भेट घेतली. अनेक वेळा मुख्यमंत्र्यांना भेटून शास्तीकर पूर्णत: माफ करण्याची विनंती केली; परंतु शासनाने शास्तीकर माफ केलाच नाही. उलट नागरिकांना चक्रवाढ व्याज लावून अधिक मनस्ताप दिला आहे. अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी जी नियमावली बनवली ती अधिक जाचक असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दंडाची प्रक्रिया असल्याने नागरिक अनधिकृत मिळकती अधिकृत करण्यासाठी अर्ज करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. शास्तीकराचा दंड व व्याजाची रक्कम नागरिकांना परवडणारी नसल्याने जोपर्यंत पूर्णत: शास्तीकर पूर्वलक्ष्यी माफ होत नाही, तोपर्यंत कोणीही शास्तीकराची रक्कम भरू नये; शास्तीकर व त्याच्या चक्रवाढ व्याजाचा विरोध करावा.’’सत्ताधाºयांनी आश्वासनाची पूर्तता करावी-खासदार बारणे म्हणाले, ‘‘शास्तीकराच्या नावाखाली चालवलेला सावकारी धंदा बंद करावा. महापालिका निवडणुकीत शहरवासीयांना शास्तीकर माफीच्या दिलेल्या आश्वासनाची सत्ताधाºयांनी पूर्ती करावी. शहरातील नागरिकांनी शास्तीकर, तसेच त्यावर आकारण्यात येणारे व्याज भरू नये. भाजपाने दिलेल्या शास्तीकर माफीच्या आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी स्थानिक भाजपा नगरसेवकांच्या घरासमोर धरणे आंदोलन करावे. जेणेकरून त्यांनाही निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची आठवण होईल. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी अनधिकृत बांधकामे नियमित करून शास्तीकर पूर्णत: माफ करण्याचे आश्वासन भाजपाच्या स्थानिक नेत्यांबरोबर मुख्यमंत्र्यांनी दिले होते. सत्ता मिळाल्यानंतर भाजपाला आश्वासनांचा विसर पडत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड