शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

थेरगावातील बारणे उद्यानाची दुरवस्था

By admin | Updated: May 3, 2017 02:22 IST

लक्ष्मणनगर येथील लक्ष्मीबाई बारणे उद्यानाची अवस्था दयनीय झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. नागरिकांचे प्रमुख

थेरगाव : लक्ष्मणनगर येथील लक्ष्मीबाई बारणे उद्यानाची अवस्था दयनीय झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. नागरिकांचे प्रमुख आकर्षण असलेले कारंजे या ठिकाणी कित्येक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. त्या ठिकाणी डबक्यात घाण पाणी साचून डासांचे प्रमाण या ठिकाणी वाढले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कारंजे बंद अवस्थेत असल्यामुळे नागरिकांचा हिरमोड होत आहे. तसेच सुरक्षेसाठी उद्यानाच्या भिंतींवर लावलेले लोखंडी कंपाउंड तुटलेल्या अवस्थेत आहे. या ठिकाणाहून उड्या मारून टवाळखोर मुले आत येत असतात. त्यामुळे येथील सुरक्षा रामभरोसे आहे.या ठिकाणी लक्ष्मणनगर, गणेशनगर, गुजरनगर, संतोषनगर, १६ नंबर, बेलठिकानगर, पवारनगर आदी परिसरातील नागरिकांची सकाळी उद्यानामध्ये फिरण्यासाठी मोठी वर्दळ असते. तसेच या ठिकाणी व्यायामासाठी आणि योगासनांसाठीही नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात. उद्यानातील फुटपाथचे गट्टू तुटलेले आहेत. त्यामुळे चालताना अडथळे येतात. उद्यानामध्ये रोज लक्ष देऊन पूर्ण उद्यानात पाणी मारले जात नसल्याने येथील हिरवळ नाहीशी झाली आहे. अनेक झाडे सुकून गेली आहेत. उद्यानामध्ये हिरवळच राहिलेली नसल्यामुळे नागरिकांना हिरवळीवर बसण्याचा आनंद घेता येत नाही. अनेक ठिकाणी झाडाचा पाचोळा पडलेला आहे. त्यामुळे नागरिकांना बसण्यासाठी स्वच्छ जागा राहिली नाही. त्यातच लहान मुलांना खेळण्यासाठी या ठिकाणी झोपाळा आहे, पण तोही तुटला आहे. झोपाळ्याचे पोल तेवढे दिसत आहेत. अनेक खेळणी तुटल्या असल्यामुळे बालचमूंच्या आनंदावर विरजण पडत आहे. उद्यानातील दिवे, स्वच्छतागृहांची दुरवस्था झालेली आहे. या ठिकाणी असलेल्या सर्व स्वच्छतागृहाच्या खिडक्या तुटलेल्या आहेत. तसेच आतमध्ये कसलीही स्वच्छता ठेवली जात नसल्याने नागरिक स्वच्छतागृहामध्ये जाणे टाळतात. तसेच पिण्यासाठी पाण्याचा नळ बसवलेला आहे. पण त्या नळाला पाणीच नाही. अशी या ठिकाणची वाईट परिस्थिती असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. उद्यानामध्ये टवाळखोर पोरांचा वावर आणि मद्यपान करून येणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याने उद्यानातील कोप-यांत दारूच्या बाटल्या, सिगरेट, बिडीची थोटके पडलेली दिसतात. तसेच अनेक ठिकाणी गुटखा खाऊन पिचका-या मारून भिंती रंगवलेल्या आहेत. फिरण्यासाठी आलेल्यांना या गोष्टीचा त्रास होत आहे.या सर्व गोष्टींकडे उद्यानातील संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांचे दुर्लक्ष झाले आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या सुशोभीकरणात भर घालण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने उद्यानाची निर्मिती केली जाते. परिसरातील नागरिक थकवा घालविण्यासाठी, विरंगुळा म्हणून, तसेच लहान मुलांना मनोरंजन म्हणून या ठिकाणी येतात; पण या गैरसोयीमुळे आणि त्रासामुळे नागरिकांचा हिरमोड होत आहे. उद्यान अधिका-यांनी या गोष्टींकडे लक्ष देऊन लवकरात लवकर सर्व गोष्टींचा पाठपुरावा करून त्रास कमी करावा, अशी मागणी संतप्त नागरिक करीत आहेत. (प्रतिनिधी)