शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

महापालिका शाळांमध्ये लवकरच डिजिटल लायब्ररी

By admin | Updated: June 15, 2016 05:05 IST

शाळा सुरू होताच शालेय साहित्य मिळत नसल्याची ओरड होते. यासह महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची गळती, गुणवत्ता वाढीचे प्रयत्न, शालाबाह्य मुलांसाठी शिक्षण मंडळाचे उपक्रम

शाळा सुरू होताच शालेय साहित्य मिळत नसल्याची ओरड होते. यासह महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची गळती, गुणवत्ता वाढीचे प्रयत्न, शालाबाह्य मुलांसाठी शिक्षण मंडळाचे उपक्रम, शिक्षक व मुख्याध्यापकांची रखडलेली पदोन्नती व शिक्षकांच्या बदल्यांमध्ये येणाऱ्या अडचणीचा प्रशासनाला कशा प्रकारे सामना करावा लागतो. या अनुषंगाने शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी बी. सी. कारेकर यांची घेतलेली मुलाखत. यंदा १५ जूनला पहिल्याच दिवशी मुलांना वेळेत शालेय साहित्य मिळविण्यासाठी काय प्रयत्न केले गेले. यंदा मुलांना सर्व शालेय वस्तू पहिल्याच दिवशी मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न केला. सर्व साहित्याचे एका शाळेतून इतर शाळांमध्ये प्राथमिक स्वरूपात वाटप होणार आहे. त्या दृष्टीने पिंपळे गुरव महापालिका शाळेत शालेय साहित्य वाटपाचे नियोजन केले आहे. शालाबाह्य मुले समाविष्ट करण्यासाठी शाळा पातळीवर काय प्रयत्न केले गेले आहेत?शाळा पातळीवर शाळाबाह्य मुलांसाठी एप्रिल महिन्यातच सर्वेक्षण झाले. त्यासाठी समिती नेमण्यात आली होती. सुट्टीच्या कालावधीतही हे काम सुरू असल्यामुळे या वर्षी शालाबाह्य मुलांच्या संख्येत वाढ झाली आहे. पटसंख्या वाढविण्यासाठी विशेष कोणते प्रयत्न करण्यात आले?शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी ७ मेपूर्वीच प्रवेश सुरू केले होते. त्यामुळे शाळा प्रवेश ३१ जुलैपर्यंत सुरू राहणार आहेत. नक्कीच यंदा पटसंख्येत वाढ होईल. तसेच शाळास्तरावर विविध उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबविले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाचा ओढा निर्माण होईल. यंदाच्या वर्षी नवनवीन कोणत्या संकल्पना हाती घेतल्या आहेत? महापालिकेच्या ५० शाळांमध्ये डिजिटल लायब्ररी सुरू केली जाणार आहे. त्यासाठी शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारी एक संस्था विनामोबदला सहकार्य करीत आहे. त्याचप्रकारे स्वतंत्र बालवाडी अभ्यासक्रम तयार केला आहे. प्राथमिक व माध्यमिकच्या शिक्षकांसाठी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा भरविल्या आहेत. रोटरी क्लबमार्फत विद्यार्थ्यांना सायबर क्राईमचे प्रशिक्षण देण्यासाठी शाळा स्तरांवर सीडीचे वाटप ३० जूनपर्यंत केले जाणार आहे. त्याचप्रकारे ज्या शाळांचे शिक्षक बारावी सायन्स झाले आहेत, त्या शाळांमध्ये पहिलीपासूनच सेमी वर्ग सुरू करण्यात आले आहेत. पूर्वी फक्त ठरावीक शाळांमध्ये सेमी वर्ग होते. गुणवत्ता वाढीसाठी विशेष कोणते उपक्रम राबविले जाणार आहेत. गुणवत्तावाढीसाठी हस्ताक्षरलेखन उपक्रम सुरू च आहे. त्याचप्रकारे विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्याचप्रकारे मुलांच्या बुद्धिमत्तावाढीसाठी इंग्रजी विषयावर भर दिला जाणार आहे. पाढे पाठांतराचा उपक्रमही सुरू आहे. ५वी व ८वीच्या विद्यार्थ्यांना या वर्षापासून शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.