शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका शाळांमध्ये लवकरच डिजिटल लायब्ररी

By admin | Updated: June 15, 2016 05:05 IST

शाळा सुरू होताच शालेय साहित्य मिळत नसल्याची ओरड होते. यासह महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची गळती, गुणवत्ता वाढीचे प्रयत्न, शालाबाह्य मुलांसाठी शिक्षण मंडळाचे उपक्रम

शाळा सुरू होताच शालेय साहित्य मिळत नसल्याची ओरड होते. यासह महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची गळती, गुणवत्ता वाढीचे प्रयत्न, शालाबाह्य मुलांसाठी शिक्षण मंडळाचे उपक्रम, शिक्षक व मुख्याध्यापकांची रखडलेली पदोन्नती व शिक्षकांच्या बदल्यांमध्ये येणाऱ्या अडचणीचा प्रशासनाला कशा प्रकारे सामना करावा लागतो. या अनुषंगाने शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी बी. सी. कारेकर यांची घेतलेली मुलाखत. यंदा १५ जूनला पहिल्याच दिवशी मुलांना वेळेत शालेय साहित्य मिळविण्यासाठी काय प्रयत्न केले गेले. यंदा मुलांना सर्व शालेय वस्तू पहिल्याच दिवशी मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न केला. सर्व साहित्याचे एका शाळेतून इतर शाळांमध्ये प्राथमिक स्वरूपात वाटप होणार आहे. त्या दृष्टीने पिंपळे गुरव महापालिका शाळेत शालेय साहित्य वाटपाचे नियोजन केले आहे. शालाबाह्य मुले समाविष्ट करण्यासाठी शाळा पातळीवर काय प्रयत्न केले गेले आहेत?शाळा पातळीवर शाळाबाह्य मुलांसाठी एप्रिल महिन्यातच सर्वेक्षण झाले. त्यासाठी समिती नेमण्यात आली होती. सुट्टीच्या कालावधीतही हे काम सुरू असल्यामुळे या वर्षी शालाबाह्य मुलांच्या संख्येत वाढ झाली आहे. पटसंख्या वाढविण्यासाठी विशेष कोणते प्रयत्न करण्यात आले?शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी ७ मेपूर्वीच प्रवेश सुरू केले होते. त्यामुळे शाळा प्रवेश ३१ जुलैपर्यंत सुरू राहणार आहेत. नक्कीच यंदा पटसंख्येत वाढ होईल. तसेच शाळास्तरावर विविध उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबविले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाचा ओढा निर्माण होईल. यंदाच्या वर्षी नवनवीन कोणत्या संकल्पना हाती घेतल्या आहेत? महापालिकेच्या ५० शाळांमध्ये डिजिटल लायब्ररी सुरू केली जाणार आहे. त्यासाठी शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारी एक संस्था विनामोबदला सहकार्य करीत आहे. त्याचप्रकारे स्वतंत्र बालवाडी अभ्यासक्रम तयार केला आहे. प्राथमिक व माध्यमिकच्या शिक्षकांसाठी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा भरविल्या आहेत. रोटरी क्लबमार्फत विद्यार्थ्यांना सायबर क्राईमचे प्रशिक्षण देण्यासाठी शाळा स्तरांवर सीडीचे वाटप ३० जूनपर्यंत केले जाणार आहे. त्याचप्रकारे ज्या शाळांचे शिक्षक बारावी सायन्स झाले आहेत, त्या शाळांमध्ये पहिलीपासूनच सेमी वर्ग सुरू करण्यात आले आहेत. पूर्वी फक्त ठरावीक शाळांमध्ये सेमी वर्ग होते. गुणवत्ता वाढीसाठी विशेष कोणते उपक्रम राबविले जाणार आहेत. गुणवत्तावाढीसाठी हस्ताक्षरलेखन उपक्रम सुरू च आहे. त्याचप्रकारे विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्याचप्रकारे मुलांच्या बुद्धिमत्तावाढीसाठी इंग्रजी विषयावर भर दिला जाणार आहे. पाढे पाठांतराचा उपक्रमही सुरू आहे. ५वी व ८वीच्या विद्यार्थ्यांना या वर्षापासून शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.