शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
3
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
4
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
5
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
6
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
8
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
9
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
10
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
11
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
12
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
13
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
14
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
15
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
16
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
17
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
18
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
19
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
20
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

डेंगीची साथ: आणखी किती जणांचा जाणार बळी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:58 IST

पावसामुळे खडकीतील डबक्यात व खोलगट भागात साठवणूक केलेल्या पाण्याचे ड्रम, कुंड्या, बाजारातील सार्वजनिक शौचालयाच्या उघड्या टाक्या तपासण्यात येत असून

खडकी : पावसामुळे खडकीतील डबक्यात व खोलगट भागात साठवणूक केलेल्या पाण्याचे ड्रम, कुंड्या, बाजारातील सार्वजनिक शौचालयाच्या उघड्या टाक्या तपासण्यात येत असून, खडकीत डेंगीचे चार रुग्ण सापडले असून, अन्य ५७ जणांचे रक्ताचे नमुने लॅबमध्ये पाठविण्यात आल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय डॉक्टर रणजित भोसले यांनी लोकमतला दिली आहे.रुग्णालयात डेंगी, मलेरिया, स्वाइन फ्लू आदी साथीच्या आजारांवर जनजागृती व निवारण करण्यासाठी महाराष्टÑ शासनाच्या आरोग्य विभागामार्फत एक कक्ष स्थापन करण्यात आला असून, या कक्षात दोन आरोग्य सेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.खडकीतील प्रत्येक वस्ती, मोहल्ल्यामध्ये पाण्याचे ड्रम भरून घराबाहेर ठेवलेले असतात. त्या स्वच्छ पाण्यात डेंगीच्या डासांची उत्पत्ती होऊ शकते. याकरिता असे पाण्याचे भरलेले ड्रम रिकामे करण्यात येत असून, नागरिकांना डेंगीबद्दल माहिती देऊन औषध फवारणी, पाणी जास्त दिवस साठवून न ठेवण्याची माहिती दिली जात आहे.जाधववाडीत मलेरिया, डेंगी, चिकुनगुनियाचे थैमान-जाधववाडी : पावसाळ्यात डासांचे प्रमाण वाढल्याने जाधववाडीत सध्या अनेक प्रकारच्या तापाने थैमान घातले आहे. या परिसरातील अनेक घरांच्या छतांवर पाणी साचत आहे. कुदळवाडीत अनेक ठिकाणी डेंगीसदृश रुग्ण आढळले आहेत. जागोजागी भंगार व्यावसायिकांच्या छतावर साचलेले पाणी जुनी फ्रीज ची दुकाने सार्वजनिक प्रार्थना स्थळे, या ठिकाणीही स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे. जाधववाडीतच २० ते २५ जणांना डेंगीची लागण झाली आहे़ कुदळवाडीतदेखील ३० ते ३५ जणांना लागण झाली आहे़ व काहींना चिकुनगुनियाची लागण झाली आहे. यात स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.काही बैठ्या घरांवर पावसाचे पाणी गळू नये म्हणून ताडपत्री अथवा प्लॅस्टिक कागद टाकला जातो. त्यात देखील पावसाचे पाणी साठून राहते. अशाअनेक ठिकाणी साचलेल्या स्वच्छ पाण्यात डेंगी पसरण्याची अधिक शक्यता असते. सध्या शहरभरात सगळीकडे साथीच्या तापाने डोकेवर काढले असल्याने आरोग्य विभागाने प्रतिबंधक उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.अंगावर लाल रंगाचे पुरळ येणे, शरीरावर खाज सुटणे, घशाला कोरड पडणे, हिरड्या लालसर होणे, हात-पाय दुखणे, शरीरातील पेशींची संख्या कमी होणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन मोफत तपासणी करून घेण्याचे आवाहन आरोग्यसेवकांनी केले आहे. तापाची लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. त्यांच्या सल्ल्यानुसारच औषधे घ्यावीत, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.