शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

कामचुकार अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी; सर्वसाधारण सभेत प्रशासनाच्या अकार्यक्षमतेवर नगरसेवकांकडून टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 05:35 IST

महापालिकेच्या नागरवस्ती विभाग व महिला बालकल्याण विभागातील कामांचा पंचनामा सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांनी केला. योजनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात तरतूद ठेवली जाते.

पिंपरी : महापालिकेच्या नागरवस्ती विभाग व महिला बालकल्याण विभागातील कामांचा पंचनामा सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांनी केला. योजनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात तरतूद ठेवली जाते. परंतु, त्याचा वापर होत नाही. लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळत नाही. बेजबाबदार आणि कामचुकार अधिकारी बदला अशी मागणीही सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केली. महापौर नितीन काळजे सभेच्या अध्यक्षस्थानी होते.महापालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत राबविण्यात येणाºया मागासवर्गीय युवकांना परदेशातील उच्च शिक्षणासाठी अर्थसाहाय्याचा धनादेश प्रवेश घेतलेल्या विद्यापीठाचे नावे काढण्यात येतो. त्याऐवजी विद्यार्थ्यांच्या नावे धनादेश किंवा ईसीएसद्वारे लाभ देण्यात यावा, अशी दुरुस्ती करण्याचा विषय सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला होता. या विषयावर बोलताना सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्षांतील नगरसेविकांनी नागरवस्ती विभागाच्या कामावर टीका केली.माजी महापौर मंगला कदम म्हणाल्या, ‘‘परदेशातील शिक्षणासाठी सर्व घटकातील युवकांना अर्थसाहाय्य करावे, विद्यार्थ्यांना लाभ वेळेत मिळणे गरजेचे आहे. पात्र-अपात्रतेची यादी त्वरित करणे गरजेचे आहे. दहा वर्षे पूर्ण झालेल्या बचत गटांना अद्यापही लाभ दिला नाही. किरकोळ कारणांवरून फाईल रखडविल्या जातात. नागरवस्ती विभागाचे अधिकारी मन लावून काम करत नाहीत. त्यांची बदली करा.’’स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे म्हणाल्या, ‘‘मोफत वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्याच्या विषयाला नोव्हेंबरमध्ये मान्यता दिली. परंतु, अजूनही प्रशिक्षण सुरूझाले नाही. अधिकाºयांचे कामावर लक्ष नसते. नगरसेवकांनी दूरध्वनी केल्यावर व्यस्त असल्यास त्या पुन्हा दूरध्वनीदेखील करीत नाहीत. आयुक्तांनी त्यांच्याकडे पदभार दिला आहे.’’आशा शेंडगे म्हणाल्या, ‘‘नागरवस्ती विभागातील अधिकाºयांकडून वेळेत माहिती दिली जात नाही. माहिती घेण्यासाठी दमबाजी करावी लागते.’’नागरवस्तीचा ढिसाळ कारभारअधिकारी व्यवस्थित माहिती देत नाही. जागेवरदेखील ते हजर नसतात, असा आरोप उषा मुंढे यांनी केला. योजना नागरिकांपर्यंत पोहचत नाहीत. ढिसाळ कारभार सुरू आहे. पात्र-अपात्रतेचा घोळ घातला जातो. छोट्या चुकांवरुन अर्ज अपात्र ठरविले जातात. विद्यार्थ्यांना वेळेत लाभ मिळत नाही, अशी टीका अनुराधा गोफणे यांनी केली. सुजाता पालांडे म्हणाल्या, ‘‘योजना चांगल्या आहेत. परंतु, त्याची काटेकोरपणे अंमलबाजवणी केली जात नाही. योग्य वेळी विद्यार्थ्यांना लाभ मिळत नाही. पात्र-अपात्रतेची यादी वेळीच जाहीर करणे गरजेचे आहे. अधिकारी मनमानी पद्धतीने काम करतात.’’झामा बारणे, नीता पाडाळे, माई घुले, प्रियंका बारसे यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :Transferबदली