शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
4
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
5
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
6
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
7
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
8
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
9
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
10
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
11
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
12
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
13
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
14
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
15
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
16
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
17
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
18
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
19
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
20
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?

शेतकऱ्यांची शेणखताला मागणी वाढली

By admin | Updated: May 30, 2017 02:37 IST

कधीकाळी शेतकरी शेणखताच्या वापरातूनच भरघोस शेती उत्पादन घेत असे. मात्र, साधारणपणे १९७0 च्या दशकात शेतकरी

लोकमत न्यूज नेटवर्कमोशी : कधीकाळी शेतकरी शेणखताच्या वापरातूनच भरघोस शेती उत्पादन घेत असे. मात्र, साधारणपणे १९७0 च्या दशकात शेतकरी रासायनिक खते वापरू लागले. बागायती शेतीत तर त्याचा वारेमाप वापर होऊ लागला. गेल्या काही वर्षांत युरियाचा वापर अधिक होत होता. गेल्या दोन वर्षांत सर्वच रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने त्यांचा वापर सामान्य शेतकऱ्यांना परवडेनासा झाला आहे. त्यामुळे ते पुन्हा शेणखताच्या वापराकडे वळत असल्याचे पहावयास मिळत आहे. शहरात मोशी, चऱ्होली, डुडुळगाव, रावेत, चिखली, ताथवडे आदी गावांमध्ये अजूनही हिरव्यागार शेती होते. चऱ्होली, मोशी, आळंदी तसेच वडमुखवाडी परिसरात काही शेतकऱ्यांनी तर शेतातच गांडूळ खताचे डेपो तयार केले आहेत. तेथे शेणखताचा वापरही वाढू लागला आहे. कृत्रिम खताच्या किमती वाढल्याने शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खताच्या वापरास शेतकरी प्राधान्य देत आहेत. ट्रॅक्टरभर शेणखत खरेदी करून त्याची खेड, चाकण, शिक्रापूर, मंचर आदी भागांत विक्री करण्याचा व्यवसायही काहींनी थाटला आहे. ट्रकभर शेणखताची सहा ते साडेसात हजारांपर्यंत विक्री होत असून, हे खेत थेट शेतापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था व्यावसायिक करीत आहेत. यातून रोजगार निर्मितीही होत आहे. सध्या सर्वत्र खरीपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. पुन्हा का वाढली मागणी?पारंपरिक पद्धतीने तयार होणाऱ्या शेणखत निर्मितीकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस घटणाऱ्या पशुधनामुळे शेणखत दुर्मिळ होत चालले आहे. ४पर्जन्यमानातील अनियमितता, जनावरांच्या चाऱ्याबरोबर उन्हाळ्यातील तीव्र पाणीटंचाई बघता पशुपालकांची मोठी पंचाईत होत असते. त्यामुळे त्यांनाही नाईलाजास्तव पशुधनाची विक्री करावी लागते. पशुधनाची संख्या घटत आहे. परिणामी शेणखताचाही तुटवडा भासत असून त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहे.