शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

शेतकऱ्यांची शेणखताला मागणी वाढली

By admin | Updated: May 30, 2017 02:37 IST

कधीकाळी शेतकरी शेणखताच्या वापरातूनच भरघोस शेती उत्पादन घेत असे. मात्र, साधारणपणे १९७0 च्या दशकात शेतकरी

लोकमत न्यूज नेटवर्कमोशी : कधीकाळी शेतकरी शेणखताच्या वापरातूनच भरघोस शेती उत्पादन घेत असे. मात्र, साधारणपणे १९७0 च्या दशकात शेतकरी रासायनिक खते वापरू लागले. बागायती शेतीत तर त्याचा वारेमाप वापर होऊ लागला. गेल्या काही वर्षांत युरियाचा वापर अधिक होत होता. गेल्या दोन वर्षांत सर्वच रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने त्यांचा वापर सामान्य शेतकऱ्यांना परवडेनासा झाला आहे. त्यामुळे ते पुन्हा शेणखताच्या वापराकडे वळत असल्याचे पहावयास मिळत आहे. शहरात मोशी, चऱ्होली, डुडुळगाव, रावेत, चिखली, ताथवडे आदी गावांमध्ये अजूनही हिरव्यागार शेती होते. चऱ्होली, मोशी, आळंदी तसेच वडमुखवाडी परिसरात काही शेतकऱ्यांनी तर शेतातच गांडूळ खताचे डेपो तयार केले आहेत. तेथे शेणखताचा वापरही वाढू लागला आहे. कृत्रिम खताच्या किमती वाढल्याने शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खताच्या वापरास शेतकरी प्राधान्य देत आहेत. ट्रॅक्टरभर शेणखत खरेदी करून त्याची खेड, चाकण, शिक्रापूर, मंचर आदी भागांत विक्री करण्याचा व्यवसायही काहींनी थाटला आहे. ट्रकभर शेणखताची सहा ते साडेसात हजारांपर्यंत विक्री होत असून, हे खेत थेट शेतापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था व्यावसायिक करीत आहेत. यातून रोजगार निर्मितीही होत आहे. सध्या सर्वत्र खरीपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. पुन्हा का वाढली मागणी?पारंपरिक पद्धतीने तयार होणाऱ्या शेणखत निर्मितीकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस घटणाऱ्या पशुधनामुळे शेणखत दुर्मिळ होत चालले आहे. ४पर्जन्यमानातील अनियमितता, जनावरांच्या चाऱ्याबरोबर उन्हाळ्यातील तीव्र पाणीटंचाई बघता पशुपालकांची मोठी पंचाईत होत असते. त्यामुळे त्यांनाही नाईलाजास्तव पशुधनाची विक्री करावी लागते. पशुधनाची संख्या घटत आहे. परिणामी शेणखताचाही तुटवडा भासत असून त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहे.