शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

शेतकऱ्यांची शेणखताला मागणी वाढली

By admin | Updated: May 30, 2017 02:37 IST

कधीकाळी शेतकरी शेणखताच्या वापरातूनच भरघोस शेती उत्पादन घेत असे. मात्र, साधारणपणे १९७0 च्या दशकात शेतकरी

लोकमत न्यूज नेटवर्कमोशी : कधीकाळी शेतकरी शेणखताच्या वापरातूनच भरघोस शेती उत्पादन घेत असे. मात्र, साधारणपणे १९७0 च्या दशकात शेतकरी रासायनिक खते वापरू लागले. बागायती शेतीत तर त्याचा वारेमाप वापर होऊ लागला. गेल्या काही वर्षांत युरियाचा वापर अधिक होत होता. गेल्या दोन वर्षांत सर्वच रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने त्यांचा वापर सामान्य शेतकऱ्यांना परवडेनासा झाला आहे. त्यामुळे ते पुन्हा शेणखताच्या वापराकडे वळत असल्याचे पहावयास मिळत आहे. शहरात मोशी, चऱ्होली, डुडुळगाव, रावेत, चिखली, ताथवडे आदी गावांमध्ये अजूनही हिरव्यागार शेती होते. चऱ्होली, मोशी, आळंदी तसेच वडमुखवाडी परिसरात काही शेतकऱ्यांनी तर शेतातच गांडूळ खताचे डेपो तयार केले आहेत. तेथे शेणखताचा वापरही वाढू लागला आहे. कृत्रिम खताच्या किमती वाढल्याने शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खताच्या वापरास शेतकरी प्राधान्य देत आहेत. ट्रॅक्टरभर शेणखत खरेदी करून त्याची खेड, चाकण, शिक्रापूर, मंचर आदी भागांत विक्री करण्याचा व्यवसायही काहींनी थाटला आहे. ट्रकभर शेणखताची सहा ते साडेसात हजारांपर्यंत विक्री होत असून, हे खेत थेट शेतापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था व्यावसायिक करीत आहेत. यातून रोजगार निर्मितीही होत आहे. सध्या सर्वत्र खरीपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. पुन्हा का वाढली मागणी?पारंपरिक पद्धतीने तयार होणाऱ्या शेणखत निर्मितीकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस घटणाऱ्या पशुधनामुळे शेणखत दुर्मिळ होत चालले आहे. ४पर्जन्यमानातील अनियमितता, जनावरांच्या चाऱ्याबरोबर उन्हाळ्यातील तीव्र पाणीटंचाई बघता पशुपालकांची मोठी पंचाईत होत असते. त्यामुळे त्यांनाही नाईलाजास्तव पशुधनाची विक्री करावी लागते. पशुधनाची संख्या घटत आहे. परिणामी शेणखताचाही तुटवडा भासत असून त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहे.