शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

देहूरोड : कंटेनर अडकल्याने झाली वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 01:16 IST

पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी दुपारी सव्वाच्या सुमारास बँक आॅफ इंडिया चौकात एलिव्हेटेड रस्ता व उड्डाणपुलाचे काम सुरू असलेल्या पहिल्या पिलरला कंटेनर धडला.

देहूरोड : पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी दुपारी सव्वाच्या सुमारास बँक आॅफ इंडिया चौकात एलिव्हेटेड रस्ता व उड्डाणपुलाचे काम सुरू असलेल्या पहिल्या पिलरला कंटेनर धडला. कंटेनर अडकल्याने वाहनचालकांची व स्थानिक ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली. पुलाच्या सिमेंट पिलरला वारंवार कंटेनर अडकत असतानाही रस्ते विकास महामंडळाच्या ठेकेदाराकडून उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने, असे प्रकार घडत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे.बुधवारी दुपारी पुण्याकडून मुंबईच्या दिशेने निघालेला मालवाहू कंटेनर देहूरोड बाजार भागातील एलिव्हेटेड रस्ता व उड्डाणपुलाचे काम सुरू असलेल्या भागातील सेवा रस्त्यावरून जात होता. एलिव्हेटेड व उड्डाणपुलाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी बांधण्यात येत असलेल्या चौकात पहिल्या सिमेंट पिलरला धडकून अडकला. कंटेनर अडकल्याने जोरात आवाज झाला.त्याठिकाणी नागरिकांनी धाव घेतली. तोपर्यंत अर्ध्याहून अधिक कंटेनर पुलाच्या सिमेंट पिलरलाघासून पुढे जाऊन अडकून पडला होता.वाहनचालकांना मारावा लागला वळसाकंटेनर अडकल्याने मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक ठप्प झाली होती. कंटेनरच्या मागील उजव्या बाजूच्या सर्व चाकांची हवा कमी करून हळू-हळू पिलरला घासत चालकाने कंटेनर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; मात्र कंटेनर निघाला नाही. तोपर्यंत पुणे बाजूकडे वाहनांची मोठी रांग लागली होती. काही वाहने विरुद्ध दिशेने जाऊ लागल्याने वाहतूककोंडी झाली होती. इतर सर्व रस्त्यांवर वाहने जाऊ लागल्याने सर्वत्र वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे मुंबईकडे जाणाºया वाहनचालकांना व स्थानिकांना सोमाटणे, तळेगावकडे जाण्यासाठी मोठा वळसा घालून जावे लागत होते. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते मेहरबानसिंग तक्की यांनी देहूरोड वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश पवार यांना कळविल्यानंतर दोन वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले.वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला़ मात्र तोपर्यंत लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर पोलिसांनी संबंधित पुलाचे काम करणाºया ठेकेदाराची क्रेन आणून अडकलेला कंटेनर एक तासाने काढण्यात यश आले. गेल्या पाच महिन्यांत येथील महामार्गावर स्वामी विवेकानंद चौकात व बँक आॅफ इंडिया चौकात अशा पद्धतीने उड्डाणपुलाच्या पिलरला कंटेनर अडकण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. मात्र पुलाचे काम करणाºया ठेकेदाराकडून याबाबत काहीही उपाययोजना केली नसल्याचे उघड झाले असून, राज्य रस्ते विकास महामंडळाने संबंधित उड्डाणपूल व एलिव्हेटेड रस्त्याचे काम करणाºया ठेकेदारास तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करणेबाबत सूचना द्याव्यात, अशी मागणी वाहनचालकांनी व स्थानिकांनी केली आहे.

टॅग्स :Accidentअपघात