शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

शास्तीकर माफीची घोषणा विरली हवेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 01:54 IST

चिंचवड येथील कार्यक्रमात ‘शास्तीची धास्ती पंधरा दिवसांत घालवू’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

पिंपरी : चिंचवड येथील कार्यक्रमात ‘शास्तीची धास्ती पंधरा दिवसांत घालवू’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यास पंधरा दिवस उलटून गेले असून, अद्याप शास्तीकर माफीबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याने मुख्यमंत्र्यांचे आश्वासन हवेतच विरल्याचे दिसून येत आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजना, स्मार्ट सिटीतील कामांचे ई-भूमिपूजन चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ९ जानेवारीला झाले. त्या वेळी झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील अनधिकृत बांधकामाची शास्ती १५ दिवसांत माफ करू, असे आश्वासन दिले होते. कॅबिनेटमध्ये चर्चा करून १५ दिवसांत निर्णय घेतला जाईल. नागरिकांना दिलासा दिला जाईल, असेही नमूद केले होते.दरम्यान, अनधिकृत बांधकामांना शास्तीकर लागून येत असल्याने नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसतो. यातून मुक्तता झाल्यास दिलासा मिळेल, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेमुळे शहरातील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या. घोषणेप्रमाणे पंधरा दिवसांत काही तरी निर्णय होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, शास्तीकर माफीच्या कसल्याही हालचाली झाल्याच्या दिसून येत नाही.>‘काउंटडाउन’ आंदोलनानंतरही नाही कार्यवाहीचिंचवड येथील कार्यक्रमात ‘शास्तीची धास्ती १५ दिवसांत घालवू’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानंतर विरोधकांनी शास्तीमाफीचा फलक पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोर लावून ‘काउंटडाउन’ आंदोलन केले. विरोधी पक्षांनी १२ जानेवारीपासून ‘काउंटडाउन’ सुरू केले होते. ‘पिंपरी-चिंचवड शहरवासीयांनो, शास्तीकर माफ होतोय. दिवस राहिले —!’ असा फलकावर उल्लेख करण्यात आला.>मुख्यमंत्री आश्वासन : नागरिकांमध्ये नाराजीपिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासह शास्तीकर माफीबाबत यापूर्वीही मंत्र्यांसह इतरही राजकीय नेत्यांकडूनही अनेकदा घोषणा झाल्या आहेत. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणी झालीच नसल्याने नागरिकांची निराशा झाली. दरम्यान, खुद्द मुख्यमंत्र्यांनी शास्तीमाफीची घोषणा केल्याने आता तरी हा प्रश्न मार्गी लागेल, अशी आशा शहरवासीयांना होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या घोषणेस १५ दिवस उलटल्याने मुख्यमंत्र्यांची घोषणाही केवळ तात्पुरतीच होती काय, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.