शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
3
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
4
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
5
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
6
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
7
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
8
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
9
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
10
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
11
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
12
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
13
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
14
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
15
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
16
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
17
सुंदर पिचाई, नाडेला यांची ‘अळी मिळी गुपचिळी’ का?; आयटी क्षेत्रात मोठी अस्वस्थता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

शास्तीकर माफीची घोषणा विरली हवेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 01:54 IST

चिंचवड येथील कार्यक्रमात ‘शास्तीची धास्ती पंधरा दिवसांत घालवू’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

पिंपरी : चिंचवड येथील कार्यक्रमात ‘शास्तीची धास्ती पंधरा दिवसांत घालवू’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यास पंधरा दिवस उलटून गेले असून, अद्याप शास्तीकर माफीबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याने मुख्यमंत्र्यांचे आश्वासन हवेतच विरल्याचे दिसून येत आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजना, स्मार्ट सिटीतील कामांचे ई-भूमिपूजन चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ९ जानेवारीला झाले. त्या वेळी झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील अनधिकृत बांधकामाची शास्ती १५ दिवसांत माफ करू, असे आश्वासन दिले होते. कॅबिनेटमध्ये चर्चा करून १५ दिवसांत निर्णय घेतला जाईल. नागरिकांना दिलासा दिला जाईल, असेही नमूद केले होते.दरम्यान, अनधिकृत बांधकामांना शास्तीकर लागून येत असल्याने नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसतो. यातून मुक्तता झाल्यास दिलासा मिळेल, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेमुळे शहरातील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या. घोषणेप्रमाणे पंधरा दिवसांत काही तरी निर्णय होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, शास्तीकर माफीच्या कसल्याही हालचाली झाल्याच्या दिसून येत नाही.>‘काउंटडाउन’ आंदोलनानंतरही नाही कार्यवाहीचिंचवड येथील कार्यक्रमात ‘शास्तीची धास्ती १५ दिवसांत घालवू’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानंतर विरोधकांनी शास्तीमाफीचा फलक पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोर लावून ‘काउंटडाउन’ आंदोलन केले. विरोधी पक्षांनी १२ जानेवारीपासून ‘काउंटडाउन’ सुरू केले होते. ‘पिंपरी-चिंचवड शहरवासीयांनो, शास्तीकर माफ होतोय. दिवस राहिले —!’ असा फलकावर उल्लेख करण्यात आला.>मुख्यमंत्री आश्वासन : नागरिकांमध्ये नाराजीपिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासह शास्तीकर माफीबाबत यापूर्वीही मंत्र्यांसह इतरही राजकीय नेत्यांकडूनही अनेकदा घोषणा झाल्या आहेत. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणी झालीच नसल्याने नागरिकांची निराशा झाली. दरम्यान, खुद्द मुख्यमंत्र्यांनी शास्तीमाफीची घोषणा केल्याने आता तरी हा प्रश्न मार्गी लागेल, अशी आशा शहरवासीयांना होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या घोषणेस १५ दिवस उलटल्याने मुख्यमंत्र्यांची घोषणाही केवळ तात्पुरतीच होती काय, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.