शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
7
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
10
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
11
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
12
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
13
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
14
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
15
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
16
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
17
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
18
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
19
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
20
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?

पालखी मार्गावर धोकादायक गतिरोधक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2016 00:37 IST

संत तुकाराममहाराजांचा पालखी सोहळा मार्गस्थ होण्यास जेमतेम सहा दिवस उरले असताना पालखी मार्गावरील व विविध पालखी तळांवर शासकीय स्तरावर विविध सोयी-सुविधा देण्याबाबत कार्यवाही सुरू झाली

देहूरोड : संत तुकाराममहाराजांचा पालखी सोहळा मार्गस्थ होण्यास जेमतेम सहा दिवस उरले असताना पालखी मार्गावरील व विविध पालखी तळांवर शासकीय स्तरावर विविध सोयी-सुविधा देण्याबाबत कार्यवाही सुरू झाली आहे. मात्र, देहूरोडच्या लष्करी हद्दीत देहूगाव -देहूरोड रस्त्यावर गेल्या आठवड्यात बसविण्यात आलेल्या अशास्त्रीय गतिरोधकामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, तातडीने गतिरोधक काढून टाकण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच, चिंचोली येथील पालखीच्या पहिल्या विसाव्याच्या ठिकाणीगेल्या वर्षी खोदण्यात आलेले चर बुजविले नसल्याने भाविकांची गैरसोय होणार आहे. देहूगाव -देहूरोड पालखी मार्गावर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या व स्थानिक लष्कराच्या हद्दीत सीओडी डेपो ते पुणे-मुंबई महामार्गदरम्यान विविध ठिकाणी अशास्त्रीय गतिरोधक (डांबर व खडीच्या साह्याने) बनविण्यात आलेले आहेत. तसेच गेल्या आठवड्यात लष्करी हद्दीत दोन ठिकाणी कठीण रबराचे गतिरोधक बसविण्यात आले आहेत. त्यातील एक गतिरोधक काही ठिकाणी खिळे बाहेर येऊन खराबही झाला आहे. दुसराही खराब होण्याची शक्यता दिसत आहे. भारतीय रस्ते काँग्रेसच्या निकषाप्रमाणे कोणत्याही रस्त्यावर गतिरोधक बनविताना ठरावीक रुंदी व उंची ठेवणे बंधनकारक असते. तसेच गतिरोधकाच्या अगोदर ५० मीटर अंतरावर पुढे गतिरोधक असल्याचा मार्गदर्शक फलक लावणे आवश्यक असते. गतिरोधक दिसण्यासाठी पट्टे मारावे लागतात, जेणेकरून वाहने आदळून चालकांना अपघात होऊ नये, अगर आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये. हा त्यामागील मुख्य उद्देश असतो. मात्र, या ठिकाणी बनविण्यात आलेले गतिरोधक निकषाप्रमाणे बनविण्यात आलेले नाहीत. गतिरोधकांच्या अगोदर दोन्ही बाजूंना मार्गदर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. रात्रीच्या वेळी गतिरोधक दिसण्यासाठी रेडियम अगर ब्लिंकर लावणे गरजेचे असताना लावण्यात आलेले नाही. परिणामी, वाहने आदळून वाहनचालकांना पाठीच्या मणक्याचा व मानेला झटका बसण्याचे प्रकार घडत असून, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गतिरोधक दिसल्याने एखादे वाहन अचानक थांबल्याने दुसरे वाहन त्यावर आदळण्याचे प्रकार घडू लागले आहेत. मंगळवारी येथून जाणारा पालखी रथ, दिंड्या व भाविकांची हजाराहून अधिक वाहनांना या गतिरोधकामुळे फटका बसण्याची शक्यता असून, संबंधितांना निकषानुसार नसलेले सर्व गतिरोधक तातडीने काढण्याबाबत सूचित करावे, अशी मागणी स्थानिकांतून व भाविकांतून करण्यात येत आहे. (वार्ताहर)