शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

करदात्यांच्या पैशावर ‘डल्ला’

By admin | Updated: October 30, 2015 00:22 IST

नगरसेवक हे महापालिकेचे ‘विश्वस्त’ म्हणून काम करतात. मात्र, याच काही विश्वस्तांकडून करदात्यांच्या पैशावर डल्ला मारण्याचा प्रकार पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुरू आहे

मंगेश पांडे, पिंपरीनगरसेवक हे महापालिकेचे ‘विश्वस्त’ म्हणून काम करतात. मात्र, याच काही विश्वस्तांकडून करदात्यांच्या पैशावर डल्ला मारण्याचा प्रकार पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुरू आहे. विविध विकासकामांत ‘टक्केवारी’चे राजकारण करीत कोट्यवधींची ‘मलई’ लाटली जात आहे. नगरसेवक, अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने महापालिकेची तिजोरी लुटण्याचा प्रकार असून, हा चुकीचा कारभार थांबविण्याची मागणी नागरिक करीत आहेत. शहरात अधिकाधिक विकासकामे व्हावीत, अशी सर्वांचीच अपेक्षा असते. ही कामे करदात्यांच्याच पैशातूून होत असतात. या पैशाचा विनियोग महापालिकेचे विश्वस्त आणि अधिकारी यांच्या निर्णयानुसार होत असतो. महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समितीने मात्र, काम पूर्ण होण्यापूर्वीच कोट्यवधी रुपयांचा वाढीव खर्च ठेकेदाराला देण्याची नवीन पद्धत सुरू केली आहे. डांगे चौक ते वाकड अंडरपासपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यात येणार आहे. हे काम ठेकेदार १७ कोटींमध्ये करण्यास तयार असताना यासाठी स्थायी समितीने मात्र ठेकेदाराला वाढीव सहा कोटी दिले आहेत. यासह चापेकर चौक ते थेरगाव पूल यादरम्यानचा रस्ता सिमेंट काँक्रिटचा करण्यासाठी ठेकेदार साडेनऊ कोटी रुपयांत तयार असताना स्थायी समितीने ‘मोठ्या मनाने’ ठेकेदाराला १३ कोटी ७ लाख रुपये देण्यास मंजुरी दिली. ठेकेदार योग्य रकमेत काम करण्यास तयार असताना स्थायी समितीने ठेकेदाराला वाढीव खर्च देण्याचा हट्ट धरला आहे. आणि तोही काम सुरू होण्यापूर्वीच अदा केला जाणार असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या दोन्ही कामांतील वाढीव खर्चाचा नऊ कोटींचा फटका महापालिकेला बसणार आहे. या वाढीव खर्चाची जबाबदारी कोण घेणार, कोणाच्या संगनमताने हे चालले आहे, यातून कोणाला किती टक्केवारी मिळणार याबाबत पालिका वर्तुळात जोरदार चर्चा आहे. महापालिकेचे उत्पन्नाचे स्रोत कमी झाल्याबाबत आयुक्तांनीदेखील भाषणातून अजित पवार यांच्यासमोर चिंता व्यक्त केलेली आहे. यामुळे विकासकामांसह कर्मचाऱ्यांचे पगार करतानाही विचार करावा लागणार आहे. मात्र, उलट वारेमाप खर्चाचाच धडाका लावला आहे. स्थायी समितीची मंगळवारी असलेली सभा म्हणजे एकप्रकारे ‘दिवाळी’च असते. विषयपत्रिकेवरील विषय संबंधित ठेकेदाराशी भेटीगाठी झाल्याशिवाय मंजूरच होत नसल्याचीही चर्चा आहे.