शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

रब्बी हंगामातील लागवडींना वेग

By admin | Updated: October 5, 2016 01:19 IST

खेडसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या वरुणराजाने आज सकाळपासून उघडीप दिल्याने बळीराजा रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे.

शेलपिंपळगाव : खेडसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या वरुणराजाने आज सकाळपासून उघडीप दिल्याने बळीराजा रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे. परतीच्या मुसळधार पावसाने परिसरातील जलस्रोत खळखळू लागले आहेत. त्यामुळे विहिरींमधील पाणीपातळीतही वाढ झाली आहे. मुबलक पाणी उपलब्ध होत असल्याने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण पसरले असून, रब्बी हंगामातील कांदालागवडींच्या कामांना त्याचा अधिक फायदा होत आहे. परिसरात काही ठिकाणी ज्वारी पिकाची पेरणीची कामे मार्गी लागली आहेत, तर काही ठिकाणी जमिनींचा वापसा पाहून पेरणी केली जात आहे. पावसाने उघडीप दिल्याने कांदालागवडीच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे. चालू वर्षी पावसाळी हंगामाच्या सुरुवातीच्या दिवसात वरुणराजाने ओढ दिल्याने खरिपाच्या पेरण्या धोक्यात आल्या होत्या. परंतु, दोन महिन्यांच्या प्रदीर्घ ओढीनंतर वरुणराजाची चांगल्या प्रमाणात कृपा झाल्याने पाण्याची चिंता दूर होण्यास मदत झाली. उशिरा का होईना झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरिपातील महत्त्वाच्या पिकांच्या पेरणीला पसंती देऊन पेरणीची कामे उरकवून घेत आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी काही परिसरात बिनपेरणीच्याच अवस्थेत होत्या. सध्या रब्बी हंगामाचा कालखंड सुरु झाल्याने बळीराजाने या हंगामातील पिकांच्या पेरणीला बैलांच्या साह्याने सुरुवात केली आहे. (वार्ताहर)