शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी हंगामातील लागवडींना वेग

By admin | Updated: October 5, 2016 01:19 IST

खेडसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या वरुणराजाने आज सकाळपासून उघडीप दिल्याने बळीराजा रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे.

शेलपिंपळगाव : खेडसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या वरुणराजाने आज सकाळपासून उघडीप दिल्याने बळीराजा रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे. परतीच्या मुसळधार पावसाने परिसरातील जलस्रोत खळखळू लागले आहेत. त्यामुळे विहिरींमधील पाणीपातळीतही वाढ झाली आहे. मुबलक पाणी उपलब्ध होत असल्याने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण पसरले असून, रब्बी हंगामातील कांदालागवडींच्या कामांना त्याचा अधिक फायदा होत आहे. परिसरात काही ठिकाणी ज्वारी पिकाची पेरणीची कामे मार्गी लागली आहेत, तर काही ठिकाणी जमिनींचा वापसा पाहून पेरणी केली जात आहे. पावसाने उघडीप दिल्याने कांदालागवडीच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे. चालू वर्षी पावसाळी हंगामाच्या सुरुवातीच्या दिवसात वरुणराजाने ओढ दिल्याने खरिपाच्या पेरण्या धोक्यात आल्या होत्या. परंतु, दोन महिन्यांच्या प्रदीर्घ ओढीनंतर वरुणराजाची चांगल्या प्रमाणात कृपा झाल्याने पाण्याची चिंता दूर होण्यास मदत झाली. उशिरा का होईना झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरिपातील महत्त्वाच्या पिकांच्या पेरणीला पसंती देऊन पेरणीची कामे उरकवून घेत आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी काही परिसरात बिनपेरणीच्याच अवस्थेत होत्या. सध्या रब्बी हंगामाचा कालखंड सुरु झाल्याने बळीराजाने या हंगामातील पिकांच्या पेरणीला बैलांच्या साह्याने सुरुवात केली आहे. (वार्ताहर)