शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

मावळात ७३ गावांत अंत्यसंस्कार उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 02:39 IST

मावळ तालुक्यातील ७३ गावांत अद्याप स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांना उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे.

वडगाव मावळ - मावळ तालुक्यातील ७३ गावांत अद्याप स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांना उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे.तालुक्यात १०४ ग्रामपंचायती असून, १८४ महसूल गावे आहेत. या पैकी ७३ गावांत आजही स्मशानभूमी नसल्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार भरपावसात, उन्हात करण्याची वेळ गावोगावच्या नागरिकांवर आली आहे. तर काही ठिकाणी स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. ग्रामीण भागात आजही ७३ गावांत स्मशानभूमी नाही. तालुक्यात मौरमार वाडी, पालेनामा, बेडसे, कुसवली, केवरे, चावसर, कुसूर, कोंडीवडे, कुसगाव, कुणा नामा, घेरेवाडी, धालेवाडी, पानोली, सावळा, कळकराई, आढाववाडी, मेडलवाडी, डोंगेवाडी, गोंटेवाडी, वाघेश्वर, कचरेवाडी, भाजगाव व अन्य अशा ७३ गावांत स्मशानभूमी नाही.प्रत्येक गावात स्मशानभूमी असणे आवश्यक असताना तब्बल ७३ गावांमध्ये अद्यापही स्मशानभूमी नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. स्मशानभूमी कधी उपलब्ध होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.याबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नीलेश काळे म्हणाले, ‘‘२०१४-१५ मध्ये नऊ गावांत स्मशानभूमीच्या बांधकामासाठी निधी मंजूर झाला होता. परंतु जागा उपलब्ध नसल्याने खर्च करता आला नाही. जमिनीचे भाव वाढल्याने ग्रामस्थ जमीन देण्यास टाळाटाळ करतात. काही गावांचे प्रस्ताव पाठवले असून, काही गावांची मंजुरी आली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे