शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

लोकप्रतिनिधीच ठेकेदार; कंत्राटदारीवरून वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 03:16 IST

औद्योगिक क्षेत्रात पूर्वीपासून कामगार विरुद्ध मालक असा संघर्ष सर्वज्ञात आहे. त्यांच्यातील वादातून औद्योगिक शांततेला बाधा पोहोचत असल्याचे प्रकार घडू लागल्याने औद्योगिक कलह कायदाही अस्तित्वात आला.

- संजय मानेपिंपरी : औद्योगिक क्षेत्रात पूर्वीपासून कामगार विरुद्ध मालक असा संघर्ष सर्वज्ञात आहे. त्यांच्यातील वादातून औद्योगिक शांततेला बाधा पोहोचत असल्याचे प्रकार घडू लागल्याने औद्योगिक कलह कायदाही अस्तित्वात आला. आता मात्र औद्योगिक शांततेला बाधा पोहोचविण्याचे वेगळेच प्रकार घडू लागले आहेत. कंत्राट मिळविण्यासाठी उद्योजकांवर दबाव आणण्याचे प्रकार घडत आहेत. एवढेच नव्हे तर कंत्राट आपल्यालाच मिळावे, यासाठी कंत्राटदारसुद्धा एकमेकांच्या जिवावर उठले आहेत. कंत्राटदारीत आता कामगारनेते आणि राजकारणी यांनी शिरकाव केला असल्याने कंत्राटदारीतील गुन्हेगारीत औद्योगिक क्षेत्रात अशांतता वाढली आहे.पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव, हिंजवडी या परिसरात औद्योगिक क्षेत्राचा विस्तार झाला आहे. कामगारांना रोजगाराच्या संधी मिळाल्या. पिंपरी-चिंचवड, भोसरी परिसरातील अनेक उद्योग चाकण येथे नव्याने विकसित झालेल्या आद्योगिक क्षेत्रात स्थलांतरित झाले. औद्योगिक पट्टयात अनेक उद्योग नव्याने सुरू झाले. औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या नेहमीच्या कंत्राटदारांऐवजी कंपन्यांचे दुसऱ्याच ठेकेदारांचा औद्योगिक क्षेत्रात शिरकाव झाला.कामगारनेते झाले कंत्राटदारकामगारांच्या न्याय, हक्काचा लढा देणारे काही कामगारनेते ठेकेदार बनले. एकीकडे कामगारनेते म्हणून मिरवायचे, दुसरीकडे कंपनी मालकाकडून त्यांनीच कामाचा ठेका मिळवायचा. कामगारांसाठी लढा देणाºया कामगार नेत्यांनीच गेल्या काही वर्षांत कंत्राटदारीच्या माध्यमातून कामगारांच्या शोषणाचे काम केले आहे. कामगारनेत्यांचे कंत्राटदारांमध्ये रूपांतर झाल्याने कामगार चळवळीची पीछेहाट झाल्याचे जाणवू लागले आहे. गुंड प्रवृत्तीचे काहीजण राजकारण्यांच्या पाठबळामुळे औद्योगिक क्षेत्रात ठेकेदार म्हणून वावरू लागले आहेत.सोन्याचे अंडे देणारी कोंबडीकामगार नेतेच कंत्राटदार झाले असताना, राजकारण्यांनीही औद्योगिक क्षेत्रातील कंत्राटदारीकडे लक्ष केंद्रित केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत एखाद्या पदावर काम करण्याची संधी मिळाली तरी पैसे कमावण्याचे साधन म्हणून औद्योगिक क्षेत्रातील ठेकेदारीला प्राधान्य दिले जात आहे. राजकीय दबावतंत्राचा अवलंब करून कंपन्यांतील कंत्राट अनेकांनी मिळविले आहे. कार्यकर्त्यांचे पुनर्वसन या उद्देशाने काही राजकारणी मंडळी कंपनी मालकांवर दबाव आणून कंत्राट देण्यास भाग पाडतात. औद्योगिक कंपन्या म्हणजे राजकारण्यांना सोन्याचे अंडे देणारी कोंबडी वाटू लागली आहे.गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून उद्योजकांना त्रास दिला जात आहे. कंपनीतील भंगारमाल, कॅन्टीन, वाहतूक सुविधा, कामगारपुरवठा याचे कंत्राट आम्हालाच द्यावे, अशी दमदाटी कंपनी मालकांना केली जाते. कंपनी मालकाकडून प्रतिसाद न मिळाल्यास त्यांना धमकावले जाते. कंपनीचे, मालवाहू वाहनांचे नुकसान करण्याची धमकी दिली जाते. व्यवसाय करायचा असल्याने कोणाशी वाद नको, या भावनेतून उद्योजक हा त्रास सहन करीत आहेत. पोलिसांकडे कोणाची तक्रार द्यायची, तर वैर पत्करण्याची वेळ येणार या भीतीने कोणीही उद्योजक तक्रार देण्यास पुढे येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. - गोविंद पानसरे, अध्यक्ष, पुणे जिल्हा औद्योगिक विकास मंडळ

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड