शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्तीमुळे सातत्याने अपघात

By admin | Updated: May 9, 2017 03:39 IST

मुंबई-पुणे एक्सप्रेस (द्रुतगती) महामार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांना मानवी चुकाच कारणीभूत ठरत आहेत. विविध सर्वेक्षणांतून

मुंबई-पुणे एक्सप्रेस (द्रुतगती) महामार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांना मानवी चुकाच कारणीभूत ठरत आहेत. विविध सर्वेक्षणांतून ही बाब समोर आली असतानाही वाहनचालक बेशिस्तपणे वाहन चालवून अपघाताला निमंत्रण देत आहेत.राजधानी मुंबई व आयटी हब पुणे ही शहरे कमीत कमी वेळात जोडली जावीत याकरिता मुंबई-पुणे या ९४ किमी अंतराच्या देशातील पहिल्या द्रुतगती मार्गाची निर्मिती करण्यात आली. हा महामार्ग जलद प्रवासाबरोबर वेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत राहिला आहे. वारंवार होणारे भीषण अपघात व वाहतूककोंडी यामुळे या महामार्गाची ओळख मृत्यूचा महामार्ग वा कासवगती महामार्ग अशी होऊ लागली आहे. द्रुतगतीवर वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. मात्र, सर्वेक्षणात या मार्गावरील जवळपास ८० टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे अर्थात चालकांच्या चुकांमुळे होत असल्याचे समोर आले आहे. या मानवी चुका रोखण्यासाठीही या मार्गावर यंत्रणेने विविध उपाययोजना केल्या. ज्यामध्ये स्पीड गनच्या माध्यमातून वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणणे, कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहनांची छबी टिपत नियमांचा भंग करणारे कारचालक व लेन कटिंग करणारे अवजड वाहनांचे चालक यांना दंड करणे, लेनची शिस्त वाहनचालकांना समजावी याकरिता माहितीचे बोर्ड लावणे, रस्त्यावर मार्किंग करणे आदी कामे केल्यानंतरही या मार्गावर ना वाहनांचा वेग कमी झाला, ना लेन कटिंगची समस्या कमी झाली. वारंवार या घटना व अपघातांची पुनरावृत्ती होत असतानाही वाहन चालकांकडून शिस्तव नियमांचे पालन केले जात नाही.वारंवार मानवी चुकांमुळे अपघात होत असतानाही चालक नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. हे दुदैव म्हणावे लागेल.