शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

बेशिस्तीमुळे सातत्याने अपघात

By admin | Updated: May 9, 2017 03:39 IST

मुंबई-पुणे एक्सप्रेस (द्रुतगती) महामार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांना मानवी चुकाच कारणीभूत ठरत आहेत. विविध सर्वेक्षणांतून

मुंबई-पुणे एक्सप्रेस (द्रुतगती) महामार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांना मानवी चुकाच कारणीभूत ठरत आहेत. विविध सर्वेक्षणांतून ही बाब समोर आली असतानाही वाहनचालक बेशिस्तपणे वाहन चालवून अपघाताला निमंत्रण देत आहेत.राजधानी मुंबई व आयटी हब पुणे ही शहरे कमीत कमी वेळात जोडली जावीत याकरिता मुंबई-पुणे या ९४ किमी अंतराच्या देशातील पहिल्या द्रुतगती मार्गाची निर्मिती करण्यात आली. हा महामार्ग जलद प्रवासाबरोबर वेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत राहिला आहे. वारंवार होणारे भीषण अपघात व वाहतूककोंडी यामुळे या महामार्गाची ओळख मृत्यूचा महामार्ग वा कासवगती महामार्ग अशी होऊ लागली आहे. द्रुतगतीवर वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. मात्र, सर्वेक्षणात या मार्गावरील जवळपास ८० टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे अर्थात चालकांच्या चुकांमुळे होत असल्याचे समोर आले आहे. या मानवी चुका रोखण्यासाठीही या मार्गावर यंत्रणेने विविध उपाययोजना केल्या. ज्यामध्ये स्पीड गनच्या माध्यमातून वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणणे, कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहनांची छबी टिपत नियमांचा भंग करणारे कारचालक व लेन कटिंग करणारे अवजड वाहनांचे चालक यांना दंड करणे, लेनची शिस्त वाहनचालकांना समजावी याकरिता माहितीचे बोर्ड लावणे, रस्त्यावर मार्किंग करणे आदी कामे केल्यानंतरही या मार्गावर ना वाहनांचा वेग कमी झाला, ना लेन कटिंगची समस्या कमी झाली. वारंवार या घटना व अपघातांची पुनरावृत्ती होत असतानाही वाहन चालकांकडून शिस्तव नियमांचे पालन केले जात नाही.वारंवार मानवी चुकांमुळे अपघात होत असतानाही चालक नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. हे दुदैव म्हणावे लागेल.