शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
4
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
5
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
6
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
7
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
8
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
9
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
10
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
11
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
12
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
13
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
14
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
15
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
16
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
17
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
18
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
19
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
20
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य

बेशिस्तीमुळे सातत्याने अपघात

By admin | Updated: May 9, 2017 03:39 IST

मुंबई-पुणे एक्सप्रेस (द्रुतगती) महामार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांना मानवी चुकाच कारणीभूत ठरत आहेत. विविध सर्वेक्षणांतून

मुंबई-पुणे एक्सप्रेस (द्रुतगती) महामार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांना मानवी चुकाच कारणीभूत ठरत आहेत. विविध सर्वेक्षणांतून ही बाब समोर आली असतानाही वाहनचालक बेशिस्तपणे वाहन चालवून अपघाताला निमंत्रण देत आहेत.राजधानी मुंबई व आयटी हब पुणे ही शहरे कमीत कमी वेळात जोडली जावीत याकरिता मुंबई-पुणे या ९४ किमी अंतराच्या देशातील पहिल्या द्रुतगती मार्गाची निर्मिती करण्यात आली. हा महामार्ग जलद प्रवासाबरोबर वेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत राहिला आहे. वारंवार होणारे भीषण अपघात व वाहतूककोंडी यामुळे या महामार्गाची ओळख मृत्यूचा महामार्ग वा कासवगती महामार्ग अशी होऊ लागली आहे. द्रुतगतीवर वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. मात्र, सर्वेक्षणात या मार्गावरील जवळपास ८० टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे अर्थात चालकांच्या चुकांमुळे होत असल्याचे समोर आले आहे. या मानवी चुका रोखण्यासाठीही या मार्गावर यंत्रणेने विविध उपाययोजना केल्या. ज्यामध्ये स्पीड गनच्या माध्यमातून वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणणे, कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहनांची छबी टिपत नियमांचा भंग करणारे कारचालक व लेन कटिंग करणारे अवजड वाहनांचे चालक यांना दंड करणे, लेनची शिस्त वाहनचालकांना समजावी याकरिता माहितीचे बोर्ड लावणे, रस्त्यावर मार्किंग करणे आदी कामे केल्यानंतरही या मार्गावर ना वाहनांचा वेग कमी झाला, ना लेन कटिंगची समस्या कमी झाली. वारंवार या घटना व अपघातांची पुनरावृत्ती होत असतानाही वाहन चालकांकडून शिस्तव नियमांचे पालन केले जात नाही.वारंवार मानवी चुकांमुळे अपघात होत असतानाही चालक नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. हे दुदैव म्हणावे लागेल.