शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

वर्गीकरणावरून गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 03:14 IST

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तरतूद वर्गीकरणाच्या विषयावरून गोंधळ झाला. मतदान झाले. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लोबोल केले

पिंपरी : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तरतूद वर्गीकरणाच्या विषयावरून गोंधळ झाला. मतदान झाले. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लोबोल केले. आयुक्तांना विषय माघारीचे पत्र दिले असतानाही सत्ताधाºयांनी बहुमताच्या जोरावर मंजुरी दिली. त्यानुसार भोसरी, इंद्रायणीनगर प्रभागातील रस्त्यांच्या कामावरील तरतूद शून्य केली.पिंपरी-चिंचवड महापालिकेतील उपसूचना आणि तरतूद वर्गीकरणाची राष्टÑवादी काँग्रेसची परंपरा भाजपानेही सुरू ठेवली आहे. अखर्चित रकमेच्या २५७ कोटी रुपयांची तरतूद वर्गीकरणाचा विषय सर्वसाधारण सभेपुढे चर्चेला आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनी यावर आक्षेप घेतला होता. स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे यांनी आयुक्तांना धारेवर धरले होते. सत्ताधारी नगरसेवकांनीच विरोध केल्याने मागील सभेत एक विषय मागे ठेऊन सभा तहकूब केली होती. त्यानंतर तहकूब सभा बुधवारी झाली. महापौर नितीन काळजे अध्यक्षस्थानी होते.सभा कामकाज सुरू होतानाच नगरसचिव उल्हास जगताप यांनी आयुक्तांनी वर्गीकरणाचे पाचही प्रस्ताव मागे घेत असल्याचे लेखी पत्र दिले आहे, असे सांंगितले. एक विषय मागील सभेतच तहकूब केला होता. त्यामुळे पुढील सभेत यावर निर्णय होईल, असे सांगितले. त्यानंतर वर्गीकरणाच्या पुढील विषयावर चर्चा सुरू झाली. त्या वेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आक्षेप घेतला. आयुक्तांनी विषय मागे घेतल्यानंतर चर्चा आणि दुसरे विषय मंजूर कसे केले जात आहेत, असा आक्षेप घेतला. त्यावर नगरसचिवांनी खुलासा केला. ते म्हणाले, आयुक्तांनी विषय मागे घेतले असले तरी हा विषय सभेच्या पटलावर आहे़ याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार सर्वसाधारण सभेचा आहे. त्यामुळे सभागृहाने निर्णय घ्यावा, असे सांगितले.नगरसेवक अजित गव्हाणे म्हणाले, ‘‘वर्गीकरणाचे विषय तातडीची बाब म्हणून दाखल करून घेणे चुकीचे आहे. वर्गीकरणाचे विषय मागे घेणे प्रशासनाची मोठी चूक आहे. आयुक्त सत्ताधाºयांच्या दबावाखाली कामकाज करत असल्याचे दिसून येत आहे. आजपर्यंतच्या प्रत्येक आयुक्तांनी कामाची छाप पाडली. मात्र, हर्डीकर यांना अद्यापपर्यंत कामाची छाप पाडता आली नाही. ’’जनतेची मागणी नसताना रस्ते कशासाठी? आमच्याकडे डांबरीकरणावर ११ कोटींचा खर्च केला आहे, असे संजय वाबळे यांनी सांगितले. सर्वांना निधी मिळावा, अशी मागणी जावेद शेख यांनी केली. ‘आयुक्तांवर आणि महापौरांवर कोणताही दबाव नाही. दबाव काय असतो. ते यापूर्वीच्या महापौरांना विचारा, त्यांना गोळ्या खाव्या लागत होत्या, असे उषा मुंडे म्हणाल्या. प्रियंका बारसे यांनी प्रभागातील रस्त्याची समस्या मांडली.विलास मडिगेरी म्हणाले, ‘‘कोणाचाही निधी पळविलेला नाही. ही अखर्चित रक्कम होती.’’आयुक्त एखादा विषय आणतात पुन्हा मागे घेतात. हा काय प्रकार आहे. याचा खुलासा व्हावा. आयुक्तांनी माघारी घेण्याचे पत्र दिले असतानादेखील सत्ताधारी विषय कसा काय? मंजूर करून घेऊ शकतात. सत्ताधाºयांकडून चुकीच्या पद्धतीने सभागृह चालविले जात आहे. प्रत्येक सभेत उपसूचनांचा पाऊस पडत आहे. वर्गीकरणाच्या विषयाला राष्ट्रवादी काँग्रेसचा तीव्र विरोध आहे. सत्ताधाºयांनी रीतसर विषयपत्रिकेवर विषय आणावेत.- दत्ता साने, विरोधी पक्षनेतेआमच्याकडे माणूस, पक्ष पाहून वर्गीकरण केले जात नाही. अर्थसंकल्पात सर्वांना निधी देण्याचा प्रयत्न केला आहे. शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणत्याही वॉर्डाचा निधी पळविलेला अखर्चित रकमेचे नियोजन केले आहे. रस्त्यांवरील खर्च कमी करण्यासाठी सिमेंटच्या रस्त्याबाबत धोरण होणे गरजेचे आहे. प्रस्तावाच्या बाजूने ६६ तर विरोधात ३७ मते पडली. त्यानंतर विषय मंजूर केला.- एकनाथ पवार, सत्तारूढ पक्षनेते