शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

ग्राहक करू शकणार लोकपालकडे तक्रार

By admin | Updated: June 8, 2015 05:31 IST

राज्यात अजूनही विजेच्या समस्या कमी होत नसल्याने आणि ग्राहकांच्या समस्या वेळेवर सोडविल्या जात नसल्याने वीज कंपनीने पुढाकार घेत विद्युत लोकपाल या पदाची स्थापना केली आहे.

पिंपरी : राज्यात अजूनही विजेच्या समस्या कमी होत नसल्याने आणि ग्राहकांच्या समस्या वेळेवर सोडविल्या जात नसल्याने वीज कंपनीने पुढाकार घेत विद्युत लोकपाल या पदाची स्थापना केली आहे. तक्रार निवारण कक्ष (आयजीआरसी), ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंच (सीजीआरएफ) यांच्याकडे ग्राहकाच्या समस्येचे निराकरण न झाल्यास आता ग्राहक थेट विद्युत लोकपालकडे धाव घेऊ शकणार आहे. तेथे ६० दिवसांत ग्राहकास न्याय मिळणार आहे.विद्युत लोकपालच्या कार्यालयाची स्थापना मुंबई येथे झाली असून, त्याची कार्यकक्षा १५ जिह्यांसाठी आहे. मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्याचे काम मुंबई विद्युत लोकपाल पाहणार आहेत, तर उर्वरित सर्व जिल्ह्यांंचे काम नागपूर विद्युत लोकपाल पाहणार आहे, अशी माहिती मुंबई विभागाचे विद्युत लोकपाल आर. डी. संख्ये यांनी दिली. महावितरणचे मुख्य अभियंता नीलकंठ वाडेकर, जिल्हा वीज ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष शहाजी शेळके आदी या वेळी उपस्थित होते. संख्ये म्हणाले, तक्रारदाराने प्रथम आयजीआरसी यांच्याकडे तक्रार दाखल करावी. तेथे दोन महिन्यांत कोणतीही कारवाई झाली नाही, तर सीजीआरएफमध्ये तक्रार नोंदवावी. तिथेही तक्रारदाराचे समाधान न झाल्यास ६० दिवसांच्या आत ग्राहकाने विद्युत लोकपालकडे तक्रार नोंदविणे गरजेचे आहे. त्यानंतर ६० दिवसांच्या आत लोकपाल तक्रारदाराच्या तक्रारीचे निवारण करेल. विद्युत लोकपालकडे तक्रार दाखल करताना अर्जासोबत सीजीआरएफच्या आदेशाची प्रत असणे बंधनकारक आहे. तसेच तक्रार दाखल करताना कोणत्याही प्रकारची रक्कम अथवा शुल्क आकारण्यात येत नाही. विद्युत लोकपालसमोर सुनावणीदरम्यान ग्राहकाला तसेच कंपनीला वकील नेमता येणार नाही. ग्राहकाला आपली बाजू स्वत: किंवा प्रतिनिधीद्वारे मांडता येऊ शकणार आहे. (प्रतिनिधी) अडीच कोटींच्या ग्राहकांमधून केवळ २ हजार तक्रारीराज्यात २ कोटी ६५ लाख वीज ग्राहक आहेत. मात्र गतवर्षात फक्त २००० तक्रारी ग्राहकांनी दाखल केल्या. याचा अर्थ वीज ग्राहकांमध्ये जनजागृतीची कमी आहे. विजेसंदर्भातील तक्रारी ग्राहकांनी नोंदवायला हव्यात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे गरजेचे आहे, असे आर. डी. संख्ये यांनी सांगितले.