शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

बंद सिग्नल, आयलँडमुळे रावेतमध्ये वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 01:58 IST

पुरेसे पोलीस कर्मचारी उपलब्ध करून कार्यान्वित होणार स्वतंत्र वाहतूक विभाग

रावेत : वाहनांची दररोज वाढणारी संख्या, पार्किंगचा प्रश्न, सततची वाहतूककोंडी या समस्यांमुळे रावेत येथील नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत. त्यातच लाखो रुपये खर्च करून येथील मुख्य चौकांमध्ये वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्यात आले आहेत. मात्र हे वाहतूक नियंत्रक दिवे केवळ शोभेचे झाले आहेत. तसेच येथील मुख्य चौकांतील काही आयलँडमुळे या भागात वाहतूककोंडी होत आहे. यावर उपाययोजनांची मागणी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यानुसार वाहतूक नियमनासाठी पुरेसे पोलीस कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच या भागासाठी स्वतंत्र वाहतूक विभागही कार्यान्वित करण्यात येणार आहे.रावेत उपनगरातील संत तुकाराममहाराज पुलाशेजारील बीआरटी चौक, रावेत प्राधिकरण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि आकुर्डी रेल्वे स्टेशन लगतचा धर्मराज चौक येथे लाखो रुपये खर्च करून उभारलेली वाहतूक नियंत्रक दिव्यांची यंत्रणा बंद आहे. त्यामुळे येथील वाहतूक खोळंबण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातून वाहतुकीच्या समस्या वाढल्या आहेत. विशेषत: चौकात रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांची कसरत होत आहे. वाहतुकीची समस्या सोडवा, अशी मागणी नागरिकांची आहे.रावेत उपनगराचा विस्तार वाढत आहे. वाढीव हद्दीत योग्य नियोजन होऊ शकते हद्दीतील बाजारपेठांमध्ये व्यापार संकुल उभारताना वाहनतळासाठी जागा ठेवणे सक्तीचे करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. विविध चौकांत वाहतूक नियंत्रक दिवे बसविले आहेत. हे दिवे केवळ शोभेचे असल्याची टीका नागरिकांनी केली आहे. हे दिवे सुरू नसल्याने वाहनांवर, वाहनांच्या गर्दीवर नियंत्रण होत नसल्याचे चित्र आहे. परिसरातील सर्वच रस्त्यांवर दुतर्फा वाहने लावली जातात. सायकलवर जाणारे विद्यार्थी तसेच वाहनचालकांची बीआरटी चौकात मोठी गर्दी होते. त्यातच वाहतूक नियंत्रक दिवे बंद असल्याने नियंत्रण नसलेले वाहनचालक पुढे जाण्याच्या शर्यतीमधून वाहने चालवितात. या वेळी विद्यार्थी, पादचारी यांना अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. या चौकासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि धर्मराज चौकातदेखील हेच चित्र आहे. विशेषत: आठवडेबाजाराच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते.आकुर्डी रेल्वे स्थानकापासून धर्मराज चौकाजवळ असल्याने या चौकात कायम गर्दी असते. चौकामध्ये लोकल रेल्वे आल्यानंतर तसेच या मार्गावरील महाविद्यालय सुटल्यानंतर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होते. त्या वेळी भरचौकात एकच गर्दी होते. या वेळी वाहतूक ठप्प होण्याची वेळ येते.पोलीस आयुक्तांनीच लक्ष घालण्याची मागणीअत्यंत वर्दळीच्या या रस्त्यावर वाहतूक नियंत्रण दिवे उभारले असले तरी नागरिकांकडूनही त्याची अंमलबजावणी होत नाही. याठिकाणी वाहतूक पोलीस नसल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. काही दिवसांपासून या चौकात अनेक किरकोळ अपघात झाले आहेत. येथील वाहतूक नियंत्रण दिव्यांचा वापर योग्य होण्यासाठी पोलीस आयुक्तांनीच लक्ष द्यालावे, अशी मागणी होत आहे.वाहनांची या मार्गावर दिवसभर मोठी वर्दळ सुरू असते. परंतु रस्ता ओलांडायच्या घाईमुळे दररोज लहान-मोठ्या अपघातांमध्ये वाढ होत आहे. येथील मुख्य चौकातील वाहतूक नियंत्रण दिवे सतत बंद असतात. वाहतूक नियमनासाठी पोलीस कर्मचाºयांची नेमणूकही करण्यात आलेली नाही. नवीन पोलीस आयुक्तालय झाल्याने या भागासाठी स्वतंत्र वाहतूक विभाग सुरू करावा़ - श्रीकांत धनगर, अध्यक्ष,जय मल्हार प्रतिष्ठान, रावेतनवीन पोलीस आयुक्तालय झाल्यापासून धर्मराज चौक चिंचवड विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. या चौकातील तीन आयलँडमुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. आयलँडमुळे येथील नियंत्रण दिवे बंद ठेवण्यात आले आहेत. याबाबत महापालिका प्रशासनास कळविण्यात आले आहे. या चौकातील आयलँड महापालिका लवकरच हलविणार आहे. येथे जुन्या बोगद्यामधून एकेरी वाहतूक सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.- संजीव पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, चिंचवडरावेत येथील विविध मुख्य चौकातील वाहतूक नियंत्रण यंत्रणा कधीही सुरुळीतपणे चालू नसते़ त्यामुळे नागरिक विशेषत: तरुण वर्ग वाहतुकीचे नियम तोडतात. फक्त यंत्रणा बसवून उपयोग नाही तर नागरिकांकडून वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे. या चौकात वाहतूक विभागाचे कर्मचारी दररोज नियमित नियुक्त करावेत.- अक्षय रामदास भोंडवे, स्थानिक युवकदेहूरोड आणि तळेगाव विभागासाठी स्वतंत्र वाहतूक विभागाची स्थापना करण्यात आली असून, पोलीस निरीक्षकांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. या विभागासाठी आवश्यक असणाºया कर्मचाºयांची नियुक्तीही लवकरच करण्यात येईल. या भागासाठी स्वतंत्र वाहतूक विभाग कार्यान्वित होणार आहे. त्यांनतर या भागातील वाहतुकीचा प्रश्न सुटेल. बंद अवस्थेतील वाहतूक नियंत्रण दिवे तत्काळ सुरू करण्यात येतील. - विनायक ढाकणे,सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक विभागसकाळी व सायंकाळी या चौकात रस्ता ओलांडण्यासाठी विद्यार्थी व नागरिकांना कसरत करावी लागते. वाहनचालकांच्या वेगामुळे पायी चालणाºयांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. नियमांचे पालन न करणाºया वाहनचालकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. - विनोद राठोड, स्थानिक नागरिक

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीravetरावेत