शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

बंद सिग्नल, आयलँडमुळे रावेतमध्ये वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 01:58 IST

पुरेसे पोलीस कर्मचारी उपलब्ध करून कार्यान्वित होणार स्वतंत्र वाहतूक विभाग

रावेत : वाहनांची दररोज वाढणारी संख्या, पार्किंगचा प्रश्न, सततची वाहतूककोंडी या समस्यांमुळे रावेत येथील नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत. त्यातच लाखो रुपये खर्च करून येथील मुख्य चौकांमध्ये वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्यात आले आहेत. मात्र हे वाहतूक नियंत्रक दिवे केवळ शोभेचे झाले आहेत. तसेच येथील मुख्य चौकांतील काही आयलँडमुळे या भागात वाहतूककोंडी होत आहे. यावर उपाययोजनांची मागणी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यानुसार वाहतूक नियमनासाठी पुरेसे पोलीस कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच या भागासाठी स्वतंत्र वाहतूक विभागही कार्यान्वित करण्यात येणार आहे.रावेत उपनगरातील संत तुकाराममहाराज पुलाशेजारील बीआरटी चौक, रावेत प्राधिकरण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि आकुर्डी रेल्वे स्टेशन लगतचा धर्मराज चौक येथे लाखो रुपये खर्च करून उभारलेली वाहतूक नियंत्रक दिव्यांची यंत्रणा बंद आहे. त्यामुळे येथील वाहतूक खोळंबण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातून वाहतुकीच्या समस्या वाढल्या आहेत. विशेषत: चौकात रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांची कसरत होत आहे. वाहतुकीची समस्या सोडवा, अशी मागणी नागरिकांची आहे.रावेत उपनगराचा विस्तार वाढत आहे. वाढीव हद्दीत योग्य नियोजन होऊ शकते हद्दीतील बाजारपेठांमध्ये व्यापार संकुल उभारताना वाहनतळासाठी जागा ठेवणे सक्तीचे करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. विविध चौकांत वाहतूक नियंत्रक दिवे बसविले आहेत. हे दिवे केवळ शोभेचे असल्याची टीका नागरिकांनी केली आहे. हे दिवे सुरू नसल्याने वाहनांवर, वाहनांच्या गर्दीवर नियंत्रण होत नसल्याचे चित्र आहे. परिसरातील सर्वच रस्त्यांवर दुतर्फा वाहने लावली जातात. सायकलवर जाणारे विद्यार्थी तसेच वाहनचालकांची बीआरटी चौकात मोठी गर्दी होते. त्यातच वाहतूक नियंत्रक दिवे बंद असल्याने नियंत्रण नसलेले वाहनचालक पुढे जाण्याच्या शर्यतीमधून वाहने चालवितात. या वेळी विद्यार्थी, पादचारी यांना अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. या चौकासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि धर्मराज चौकातदेखील हेच चित्र आहे. विशेषत: आठवडेबाजाराच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते.आकुर्डी रेल्वे स्थानकापासून धर्मराज चौकाजवळ असल्याने या चौकात कायम गर्दी असते. चौकामध्ये लोकल रेल्वे आल्यानंतर तसेच या मार्गावरील महाविद्यालय सुटल्यानंतर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होते. त्या वेळी भरचौकात एकच गर्दी होते. या वेळी वाहतूक ठप्प होण्याची वेळ येते.पोलीस आयुक्तांनीच लक्ष घालण्याची मागणीअत्यंत वर्दळीच्या या रस्त्यावर वाहतूक नियंत्रण दिवे उभारले असले तरी नागरिकांकडूनही त्याची अंमलबजावणी होत नाही. याठिकाणी वाहतूक पोलीस नसल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. काही दिवसांपासून या चौकात अनेक किरकोळ अपघात झाले आहेत. येथील वाहतूक नियंत्रण दिव्यांचा वापर योग्य होण्यासाठी पोलीस आयुक्तांनीच लक्ष द्यालावे, अशी मागणी होत आहे.वाहनांची या मार्गावर दिवसभर मोठी वर्दळ सुरू असते. परंतु रस्ता ओलांडायच्या घाईमुळे दररोज लहान-मोठ्या अपघातांमध्ये वाढ होत आहे. येथील मुख्य चौकातील वाहतूक नियंत्रण दिवे सतत बंद असतात. वाहतूक नियमनासाठी पोलीस कर्मचाºयांची नेमणूकही करण्यात आलेली नाही. नवीन पोलीस आयुक्तालय झाल्याने या भागासाठी स्वतंत्र वाहतूक विभाग सुरू करावा़ - श्रीकांत धनगर, अध्यक्ष,जय मल्हार प्रतिष्ठान, रावेतनवीन पोलीस आयुक्तालय झाल्यापासून धर्मराज चौक चिंचवड विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. या चौकातील तीन आयलँडमुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. आयलँडमुळे येथील नियंत्रण दिवे बंद ठेवण्यात आले आहेत. याबाबत महापालिका प्रशासनास कळविण्यात आले आहे. या चौकातील आयलँड महापालिका लवकरच हलविणार आहे. येथे जुन्या बोगद्यामधून एकेरी वाहतूक सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.- संजीव पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, चिंचवडरावेत येथील विविध मुख्य चौकातील वाहतूक नियंत्रण यंत्रणा कधीही सुरुळीतपणे चालू नसते़ त्यामुळे नागरिक विशेषत: तरुण वर्ग वाहतुकीचे नियम तोडतात. फक्त यंत्रणा बसवून उपयोग नाही तर नागरिकांकडून वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे. या चौकात वाहतूक विभागाचे कर्मचारी दररोज नियमित नियुक्त करावेत.- अक्षय रामदास भोंडवे, स्थानिक युवकदेहूरोड आणि तळेगाव विभागासाठी स्वतंत्र वाहतूक विभागाची स्थापना करण्यात आली असून, पोलीस निरीक्षकांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. या विभागासाठी आवश्यक असणाºया कर्मचाºयांची नियुक्तीही लवकरच करण्यात येईल. या भागासाठी स्वतंत्र वाहतूक विभाग कार्यान्वित होणार आहे. त्यांनतर या भागातील वाहतुकीचा प्रश्न सुटेल. बंद अवस्थेतील वाहतूक नियंत्रण दिवे तत्काळ सुरू करण्यात येतील. - विनायक ढाकणे,सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक विभागसकाळी व सायंकाळी या चौकात रस्ता ओलांडण्यासाठी विद्यार्थी व नागरिकांना कसरत करावी लागते. वाहनचालकांच्या वेगामुळे पायी चालणाºयांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. नियमांचे पालन न करणाºया वाहनचालकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. - विनोद राठोड, स्थानिक नागरिक

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीravetरावेत