शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
3
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
4
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
6
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
7
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
8
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
9
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
10
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
11
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
12
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
13
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
14
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
15
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
16
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
17
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
18
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
19
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
20
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश

स्वच्छता पंधरवड्यानंतरही अस्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 00:04 IST

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड : स्वच्छता कधी होणार? नागरिकांचा सवाल

देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने केंद्र शासनाच्या संरक्षण विभागाच्या निर्देशानुसार १५ सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंतीपर्यंत ‘स्वच्छता ही सेवा’ हा संदेश देत स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता पंधरवडा राबविण्यात आला. मात्र, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीच्या विविध भागातील स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. कॅन्टोन्मेंट रुग्णालय व शाळांच्या परिसरातील स्वच्छताही पंधरवड्यात होऊ शकलेली नाही. शौचालये, स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्याकडे, तसेच अनेक महिन्यांपासून वर्दळीच्या रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी रोखण्याकडे व वर्दळीच्या मुख्य रस्त्यालगत असणारे गवत, झाडेझुडपे काढण्याकडेही दुर्लक्ष झाल्याने या परिसराची स्वच्छता कधी होणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालय प्रांगणात आमदार संजय भेगडे यांच्या उपस्थितीत स्वच्छता पंधरवड्याला १५ सप्टेंबरला सुरुवात करण्यात आली होती. मंगळवारी गांधी जयंतीच्या दिवशी बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर ओ पी वैष्णव यांच्या उपस्थितीत महात्मा गांधी प्राथमिक शाळेत स्वच्छता पंधरवड्याची सांगता झाली. संरक्षण विभागाकडील निर्देशानुसार १५ दिवसांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. मात्र, निश्चित केलेला सर्व कार्यक्रम राबविण्यात आलेला नाही. अभियानात नागरिकांचा सहभाग घेणे अपेक्षित असताना त्या दृष्टीने ठोस पावले उचलण्यात आल्याचे निदर्शनास आले नाही. स्वच्छता पंधरवड्याचा सांगता कार्यक्रमही नागरिकांशिवाय पार पडला.

स्वच्छता पंधरवड्याचा केवळ सोपस्कार पार पाडताना पहिल्या दिवशी झालेल्या रॅलीचे ‘फोटोसेशन’ झाले. त्यानंतर विविध वार्डांतील शाळांच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता जनजागृतीसाठी रॅली काढून पथनाट्य सादर केले. अभियानात कचरा साफसफाई व कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष झाले असून, अद्यापही विविध भागात कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. शौचालयांकडे जाणाºया रस्त्यांची सफाई झालेली नाही. रस्त्यालगत झाडेझुडपे तशीच आहेत. शौचालयांच्या आजूबाजूचा परिसर अस्वच्छ असून, अनेक ठिकाणी राडारोडा पडलेला आहे. विकासनगर रस्त्याच्या बाजूला लोखंडी जाळीलगत सार्वजनिक मोकळ्या जागी टाकण्यात येत असलेला कचरा उचललेला नाही. चिंचोली येथे मुख्य बसथांब्याजवळ चिंचोलीचा फलक व कॅन्टोन्मेंट बोर्डाचा जनजागृतीचा अर्ध्याहून अधिक फलक झाडात झाकला गेला असून तेथे साफसफाई करण्यात आलेली नाही. विकासनगरकडे जाणाºया रस्त्यावर असलेली कुंडी गेले काही दिवस उचलली नसल्याने दुर्गंधीने येथून नाक मुठीत धरून जावे लागत आहे.सांडपाणी वाहतेय रस्त्यावरदेहूरोड दूरध्वनी केंद्राकडून संकल्पनगरी भागात जाणाºया रस्त्यावर सांडपाणी वाहत असून, अभियानाच्या १५ दिवसांतसुद्धा सांडपाणी रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आली नसल्याने नागरिकांना त्यातूनच मार्ग काढत नियमित ये-जा करावी लागत आहे. देहूरोडकडून शितळानगरकडे जाणाºया मुख्य रस्त्यावर विविध ठिकाणी सांडपाणी वाहत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. स्वच्छता अभियानात १७ दिवसांत सफाई झाली नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत असून, येथे स्वच्छता होणार का, असा सवाल उपस्थित करीत आहेत. पुरेशी शौचालये उपलब्ध करून देण्याची गरजकॅन्टोन्मेंट बोर्डाने देहूरोड हगणदारीमुक्त झाल्याची घोषणा गेल्या वर्षी केली आहे. वास्तविक लोकसंख्येच्या प्रमाणात आणखी शौचालयांची गरज असून, त्या प्रमाणात शौचालये उपलब्ध करून देण्यासाठी निश्चित कार्यकाळ ठरविण्याची गरज व्यक्त होत आहे. स्वच्छता पंधरवडा सांगता कार्यक्रमात (मंगळवारी) मनोगत व्यक्त करताना कॅन्टोन्मेंटच्या उपाध्यक्षा सारिका नाईकनवरे यांनीही जाहीरपणे वॉर्ड क्रमांक २,३ व ४ मध्ये पुरेशी शौचालये उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड