शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

नागरिक उदासीन, प्रशासनही ढिम्म

By admin | Updated: April 24, 2017 04:46 IST

इंद्रायणी नदीच्या तीरावर देहू आणि आळंदी ही वारकरी सांप्रदायात अतिशय महत्त्व असलेली तीर्थक्षेत्र वसली आहेत. त्यामुळेच वर्षभर

शशिकांत जाधव / तळवडेइंद्रायणी नदीच्या तीरावर देहू आणि आळंदी ही वारकरी सांप्रदायात अतिशय महत्त्व असलेली तीर्थक्षेत्र वसली आहेत. त्यामुळेच वर्षभर या दोन्ही तीर्थक्षेत्रांची वारी करणारे वारकरी पवित्र अशा इंद्रायणी नदीत स्नान करून धन्य होत असतात. नदीला भारतीय संस्कृतीत मातेसमान मानले जाते. माता लेकराचे अपराध पोटात घालते. त्यामुळेच की नदी प्रदूषण वाढविण्यात मानव कशाचीही कसर ठेवत नाही. इंद्रायणीच्याही उदरात सर्रास कचरा टाकला जातो. सांडपाणी सोडले जात आहे. तळवडे येथे इंद्रायणी नदीवर बंधारा घालून साठविलेल्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी करण्यात येतो. त्यामुळे परिसरातील शेकडो एकर क्षेत्र ओलिताखाली आहे. या बंधाऱ्यातून सतत पाण्याचा निचरा होत असल्याने इंद्रायणीची एक धार बाराही महिने सुरू असते. इंद्रायणीवर निघोजे ते तळवडे असा पूल उभारल्यामुळे येथून होणारे दळणवळण वाढले आहे. याच पुलाच्या जवळून थेट इंद्रायणी पात्रात वाहने उतरत असतात आणि बाराही महिने येथील नदीपात्रात बिनदिक्कतपणे वाहने धुतली जात असतात, सुमारे दोनशे ते अडीचशे वाहने दिवसभरात येथे धुतली जात असावीत, यामध्ये छोट्या-मोठ्या बस, कार, टेम्पो, ट्रक आणि कंटेनर्स आदी सर्व प्रकारची वाहने थेट नदीच्या पाण्यात धुतल्याने यातील सांडणारे आॅईल, पेट्रोल आदी रासायनिक पदार्थ, तसेच माती, कपडे, वाहनातील टाकाऊ पदार्थांमुळे पाण्याच्या प्रदूषणात दिवसेंदिवस कमालीची वाढ होत आहे.इंद्रायणी परिसरातही खूप मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असतो. जाणारे-येणारे प्रवासी घरगुती कचरा परिसरात टाकत असतात. परिसरातील हॉटेलमध्ये उरलेले शिळे अन्न, लघुउद्योगात तयार होणारा टाकाऊ कचरा, निर्माल्य आदी प्रकारचा कचरा सातत्याने टाकला जात असतो. लघुउद्योगातील कचरा बऱ्याच वेळा वाहनात भरून नदी परिसरात आणून टाकला जात असल्याने परिसरात कचऱ्याचे ढीग लागलेले असतात. यामुळे येथील निसर्गरम्य परिसराचे रूपांतर कचऱ्याच्या मैदानात होऊ पाहत आहे.गणेशोत्सव, तसेच दुर्गोत्सव आदी काळात खूप मोठ्या प्रामाणात मूर्ती विसर्जनासाठी येत असतात. याच काळात निर्माल्यही मोठ्या प्रमाणात नदीपात्रात येत असतात. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे.