शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

नागरिक उदासीन, प्रशासनही ढिम्म

By admin | Updated: April 24, 2017 04:46 IST

इंद्रायणी नदीच्या तीरावर देहू आणि आळंदी ही वारकरी सांप्रदायात अतिशय महत्त्व असलेली तीर्थक्षेत्र वसली आहेत. त्यामुळेच वर्षभर

शशिकांत जाधव / तळवडेइंद्रायणी नदीच्या तीरावर देहू आणि आळंदी ही वारकरी सांप्रदायात अतिशय महत्त्व असलेली तीर्थक्षेत्र वसली आहेत. त्यामुळेच वर्षभर या दोन्ही तीर्थक्षेत्रांची वारी करणारे वारकरी पवित्र अशा इंद्रायणी नदीत स्नान करून धन्य होत असतात. नदीला भारतीय संस्कृतीत मातेसमान मानले जाते. माता लेकराचे अपराध पोटात घालते. त्यामुळेच की नदी प्रदूषण वाढविण्यात मानव कशाचीही कसर ठेवत नाही. इंद्रायणीच्याही उदरात सर्रास कचरा टाकला जातो. सांडपाणी सोडले जात आहे. तळवडे येथे इंद्रायणी नदीवर बंधारा घालून साठविलेल्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी करण्यात येतो. त्यामुळे परिसरातील शेकडो एकर क्षेत्र ओलिताखाली आहे. या बंधाऱ्यातून सतत पाण्याचा निचरा होत असल्याने इंद्रायणीची एक धार बाराही महिने सुरू असते. इंद्रायणीवर निघोजे ते तळवडे असा पूल उभारल्यामुळे येथून होणारे दळणवळण वाढले आहे. याच पुलाच्या जवळून थेट इंद्रायणी पात्रात वाहने उतरत असतात आणि बाराही महिने येथील नदीपात्रात बिनदिक्कतपणे वाहने धुतली जात असतात, सुमारे दोनशे ते अडीचशे वाहने दिवसभरात येथे धुतली जात असावीत, यामध्ये छोट्या-मोठ्या बस, कार, टेम्पो, ट्रक आणि कंटेनर्स आदी सर्व प्रकारची वाहने थेट नदीच्या पाण्यात धुतल्याने यातील सांडणारे आॅईल, पेट्रोल आदी रासायनिक पदार्थ, तसेच माती, कपडे, वाहनातील टाकाऊ पदार्थांमुळे पाण्याच्या प्रदूषणात दिवसेंदिवस कमालीची वाढ होत आहे.इंद्रायणी परिसरातही खूप मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असतो. जाणारे-येणारे प्रवासी घरगुती कचरा परिसरात टाकत असतात. परिसरातील हॉटेलमध्ये उरलेले शिळे अन्न, लघुउद्योगात तयार होणारा टाकाऊ कचरा, निर्माल्य आदी प्रकारचा कचरा सातत्याने टाकला जात असतो. लघुउद्योगातील कचरा बऱ्याच वेळा वाहनात भरून नदी परिसरात आणून टाकला जात असल्याने परिसरात कचऱ्याचे ढीग लागलेले असतात. यामुळे येथील निसर्गरम्य परिसराचे रूपांतर कचऱ्याच्या मैदानात होऊ पाहत आहे.गणेशोत्सव, तसेच दुर्गोत्सव आदी काळात खूप मोठ्या प्रामाणात मूर्ती विसर्जनासाठी येत असतात. याच काळात निर्माल्यही मोठ्या प्रमाणात नदीपात्रात येत असतात. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे.