शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
4
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
5
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
6
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
7
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
8
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
9
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
10
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
11
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
12
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
13
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
14
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
15
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
16
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
17
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
18
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
19
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
20
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा

नागरिक उदासीन, प्रशासनही ढिम्म

By admin | Updated: April 24, 2017 04:46 IST

इंद्रायणी नदीच्या तीरावर देहू आणि आळंदी ही वारकरी सांप्रदायात अतिशय महत्त्व असलेली तीर्थक्षेत्र वसली आहेत. त्यामुळेच वर्षभर

शशिकांत जाधव / तळवडेइंद्रायणी नदीच्या तीरावर देहू आणि आळंदी ही वारकरी सांप्रदायात अतिशय महत्त्व असलेली तीर्थक्षेत्र वसली आहेत. त्यामुळेच वर्षभर या दोन्ही तीर्थक्षेत्रांची वारी करणारे वारकरी पवित्र अशा इंद्रायणी नदीत स्नान करून धन्य होत असतात. नदीला भारतीय संस्कृतीत मातेसमान मानले जाते. माता लेकराचे अपराध पोटात घालते. त्यामुळेच की नदी प्रदूषण वाढविण्यात मानव कशाचीही कसर ठेवत नाही. इंद्रायणीच्याही उदरात सर्रास कचरा टाकला जातो. सांडपाणी सोडले जात आहे. तळवडे येथे इंद्रायणी नदीवर बंधारा घालून साठविलेल्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी करण्यात येतो. त्यामुळे परिसरातील शेकडो एकर क्षेत्र ओलिताखाली आहे. या बंधाऱ्यातून सतत पाण्याचा निचरा होत असल्याने इंद्रायणीची एक धार बाराही महिने सुरू असते. इंद्रायणीवर निघोजे ते तळवडे असा पूल उभारल्यामुळे येथून होणारे दळणवळण वाढले आहे. याच पुलाच्या जवळून थेट इंद्रायणी पात्रात वाहने उतरत असतात आणि बाराही महिने येथील नदीपात्रात बिनदिक्कतपणे वाहने धुतली जात असतात, सुमारे दोनशे ते अडीचशे वाहने दिवसभरात येथे धुतली जात असावीत, यामध्ये छोट्या-मोठ्या बस, कार, टेम्पो, ट्रक आणि कंटेनर्स आदी सर्व प्रकारची वाहने थेट नदीच्या पाण्यात धुतल्याने यातील सांडणारे आॅईल, पेट्रोल आदी रासायनिक पदार्थ, तसेच माती, कपडे, वाहनातील टाकाऊ पदार्थांमुळे पाण्याच्या प्रदूषणात दिवसेंदिवस कमालीची वाढ होत आहे.इंद्रायणी परिसरातही खूप मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असतो. जाणारे-येणारे प्रवासी घरगुती कचरा परिसरात टाकत असतात. परिसरातील हॉटेलमध्ये उरलेले शिळे अन्न, लघुउद्योगात तयार होणारा टाकाऊ कचरा, निर्माल्य आदी प्रकारचा कचरा सातत्याने टाकला जात असतो. लघुउद्योगातील कचरा बऱ्याच वेळा वाहनात भरून नदी परिसरात आणून टाकला जात असल्याने परिसरात कचऱ्याचे ढीग लागलेले असतात. यामुळे येथील निसर्गरम्य परिसराचे रूपांतर कचऱ्याच्या मैदानात होऊ पाहत आहे.गणेशोत्सव, तसेच दुर्गोत्सव आदी काळात खूप मोठ्या प्रामाणात मूर्ती विसर्जनासाठी येत असतात. याच काळात निर्माल्यही मोठ्या प्रमाणात नदीपात्रात येत असतात. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे.