शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

शहरवासीयांनी दाखवावी सजगता

By admin | Updated: January 6, 2016 00:32 IST

राज्यातील आठ विभागांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभाग आघाडीवर आहे. तक्रारींची दखल घेऊन लाचखोरांवर कारवाई करण्यात पुणे विभागाने आघाडी घेतली असली

पिंपरी : राज्यातील आठ विभागांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभाग आघाडीवर आहे. तक्रारींची दखल घेऊन लाचखोरांवर कारवाई करण्यात पुणे विभागाने आघाडी घेतली असली, तरी पिंपरी-चिंचवडकरांचे तक्रारीचे प्रमाण अत्यल्प आहे. गतवर्षात या शहरातील केवळ तीन तक्रारी दाखल झाल्या आहेत. नागरिकांनी पुढाकार घेऊन सजगता दाखविल्यास पिंपरी-चिंचवडमधील लाचखोरांवर कारवाई करणे शक्य होईल, असा विश्वास लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. रोटरी क्लब आॅफ आकुर्डी-पुणे शाखेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अधीक्षक सरदेशपांडे बोलत होते. ते म्हणाले, ‘‘२०१४ या आर्थिक वर्षात संपूर्ण राज्यात आठ विभागांच्या वतीने १२१५ ठिकाणी सापळे लावून लाचखोरांवर कारवाई केली, तर २०१५ या वर्षात लाचखोरांवर कारवाई केल्याची १२३४ प्रकरणे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाने या कार्यालयाच्या कार्यकक्षेत येणाऱ्या पाच जिल्ह्यांत केलेली कामगिरी राज्यातील अन्य सात विभागांच्या तुलनेने चांगली आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, सांगली आदी ठिकाणी २०१४ मध्ये २१३ ठिकाणी सापळे रचून कारवाई केली होती. तर २०१५ मध्ये २१७ ठिकाणी सापळे रचून यशस्वी कारवाई केली. अधिकाऱ्यांकडे, लोकसेवकाकडे एजंट म्हणून काम करणाऱ्यांविरुद्ध या विभागामार्फत कारवाई केली जाते. अशा व्यक्तींबद्दलच्या तक्रारी देण्यास नागरिकांना पुढाकार घ्यावा. लाच देणे आणि घेणे दोन्ही कृत्यांसाठी कारवाई होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी लाच देऊन कामे करवून न घेता, रीतसर नियमानुसार कामे करवून घेण्यास प्राधान्य द्यावे.या वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक श्रीहरी पाटील,अनघा देशपांडे, पोलीस निरीक्षक जालिंदर तांदळे, पोलीस कर्मचारी दीपक टिळेकर यांच्यासह आकुर्डी रोटरी क्लबचे अध्यक्ष राकेश आगरवाल, सचिव आनंद आगरवाल, जसविंदर सोनी, रवी नामदे, सचिन पारेख आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)