शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

चिंचवड : बावीस दिवसांत १०० जणांवर हल्ला, कुत्री पकडणारी यंत्रणा अदृश्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 05:09 IST

पालिका प्रशासनाने शहरातील कुत्री पकडण्यासाठी ३ संस्थांना नियुक्त केले आहे. मात्र शहरातील भटक्या कुत्र्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. भटक्या कुत्र्याने हल्ला केल्यामुळे २२ दिवसांत १०२ नागरिक जखमी झाल्याचा प्रकार चिंचवडमध्ये उघड झाला आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी होणा-या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कुत्री पकडणारी यंत्रणा अदृश्य झाली की काय, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

चिंचवड : पालिका प्रशासनाने शहरातील कुत्री पकडण्यासाठी ३ संस्थांना नियुक्त केले आहे. मात्र शहरातील भटक्या कुत्र्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. भटक्या कुत्र्याने हल्ला केल्यामुळे २२ दिवसांत १०२ नागरिक जखमी झाल्याचा प्रकार चिंचवडमध्ये उघड झाला आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी होणा-या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कुत्री पकडणारी यंत्रणा अदृश्य झाली की काय, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.शहरातील विविध भागांत भटकी कुत्री सहज दृष्टिपथास येत आहेत. कचराकुंड्यांपासून ते गल्लीबोळातील रस्त्यांवर भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे.त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने तीन संस्थांना कुत्री पकडण्याचाठेका दिला आहे. वॉर्डनिहाय याची नियुक्ती करण्यात आली आहे.अजून एका संस्थेला यात समाविष्ट करण्याचा विचार सध्या या विभागात सुरू आहे.शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी शस्त्रक्रिया केली जाते. यानंतर त्यांना पुन्हा सोडून दिले जाते. मात्र या प्रक्रियेत सावळा गोंधळ असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. चिंचवडमध्ये चालू वर्षातील २२ दिवसांत १०२ नागरिकांना भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याची नोंद पालिकेच्या तालेरा रुग्णालयात झाली आहे.पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. कित्येक भागात वर्षभरापासून कुत्री पकडणारी यंत्रणा आली नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. ज्या संस्थांना कुत्री पकडण्याचे काम देण्यात आले आहे. त्यांच्यावर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने समस्या वाढत आहेत. याबाबत योग्य उपाययोजना कराव्यात व भटक्या कुत्र्यांचे होणारे हल्ले रोखण्यासाठी नियोजन करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.