शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
3
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
4
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
6
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
7
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
8
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
9
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
10
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
11
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
12
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
13
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
14
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
15
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
16
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
17
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
18
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
19
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
20
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश

गटबाजी, कुरघोड्या शमविण्याचे आव्हान

By admin | Updated: June 8, 2015 05:20 IST

शहरपातळीवरील अंतर्गत हेवेदावे, कुरघोड्या, गटबाजी शमविण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षासमोर आहे.

पिंपरी-चिंचवड - वार्तापत्रविश्वास मोरेशहरपातळीवरील अंतर्गत हेवेदावे, कुरघोड्या, गटबाजी शमविण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षासमोर आहे. हे अंतर्गत हेवेदावे आणि गटबाजी मोडीत काढण्यात पक्षांच्या नेत्यांना यश मिळाले नाही, तर येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत वैयक्तिक राजकारणाचा फटका पक्षास बसल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांना स्थानिक नेते, कार्यकर्ते, विविध गटांची मोट बांधण्यासाठी जोर लावावा लागणार आहे. पक्षप्रमुखांनाही या शहरात जातीने लक्ष द्यावे लागणार आहे. विविध प्रांतातील लोकांमुळे शहरास मिनी इंडिया म्हणून लौकिक प्राप्त झाला आहे. मात्र, प्रमुख पक्षांचे राजकारण स्थानिक नेत्यांभोवती फिरत असते. विकासाऐवजी गावकी-भावकी, नातीगोती, व्यक्तिद्वेषाचे राजकारण केले जाते. पक्षाला मोठे न मानता एकमेकांना शह देण्याची फोफावलेली वृत्ती यामुळे शहरातील प्रमुख पक्षांत मतभेद उफाळून येण्याचा अनुभव शहरवासीयांना येतो. त्यामुळे भविष्यात स्थानिक नेत्यांना कार्यपद्धती बदलावी लागणार आहे. २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत सर्वच पक्षांना जोर लावावा लागेल. कठोर भूमिका घेण्याची गरजमहापालिकेत राष्ट्रवादीची एकमुखी सत्ता आहे. मात्र, वर वर दिसणारे हे चित्र तितकेसे खरे नाही. बंडखोर वृत्तीला प्रोत्साहन देण्याचा पॅटर्न आता बदलावा लागणार आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना स्थानिक पातळीवरील गटबाजी मोडीत काढण्यासाठी कठोर व्हावे लागणार आहे. आमदार लक्ष्मण जगताप भाजपात गेल्याने चिंचवडमधील राष्ट्रवादीची ताकत कमी झाली आहे. भाजपला ती मिळाली आहे. माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे हेही कमालीचे नाराज आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीचे नगरसेवक आमदार महेश लांडगे यांनी अपक्ष म्हणून यश मिळविले. त्यामुळे ते नक्की भाजपबरोबर की राष्ट्रवादीबरोबर हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे वर वर दिसत असलेली राष्ट्रवादीची ताकत कमी झाली आहे. जगतापांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीने संजोग वाघेरे यांना शहराध्यक्षपद दिले, अशी चर्चा शहरात आहे. मात्र, राष्ट्रवादीतील बंडखोर वृती थोपविण्यासाठी, सक्षम नेतृत्व म्हणून सिद्ध करण्यासाठी वाघेरे यांना मेहनत घ्यावी लागणार आहे. स्थानिक नेत्यांची एकजूट करण्यासाठी परिश्रम घ्यावे लागणार आहे. आमदार जगतापांच्या रूपाने सक्षम असे नेतृत्व भाजपला मिळाले आहे, तसेच राज्यसभेच्या माध्यमातून ज्येष्ठ कार्यकर्ते अमर साबळे यांना संधी मिळाली आहे. सचिन पटवर्धन यांनाही राज्य मंत्रिपदाचा दर्जा असणारे पद मिळाले आहे. त्यामुळे भाजपमध्ये कमालीचा उत्साह आहे. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेमध्ये फारसा उत्साह नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा सोडून इतर पक्षांना आपली ताकत वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.-----------ताकत देण्याची गरजएकेकाळी वर्चस्व असणाऱ्या काँग्रेसची महापालिकेतील सध्याची अवस्था गंभीर होत आहे. प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यानंतर येथील काँग्रेसला कोणीही वाली राहिलेला नाही. मोरे सरांनंतर सत्ता असूनही विविध मंडळे, प्राधिकरण यावरून कोणतीही मोठी पदे दिली गेली नाही. त्यामळे कार्यकर्ते नाराज आहेत. परिणामी पक्ष वाढण्याऐवजी ताकत कमी होत चालल्याचे दिसून येते. राज्य किंवा देश पातळीवरील नेत्यांनी या शहराकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. गटबाजी, आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरूच आहे. गटबाजी, हेवेदावे कमी झालेले नाहीत. माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि शहराध्यक्ष सचिन साठे यांच्यातील शाब्दिक जुगलबंदी थांबलेली नाही.