शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

चाळकवाडी टोलनाका ग्रामस्थांनी केला बंद, जिल्हाधिका-यांना निवेदन, बेकायदा टोलवसुलीला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 23:47 IST

चाळकवाडी येथील टोलनाक्यावर रविवारी (दि. १७) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास विविध मागण्यांसाठी आमदार शरद सोनवणे व चाळकवाडी ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

पिंपळवंडी : चाळकवाडी येथील टोलनाक्यावर रविवारी (दि. १७) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास विविध मागण्यांसाठी आमदार शरद सोनवणे व चाळकवाडी ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी नागरिकांनी जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत टोलनाका बंद ठेवण्याची मागणी करत टोलनाक्याचे कामकाज बंद करण्यात आले. याबाबत विविध मागण्यांचे लेखी निवेदन जिल्हाधिका-यांना पाठविण्यात आले आहे.पुणे-नाशिक महामार्गावर चाळकवाडी टोलनाका २१ फेब्रुवारी २०१७ ला सुरू करण्यात आल्यामुळे वाहनचालकांमधून नाराजी व्यक्त केली जात होती. परंतु राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने महामार्गांचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून, नियमानुसार टोलनाका सुरू करण्यात आला असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावेळी नागरिकांनी हा टोलनाका सुरू करण्यास काही नागरिकांनी विरोध केला होता. पुणे-नाशिक महामार्गाचे आळेखिंड ते राजगुरुनगर या दरम्यान असलेली बाह्यवळणे व पुलाची कामे अद्यापही अर्धवट स्थितीत आहेत, तर अनेक शेतकºयांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. ज्या ठिकाणी जुन्या महामार्गाचा वापर होत आहे, त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत हे खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात एखाद्याचा बळी जाऊ शकतो, असे असतानाही टोल प्रशासनाने टोलनाका सुरू करून टोलवसुली सुरू केली होती. येथील शेतकºयांनी हा टोलनाका करण्यास सुरुवातीपासूनच विरोध केला होता. परंतु येथील स्थानिक शेतक-यांचा विरोध डावलून हा टोलनाका सुरू करण्यात आला. हा टोलनाका सुरू झाल्यानंतर जुन्नर तालुक्यातील नागरिकांना टोलमधून वगळण्यात आले होते. मात्र, स्थानिक नागरिकांकडूनही टोलवसुली सुरू करण्यात आल्यामुळे स्थानिक वाहनचालकांनीही यास विरोध केला होता. सहा महिने होऊनही आश्वासन पाळले गेले नसल्यामुळे आमदार शरद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली येथील ग्रामस्थांनी आंदोलन करून टोलनाका बंद केला.बाधित शेतक-यांचे नुकसानभरपाईचे पैसे न्यायालयात गेले असल्यामुळे अजूनही त्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. तसेच, महामार्गाची अनेक ठिकाणी कामे अपूर्ण असून, ही कामे पूर्ण झाल्याशिवाय व बाधित शेतक-यांना नुकसानभरपाई मिळाल्याशिवाय टोलनाका सुरू करून देणार नाही.- शरद सोनवणे, आमदार, जुन्नर तालुकाटोलनाका प्रशासनाने चाळकवाडी ग्रामस्थ व बाधित शेतक-यांचे प्रश्न तीन महिन्यांमध्ये सोडविण्याचे आश्वासन टोलनाका प्रशासनाने दिले होते. मात्र, सहा महिने होऊनही हे आश्वासन पाळले गेले नाही,, त्यामुळे आम्हा ग्रामस्थांना आंदोलन करावे लागत आहे.- प्रदीप चाळक, बाधित शेतकरीटोलनाक्याचे काम करत असताना महामार्गाच्या कडेला गटारे न काढल्यामुळे पावसाचे पाणी घरात जात आहे, तर टोलनाक्याजवळ साचणारे पावसाचे पाणी शेतात काढून दिल्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे, त्यामुळे आमच्या अडचणी दूर झाल्यानंतरच टोलनाका सुरू केला जाईल.- अर्चना संजय चाळक, बाधित शेतकरीआमची घरे महामार्गालगत असल्याने वाहनांच्या ध्वनी आणि वायू प्रदूषणामुळे त्रास होत आहे, तसेच माझ्या हॉटेलची नुकसानभरपाई अद्याप मिळाली नसल्यामुळे दुसरा व्यवसाय सुरू करू शकत नाही, त्यामुळे आमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन बंद झाले आहे, जोपर्यंत नुकसानभरपाई मिळत नाही तोपर्यंत टोलनाका सुरू करून देणार नाही.- योगेश चाळक, बाधित शेतकरी