शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

एकाची ठेव पावती दुसऱ्याच्या कर्ज खात्यात वर्ग करण्याचा उद्योग ; 'बीएचआर' पतसंस्थेतला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 14:13 IST

प्रतिज्ञापत्रावर सुरू आहे कारभार, ठेवीदार संघटनेचा विरोध

ठळक मुद्देरिझर्व्ह बँकेकडून पतसंस्थेवर १६०० कोटी रुपयांच्या अनियमिततेसाठी कारवाई

पिंपरी : गेल्या काही वर्षांपासून भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेत हजारो खातेदारांचे पैसे अडकले आहेत. ज्यांच्या पत संस्थेत ठेवी आहेत त्यांना दुसऱ्याच्या कर्ज खात्यात प्रतिज्ञापत्रावर पैसे भरण्याची मुभा दिली जात आहे. या प्रकारामध्ये मूळ ठेवीदाराच्या हाती तीस पस्तीस टक्के रक्कम थोपवली जात असल्याचा आरोप बीएचआर ठेवीदार समितीने केला आहे. 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बीएचार संस्थेवर १६०० कोटी रुपयांच्या अनियमिततेसाठी अवसायनाची कारवाई केली आहे. बँकेच्या राज्यभरात विविध ठिकाणी २६४ शाखा आहेत. बँकेवर ऑक्टोबर २०१५ साली अवसायकाची नेमणूक करण्यात आली. ठेवीदारांचे पतसंस्थेत कोट्यवधी रुपये अडकले आहेत. त्यामुळे एखाद्या ठेवीदाराचे पैसे दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात भरुन घेतले जात आहे. त्यासाठी प्रतिज्ञा पत्राचा आधार घेतला जात आहव. जनसंग्रामचे संस्थापक व ठेवीदार समितीचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठेवीदार समितीचे सचिव दीपक मांडोळे, शिवराम चौधरी, खेमचंद्र पाटील व सतिश राणे यांच्या शिष्टमंडळाने बीएचआर संस्थेचे अवसायक जितेंद्र कंडारे यांची भेट घेऊन कर्ज खात्यावर इतर ठेवीदारांचे पैसे वर्ग करू नका अशी मागणी केली. ठेवीदारांना शेकडा तीस ते ३५ रुपये देऊन त्यांचे पैसे कर्ज खात्यात वर्ग करून ठेवीदारांची लूट केली जात असल्याचा आरोप संघटनेने केला.

ठाकरे म्हणाले , पतसंस्थेकडे ठेवीदारांच्या सातशे कोटी रुपयांच्या ठेवी असून, तितकीच कर्ज आहेत. त्यातील पाचशे कोटींहून अधिक कर्ज चांगली आहेत. शिवाय कर्जावर व्याजासह पैसे मिळतील. दोषी संचालकांवर आर्थिक जबाबदारी निश्चित करण्याची कार्यवाही सुरू आहे. सांचालकांनी त्या प्रमाणे पैसे न भरल्यास त्यांना जामीन मिळणार नाही. त्यामुळे ठेवीदारांनी थोडा संयम बाळगावा. कोणाच्याही प्रलोभनाला बळी पडून आपल्या ठेवी नुकसान सोसून देऊ नका. ----------काय आहे कर्ज वर्ग करण्याचे प्रतिज्ञा पत्र

ठेवीदाराला आपल्या ठेवींचा सर्व तपशील, ठेव पावती क्रमांक, त्याची रक्कम प्रतिज्ञा पत्रात नमूद करावी लागते. या ठेवी अमुक व्यक्तीच्या कर्ज खात्यात भरण्यास अथवा वर्ग करण्यास हरकत नसल्याचे शपथ पत्रात नमूद करावे लागते. ठेवीदारांच्या अगतिकतेचा फायदा घेऊन हे व्यवहार केले जात असल्याचा दावा ठेवीदार समितीने केला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडbankबँकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकfraudधोकेबाजी