शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

पाच वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला आला वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 01:31 IST

गेल्या पाच वर्षांपासून महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरण यांच्या वादात रावेत ते चिंचवड जुना जकात नाका रस्त्यावरील रखडलेल्या पुलाचे काम प्रशासनाने पुन्हा सुरू केले.

- अतुल क्षीरसागररावेत - गेल्या पाच वर्षांपासून महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरण यांच्या वादात रावेत ते चिंचवड जुना जकात नाका रस्त्यावरील रखडलेल्या पुलाचे काम प्रशासनाने पुन्हा सुरू केले़ वाल्हेकरवाडी गावठाणापासून ते ओढ्यापर्यंतच्या जागेचे संपादन झालेले नाही. रस्त्याला बाधित ठरणारी घरे एक वर्षांपूर्वी जमीनदोस्त करून रस्त्यासाठी आवश्यक असणारी जागा ताब्यात घेऊन अर्धवट रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे.चिंचवड जकात नाका ते रावेत हा रस्ता वाल्हेकरवाडीमधून जात असून, या रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत होते. त्या हा रस्ता चिंचवड जुना जकात नाका येथून सुरुवात होऊन पुढे रावेत प्राधिकरणाला मिळतो़ पुणे-मुंबई जाणाऱ्या लोकांसाठी सोईस्कर मार्ग आहे़ या रस्त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे़ या रस्त्याचे काम जवळपास सात वर्षांपासून सुरु आहे़ नवनगर विकास प्राधिकरणातील हद्दीतील रस्त्याच्या कामाला सुरुवात होऊन ३१ डिसेंबर २०१४ रोजी पूर्ण झाले़ तेथून पुढील रस्त्यासाठी आवश्यक असणारे भूसंपादन महापालिकेकडून न झाल्यामुळे हा रस्ता अर्धवट अवस्थेत होता. या रस्त्याचा पूर्ण खर्च महानगरपालिका करणार होती; पण त्याची काही हद्द प्राधिकरणाच्या हद्दीत येत असल्यामुळे हा रस्ता प्राधिकरणाकडे सोपविण्यात आला. या रस्त्याची पूर्ण लांबी ३.१५ किमी व रुंदी ३४.५ मी. असून प्राधिकरणाच्या हद्दीतील २.६३ किमी लांबी आणि अर्धा पूल बांधून पूर्ण झाले असून, महानगरपालिकेच्या हद्दीतील वाल्हेकरवाडी येथील सुमारे ४०० मीटर पेक्षा जास्त जागेच्या भूसंपादनाचे काम अपूर्ण राहिले होते. त्यामुळे हा रस्ता खुला करण्यात आला नाही.रस्त्यासाठी जवळपास ३७ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, आतापर्यंत सुमारे १७ ते १८ कोटी रुपये खर्च झाला आहे. प्राधिकरणाच्या हद्दीतील रस्ता पूर्ण झाला असून, तो वापरण्यायोग्य आहे असेही जाहीर करण्यात आले आहे व प्राधिकरणाची जबाबदारी त्यांनी पार पडली आहे. आता पालिकेच्या जबाबदारी असल्यामुळे त्यांच्याकडून काम होण्याची प्रतीक्षा नागरिकांना लागून राहिली होती. विकास आराखड्यानुसार रावेत ते चिंचवड जकात नाका मार्गावरील वाल्हेकरवाडी गावठाण ते नाल्यापर्यंतचा भाग नवनगर प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतो या मार्गावरील २०० मीटर जागेचा ताबा अद्यापही प्रशासनाकडे नाही.सब-वेचे काम प्रगतिपथावरया रस्त्यालगत असणाऱ्या एकवीरा कॉलनी, शिवतीर्थ कॉलनी, नंदनवन या कॉलनीतील रहिवाशांना ये-जा करण्यासाठी येथे निर्माण होत असलेल्या पुलाखाली सब-वेची निर्मिती करण्यात येत आहे़ त्याचे काम प्रगतिपथावर आहे़ हा सब-वे पूर्ण झाल्यानंतर येथील रहिवाशांना रावेत आणि अन्य ठिकाणी ये-जा करण्यासाठी उपयोग होणार आह़ेमागील अनेक वर्षांपासून परिसराचा महापालिकेत समावेश करण्यात आला होता़ परंतु परिसराचा म्हणावा तसा विकास झाला नव्हता़ आत्ता कोठे विकासाच्या दृष्टीने सुरुवात झाली आहे़ प्रशस्त रस्त्यांची निर्मिती होत असल्याने विकासाच्या दृष्टीने अनेक वर्षे मागास राहिलेला भाग आता विकसित होत आहे. महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरणाच्या वादात रस्त्याचे काम रखडल्यामुळे परत परिसर विकासापासून वंचित राहतो की काय असा प्रश्न नागरिकांच्या समोर होता़ परंतु आता मात्र तो प्रश्न सुटला आहे. - विनोद राठोड, सामाजिक कार्यकर्तेविकासाची गंगा परिसरात येत असताना प्रशस्त रस्त्यांमुळे परिसराची वेगळी ओळख निर्माण झाली आहे़ परिसरात अनेक नामवंत शिक्षणिक संस्था आहेत़ त्यातच चांगल्या सुविधा प्रशासनाच्या वतीने पुरवत असताना हद्दीचा वाद महापालिका प्रशासन आणि प्राधिकरण प्रशासनाने आपापसात सोडवल्यामुळे अर्धवट अवस्थेत असणारे रस्त्याचे काम मार्गी लागत आहे.- आबा वाल्हेकर,अध्यक्ष, एकवीरा सेवा संघ

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड