शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

झुडपांत ‘स्वच्छ’चे फलक , सुशोभीकरणाबाबत उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 03:06 IST

थेरगाव येथील डीपी रस्त्याच्या मधोमध असलेल्या उच्चदाब वीजवाहिनीच्या टॉवरखाली झाडेझुडपे वाढली आहेत. याच झुडपांवर ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अभियानाचे फलक लावण्यात आला आहेत.

थेरगाव - येथील डीपी रस्त्याच्या मधोमध असलेल्या उच्चदाब वीजवाहिनीच्या टॉवरखाली झाडेझुडपे वाढली आहेत. याच झुडपांवर ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अभियानाचे फलक लावण्यात आला आहेत. त्यामुळे या अभियानाबाबत महापालिका प्रशासन किती गंभीर आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. झुडपांमुळे येथे अपघाताचा धोका आहे. या रस्त्याच्या दुभाजकांमध्ये सुशोभीकरणासाठी लावण्यात आलेली झाडे सुकली आहेत. काही झाडे गायब झाली आहेत. महापालिकेचे याकडे दुर्लक्ष आहे.थेरगाव गावठाणातून राघवेंद्र स्वामी मठाकडे जाणाऱ्या डीपी रस्त्यावर उच्चदाब वीजवाहिनीचा टॉवर आहे. या टॉवरखाली झुडपे वाढली आहेत. या काटेरी झुडपांच्या फ ांद्या रस्त्यावर आल्या आहेत. त्यामुळे दुचाकीचालकांना या फांद्याचा अडथळा होतो. वाहनचालकांना येथे कसरत करावी लागते. त्यामुळे येथे अपघाताचा धोका आहे. तसेच हा टॉवर उच्चदाब वीजवाहिनीसाठी असल्याने या झुडपांमुळे येथील सुरक्षेस बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. झुडपांमुळे वाहनचालकांना विरुद्ध दिशेकडून येणारी वाहने सहज दिसून येत नाहीत. त्यामुळे येथे अपघातही झाले आहेत.शहरात सर्वत्र रस्ता दुभाजकांमध्ये सुशोभीकरणासाठी आणि वातावरण प्रदूषण मुक्त राहण्यासाठी प्रशासनाने झाडे लावली आहेत. नुसती झाडे लावण्यापुरतीच मोहीम न राबवता ती लावलेली झाडे जगविणेसुद्धा महत्त्वाचे आहे. पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपाययोजना करून प्रशासन स्वत:ची पाठ थोपटून घेते. मात्र त्यानुसार अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे नागरिक नाराज आहेत.थेरगाव गावठाणातील या डीपी रस्त्यावरील टॉवरखालील झुडपे हटवून तेथे वाहनचालकांसाठी सूचना फलक लावणे आवश्यक आहे. मोठे रिफ्लेक्टर लावण्याची आवश्यकता आहे. अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत. डीपी रस्त्याच्या दुभाजकांमध्ये नव्याने फुलझाडे आणि शोभेची झाडे लावणे आवश्यक आहे. वेळोवेळी पाणी न दिल्याने सध्याची फुलझाडे आणि अन्य झाडे सुकली आहेत. महापालिकेचा उद्यान आणि अन्य विभागांनी याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे. संबंधित कर्मचारी आणि अधिकारी याबाबत उदासीन आहेत. त्यांना संबंधितांकडून सूचना होऊन दुभाजकांचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.अभियानाला महापालिकेकडूनच हरताळस्वच्छ आणि सुशोभित शहर या संकल्पनेनुसार केंद्र सरकारकडून स्वच्छ शहर अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी सर्वेक्षण करण्यात येते. या अभियानाबाबत जनजागृती होण्यासाठी या सर्वेक्षणाचे फलक शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. असाच एक फलक या टॉवरखालील झुडपांवर लावण्यात आला आहे. हा फलक लावताना महापालिकेच्या कर्मचाºयांनी किंवा अधिकाºयांनी झुडपे हटविण्याची तसदी घेतलेली नाही. त्यामुळे जेथे सुशोभीकरणाला आणि स्वच्छतेला बाधा निर्माण होत आहे़ तेथेचे या अभियानाबाबतचे फलक लावण्यात आले आहेत. महापालिका प्रशासनालाच या स्वच्छ सर्वेक्षणाबाबत गांभीर्य नसल्याचे दिसून येते. परिणामी शहर सुशोभीकरणाला महापालिकेकडूनच हरताळ फासण्यात येत आहे.दुभाजक झाले भकासदुभाजकांमध्ये शोभेची झाडे लावून शहर सुशोभीकरण करण्यात येत आहे. असे असले तरी बहुतांश ठिकाणी याबाबत उदासीनता दिसून येते. थेरगाव गावठाणातील या डीपी रस्त्याच्या दुभाजकांमध्ये झाडे लावण्यात आली आहेत. मात्र या झाडांची निगा राखण्यात आलेली नाही. परिणामी दुभाजकातील झाडे सुकली आहेत. काही झाडे मोडून आणि तुटून पडली आहेत. त्यामुळे बरीचशी झाडे दुभाजकांतून गायब झाली आहेत. या परिस्थितीमुळे सुशोभीकरण करण्यात येणारे दुभाजक भकास झाले आहेत.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड