शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पाणीकपात मागे

By admin | Updated: June 13, 2017 04:17 IST

पावसाळा सुरू झाल्याने पिंपरी-चिंचवडमधील दिवसाआड पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. शहरात मंगळवारपासून नियमित पाणी पुरवठा करण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पावसाळा सुरू झाल्याने पिंपरी-चिंचवडमधील दिवसाआड पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. शहरात मंगळवारपासून नियमित पाणी पुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी दिली.शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणात ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने महाराष्ट्र दिनानंतर दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतला होता. पवना धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही पाणी कपातीसाठी आग्रही असणाऱ्या महापौरांना विरोधकांनी लक्ष्य केले होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाणीकपातीला विरोध केला होता. टँकर लॉबीसाठी पाणीकपात केली जात आहे, असा आरोप केला होता. पाऊस लांबणीवर पडल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, म्हणून पाणीकपात केल्याचे महापौरांनी सांगितले होते. पाऊस सुरू झाल्यास कपात मागे घेऊ,असेही जाहीर केले होते. गेल्या दोन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. याबाबत महापालिकेत सोमवारी बैठक घेण्यात आली. या वेळी सभागृहनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे, आयुक्त श्रावण हर्डीकर, पाणी पुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रवींद्र दुधेकर, कार्यकारी अभियंता रामदास तांबे, प्रवीण लडकत आदी उपस्थित होते.एकनाथ पवार म्हणाले, ‘‘एक महिन्यापूर्वी पाणीकपात केली होती. महिनाभरामध्ये चार टक्के पाणी वाचले आहे. सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. आज धरणात २३ टक्के पाणीसाठा आहे. आगामी काळात पावसाने ओढ दिल्यास पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये. यासाठी पाणीकपात करणे गरजेची आहे. त्यामुळे दहा टक्के पाणीकपात कायम ठेवण्यात येणार आहे. मंगळवारपासून शहरवासीयांना दररोज एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.’’पवना धरणात ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने एक महिन्यापूर्वी म्हणजेच २ मेपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला होता. पावसाला सुरुवात झाली आहे. धरणात २३ टक्के पाणीसाठा आहे. परंतु, पावसाने ओढ दिल्यावर पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये यासाठी केवळ १० टक्के पाणीकपात कायम ठेवून मंगळवापासून नियमित एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा.- नितीन काळजे, महापौर