शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पवना आंदोलनातील शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे, मंत्रिगटाची मान्यता    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 03:58 IST

मावळातील पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधातील आंदोलनात सहभागी शेतकºयांवरील गुन्हे मागे घेण्याच्या विषयाला मंगळवारी मान्यता देण्यात आली. अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगटाच्या उपसमितीने निर्णय घेतला आहे.

तळेगाव दाभाडे : मावळातील पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधातील आंदोलनात सहभागी शेतकºयांवरील गुन्हे मागे घेण्याच्या विषयाला मंगळवारी मान्यता देण्यात आली. अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगटाच्या उपसमितीने निर्णय घेतला आहे. आता लवकरच शासनाकडून आदेश काढण्यात येणार आहेत.पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधात ९ आॅगस्ट २०११ रोजी आंदोलन झाले होते. त्या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन आंदोलक शेतकºयांना प्राण गमवावे लागले. या घटनेस बुधवारी सहा वर्षे उलटत असले तरी शहीद शेतकरी कुटुंबावरील दु:खाचा व्रण अजूनही तसेच आहेत. मात्र, क्रांतिदिनाच्या पूर्वसंध्येला गुन्हे मागे घेण्याचा निर्णय होणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते.शेतकºयांवर राष्ट्रीय महामार्ग कायदा कलम (ब) क्रिमिनल अ‍ॅमेंडमेंट अ‍ॅक्ट ७ सह सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या वेळी ३०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. आजही तालुक्याचे राजकारण पवना बंदिस्त जलवाहिनी व गोळीबारप्रकरणा भोवती फिरत आहे. गुन्हे मागे घेऊन बळीराजाला न्याय मिळालच पाहिजे, अशी मावळवासीयांची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे.आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी सुधीर मुनगुंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगटाची उपसमिती नेमण्यात आली होती. त्या समितीमध्ये सर्व खात्याचे सचिव होते. तसेच गृहराज्यमंत्र्यांचा समावेश आहे. या समितीबरोबर जानेवारीमध्ये बैठक झाली होती. त्या अनुषंगाने शेतकºयांवरील गुन्हे मागे घेण्याविषयीच्या निर्णयाला मंगळवारी मुंबईत झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.बाळा भेगडे, आमदार, मावळउशिरा का होईना मिळाला न्याययेळसे : तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार राजू शेट्टी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, आमदार नीलम गोºहे, माजी मंत्री एकनाथ खडसे असे दिग्गज नेते मावळमध्ये मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन करून गेले. या वेळी मुख्यमंत्र्यांनी या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत घेण्याचे आश्वासन दिले होते. आता उशिरा म्हणजे चार वर्षांनी का होईना मृतांच्या वारसांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरी मिळाली.