शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
4
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
5
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
6
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
7
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
8
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
9
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
10
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
11
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
12
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
13
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
14
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
15
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
16
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
17
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
18
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
19
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
20
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश

पवना आंदोलनातील शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे, मंत्रिगटाची मान्यता    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 03:58 IST

मावळातील पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधातील आंदोलनात सहभागी शेतकºयांवरील गुन्हे मागे घेण्याच्या विषयाला मंगळवारी मान्यता देण्यात आली. अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगटाच्या उपसमितीने निर्णय घेतला आहे.

तळेगाव दाभाडे : मावळातील पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधातील आंदोलनात सहभागी शेतकºयांवरील गुन्हे मागे घेण्याच्या विषयाला मंगळवारी मान्यता देण्यात आली. अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगटाच्या उपसमितीने निर्णय घेतला आहे. आता लवकरच शासनाकडून आदेश काढण्यात येणार आहेत.पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधात ९ आॅगस्ट २०११ रोजी आंदोलन झाले होते. त्या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन आंदोलक शेतकºयांना प्राण गमवावे लागले. या घटनेस बुधवारी सहा वर्षे उलटत असले तरी शहीद शेतकरी कुटुंबावरील दु:खाचा व्रण अजूनही तसेच आहेत. मात्र, क्रांतिदिनाच्या पूर्वसंध्येला गुन्हे मागे घेण्याचा निर्णय होणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते.शेतकºयांवर राष्ट्रीय महामार्ग कायदा कलम (ब) क्रिमिनल अ‍ॅमेंडमेंट अ‍ॅक्ट ७ सह सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या वेळी ३०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. आजही तालुक्याचे राजकारण पवना बंदिस्त जलवाहिनी व गोळीबारप्रकरणा भोवती फिरत आहे. गुन्हे मागे घेऊन बळीराजाला न्याय मिळालच पाहिजे, अशी मावळवासीयांची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे.आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी सुधीर मुनगुंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगटाची उपसमिती नेमण्यात आली होती. त्या समितीमध्ये सर्व खात्याचे सचिव होते. तसेच गृहराज्यमंत्र्यांचा समावेश आहे. या समितीबरोबर जानेवारीमध्ये बैठक झाली होती. त्या अनुषंगाने शेतकºयांवरील गुन्हे मागे घेण्याविषयीच्या निर्णयाला मंगळवारी मुंबईत झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.बाळा भेगडे, आमदार, मावळउशिरा का होईना मिळाला न्याययेळसे : तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार राजू शेट्टी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, आमदार नीलम गोºहे, माजी मंत्री एकनाथ खडसे असे दिग्गज नेते मावळमध्ये मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन करून गेले. या वेळी मुख्यमंत्र्यांनी या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत घेण्याचे आश्वासन दिले होते. आता उशिरा म्हणजे चार वर्षांनी का होईना मृतांच्या वारसांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरी मिळाली.