शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

गावी जाताय, चोरट्यांपासून सावधान! पोलिसांतर्फे सतर्कतेचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 01:52 IST

दिवाळीच्या सुटीत घर बंद ठेवून अनेकजण आपापल्या मूळ गावी जातात. परंतु गावी जात असताना चोरी होणार नाही, याची योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पिंपरी : दिवाळीच्या सुटीत घर बंद ठेवून अनेकजण आपापल्या मूळ गावी जातात. परंतु गावी जात असताना चोरी होणार नाही, याची योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.सुटीच्या काळात अनेक दिवस घर बंद ठेवून गावी जात असताना, शेजाऱ्यांना याबाबत कल्पना द्यावी. अधिक कालावधीसाठी गावी जायचे असेल, तर रोख रक्कम, तसेच मौल्यवान वस्तू, दागिने घरात ठेवून जाऊ नये. तीन ते चार दिवसांपेक्षा अधिक दिवस सलग घर बंद असेल, तर चोरटे अशा घरांवर पाळत ठेवतात. बंद घर असलेल्या परिसरातील आणखी काही लोक त्याच कालावधीत गावी गेले असतील, तर चोरट्यांना चोरी करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध होत असते. सोसायटीतील एखाद-दुसरे कुटुंब काही दिवसांसाठी बाहेरगावी गेले असेल, तर बंद घर असल्याचे सहज लक्षात येत नाही. परंतु एकाच वेळी सोसायटीतील अनेक सदनिका बंद असतील, तर त्या ठिकाणी चोरी होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे शेजाºयांना कल्पना देऊन, तसेच आपण ज्या ठिकाणी जात आहे, त्या ठिकाणाची माहिती सोसायटीच्या व्यवस्थापकास द्यावी. अनोळखी रखवालदारावर विश्वास ठेवू नये. त्यांना कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नये. ही दक्षता घेतल्यास बंद सदनिकांतील चोरीच्या घटना टाळता येतील.सोशल मीडियावर फोटोव्हायरल करण्याचे टाळावेमूळ गावी अथवा पर्यटनाला गेल्यास लगेच प्रत्येक क्षणी आपले फोटो व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा समाजमाध्यमांवर अपलोड करण्याचे टाळावे, असेही पोलिसांनी सूचित केले आहे. पर्यटन स्थळी अथवा गावी गेले असल्यास कुटुंबासह तेथील छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित केल्यास चोरट्यांना त्याची माहिती मिळते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड