शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

पालिकेच्या अनिर्बंध पाणी उपशावर बंदी, राज्य शासनाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 02:31 IST

महापालिकेकडून सुरू असलेल्या अनिर्बंध पाणी उपशावर राज्य सरकारने मनाई केली आहे. पवना नदीपात्रातून ५०० एमएलडी नव्हे, तर ४७० एमएलडीच दैनंदिन पाणी उपसा करा

पिंपरी : महापालिकेकडून सुरू असलेल्या अनिर्बंध पाणी उपशावर राज्य सरकारने मनाई केली आहे. पवना नदीपात्रातून ५०० एमएलडी नव्हे, तर ४७० एमएलडीच दैनंदिन पाणी उपसा करा, असा आदेश राज्य सरकारने पालिकेला दिला आहे. त्यामुळे शहराची पाणी समस्या तीव्र होण्याची शक्यता आहे.शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्या विषयी सत्ताधारी आणि विरोधकांनीही स्थायी समितीत नाराजी व्यक्त केली होती. त्याविषयी आयुक्त हर्डीकर म्हणाले, ‘‘शहर वेगाने वाढत आहे. पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, चिंचवड, चिखली, वाकड परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे पाणी कमी पडत आहे. त्यासाठी अधिकचे ५०एमएलडीपाणी उचलणे गरजेचे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शहरासाठी ४७० एमएलडी पाणी उचलले जात आहे. काही दिवसांपासून रोज ५०० एमएलडी पाणी उचलले जात होते. परंतु, राज्य सरकारने जेवढे पाणी निश्चित केले आहे. तेवढेच उचला, असे आदेश दिले आहेत.पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन जुनी झाली आहे. नळजोड नादुरुस्त झाले आहेत. अनधिकृत नळजोडणी अधिक आहे. ते तोडण्यात येणार आहेत. पाइपलाइन दुरुस्त झाल्यास गळीत थांबून शहराची तहान भागू शकते.अनधिकृत नळजोड अधिकृत करण्यासाठी पॉलिसी आणण्याचे काम सुरू आहे. पुणे महापालिकेतर्फे वाघोलीतील पाणी योजनेचानवीन प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. तात्पुरत्या स्वरूपात वाघोलीतून दिघी, मोशी, चिखली परिसरासाठी पाणी आणण्याचे नियोजन आहे. शहराच्या काही भागात पाण्याची टंचाई आहे. पाण्याचे नियोजन कोलमडले, की पाण्याची समस्या उद्भवते. पाणी उपलब्धता वाढविणे मोठे आव्हान आहे.