शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पालिकेच्या अनिर्बंध पाणी उपशावर बंदी, राज्य शासनाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 02:31 IST

महापालिकेकडून सुरू असलेल्या अनिर्बंध पाणी उपशावर राज्य सरकारने मनाई केली आहे. पवना नदीपात्रातून ५०० एमएलडी नव्हे, तर ४७० एमएलडीच दैनंदिन पाणी उपसा करा

पिंपरी : महापालिकेकडून सुरू असलेल्या अनिर्बंध पाणी उपशावर राज्य सरकारने मनाई केली आहे. पवना नदीपात्रातून ५०० एमएलडी नव्हे, तर ४७० एमएलडीच दैनंदिन पाणी उपसा करा, असा आदेश राज्य सरकारने पालिकेला दिला आहे. त्यामुळे शहराची पाणी समस्या तीव्र होण्याची शक्यता आहे.शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्या विषयी सत्ताधारी आणि विरोधकांनीही स्थायी समितीत नाराजी व्यक्त केली होती. त्याविषयी आयुक्त हर्डीकर म्हणाले, ‘‘शहर वेगाने वाढत आहे. पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, चिंचवड, चिखली, वाकड परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे पाणी कमी पडत आहे. त्यासाठी अधिकचे ५०एमएलडीपाणी उचलणे गरजेचे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शहरासाठी ४७० एमएलडी पाणी उचलले जात आहे. काही दिवसांपासून रोज ५०० एमएलडी पाणी उचलले जात होते. परंतु, राज्य सरकारने जेवढे पाणी निश्चित केले आहे. तेवढेच उचला, असे आदेश दिले आहेत.पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन जुनी झाली आहे. नळजोड नादुरुस्त झाले आहेत. अनधिकृत नळजोडणी अधिक आहे. ते तोडण्यात येणार आहेत. पाइपलाइन दुरुस्त झाल्यास गळीत थांबून शहराची तहान भागू शकते.अनधिकृत नळजोड अधिकृत करण्यासाठी पॉलिसी आणण्याचे काम सुरू आहे. पुणे महापालिकेतर्फे वाघोलीतील पाणी योजनेचानवीन प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. तात्पुरत्या स्वरूपात वाघोलीतून दिघी, मोशी, चिखली परिसरासाठी पाणी आणण्याचे नियोजन आहे. शहराच्या काही भागात पाण्याची टंचाई आहे. पाण्याचे नियोजन कोलमडले, की पाण्याची समस्या उद्भवते. पाणी उपलब्धता वाढविणे मोठे आव्हान आहे.