शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-शिवसेनेत जुंपली, चिंचवडमध्ये नवीन गृहप्रकल्पांना बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 03:27 IST

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नवीन बांधकामांना बंदी घालण्याचा ठराव भाजपाने केला आहे. त्यावरून भाजपाचे नेते आणि शिवसेना नेत्यांमध्ये शुक्रवारी चांगलीच जुंपली.

पिंपरी - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नवीन बांधकामांना बंदी घालण्याचा ठराव भाजपाने केला आहे. त्यावरून भाजपाचे नेते आणि शिवसेना नेत्यांमध्ये शुक्रवारी चांगलीच जुंपली.‘‘वाकडला कलाटेबंधूंचे पाण्याचे टँकर आहेत. दादागिरी करण्यातच त्यांच्या पिढ्या गेल्या आहेत. त्यामुळेच बिल्डरधार्जिण्यांना पोटशूळ उठला आहे,’’ असा आरोप आमदार आणि भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी केला, तर चिंचवड मतदारसंघ कोणाची जहागिरी नाही. आमदारांनी दहशतीबाबत बोलणे हाच विनोद आहे, असे प्रत्युत्तर शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी दिले आहे.नवीन बांधकामांना बंदी घालण्याचा ठराव भाजपाने केला आहे. त्यात फक्त चिंचवडचाच समावेश असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. बिल्डरांकडून फंड वसुलीसाठी हे धोरण अवलंबल्याची टीका विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केली होती. त्या आरोपांना भाजपाने शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. त्यानंतर राहुल कलाटे यांनीही आरोप केले.दादागिरी करण्यात कलाटे बंधूंच्या पिढ्या गेल्या : लक्ष्मण जगतापगेल्या दहा वर्षांत चिंचवडला बांधकामे वाढली आहेत. त्याचा ताण सुविधांवर येत आहे. नागरिकांना दरडोई १३५ लिटर पाणी मिळणे आवश्यक आहे. पाण्याची कमतरता भासू नये. यामुळेच मोठ्या गृहप्रकल्पांना परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय आहे. आरोप करणारे बांधकाम व्यावसायिकांना ब्लॅकमेल करत होते. ठेकेदाराला, महापालिका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करतात. त्यांनी आजपर्यंत दादागिरी केली आहे. त्यांच्या पिढ्याच दादागिरी करण्यात गेल्या आहेत. भाजपाला फंडाची गरज नाही. प्रभागातील आरक्षणाचे ताबे पालिकेला देत नाहीत. अपयश झाकण्यासाठी बेछूट आरोप करून सवंग प्रसिद्धी मिळवितात, अशी टीका आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली.आमदारांनी दहशतीविषयी बोलणे मोठा विनोद : राहुल कलाटेवाकड येथील विकासकामांच्या भूमिपूजनानंतर आमदार बिथरले आहेत. शिक्षणाचा अभाव आहे. आमदार झाल्यावर ते बारावी पास झाले आहेत. व्हीजन नसल्याने कसलेही निर्णय घेत आहेत. एका मतदारसंघापुरती बंदी घालणे चुकीचे आहे. आमदारांनी दहशतीबाबत बोलणे म्हणजे हा मोठा विनोद आहे. दहशत म्हणजे काय असते हे देवकर, शितोळे यांना विचारले तर बरे होईल. माझा पाण्याचा टँकर असल्याचे आमदारांनी सिद्ध करून दाखवावे. ज्याची जास्त दहशत त्याला आमदारांकडून महत्त्वाचे पद दिले जाते, असा आरोप राहुल कलाटे यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपा