शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

भाजपा-शिवसेनेत जुंपली, चिंचवडमध्ये नवीन गृहप्रकल्पांना बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 03:27 IST

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नवीन बांधकामांना बंदी घालण्याचा ठराव भाजपाने केला आहे. त्यावरून भाजपाचे नेते आणि शिवसेना नेत्यांमध्ये शुक्रवारी चांगलीच जुंपली.

पिंपरी - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नवीन बांधकामांना बंदी घालण्याचा ठराव भाजपाने केला आहे. त्यावरून भाजपाचे नेते आणि शिवसेना नेत्यांमध्ये शुक्रवारी चांगलीच जुंपली.‘‘वाकडला कलाटेबंधूंचे पाण्याचे टँकर आहेत. दादागिरी करण्यातच त्यांच्या पिढ्या गेल्या आहेत. त्यामुळेच बिल्डरधार्जिण्यांना पोटशूळ उठला आहे,’’ असा आरोप आमदार आणि भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी केला, तर चिंचवड मतदारसंघ कोणाची जहागिरी नाही. आमदारांनी दहशतीबाबत बोलणे हाच विनोद आहे, असे प्रत्युत्तर शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी दिले आहे.नवीन बांधकामांना बंदी घालण्याचा ठराव भाजपाने केला आहे. त्यात फक्त चिंचवडचाच समावेश असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. बिल्डरांकडून फंड वसुलीसाठी हे धोरण अवलंबल्याची टीका विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केली होती. त्या आरोपांना भाजपाने शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. त्यानंतर राहुल कलाटे यांनीही आरोप केले.दादागिरी करण्यात कलाटे बंधूंच्या पिढ्या गेल्या : लक्ष्मण जगतापगेल्या दहा वर्षांत चिंचवडला बांधकामे वाढली आहेत. त्याचा ताण सुविधांवर येत आहे. नागरिकांना दरडोई १३५ लिटर पाणी मिळणे आवश्यक आहे. पाण्याची कमतरता भासू नये. यामुळेच मोठ्या गृहप्रकल्पांना परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय आहे. आरोप करणारे बांधकाम व्यावसायिकांना ब्लॅकमेल करत होते. ठेकेदाराला, महापालिका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करतात. त्यांनी आजपर्यंत दादागिरी केली आहे. त्यांच्या पिढ्याच दादागिरी करण्यात गेल्या आहेत. भाजपाला फंडाची गरज नाही. प्रभागातील आरक्षणाचे ताबे पालिकेला देत नाहीत. अपयश झाकण्यासाठी बेछूट आरोप करून सवंग प्रसिद्धी मिळवितात, अशी टीका आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली.आमदारांनी दहशतीविषयी बोलणे मोठा विनोद : राहुल कलाटेवाकड येथील विकासकामांच्या भूमिपूजनानंतर आमदार बिथरले आहेत. शिक्षणाचा अभाव आहे. आमदार झाल्यावर ते बारावी पास झाले आहेत. व्हीजन नसल्याने कसलेही निर्णय घेत आहेत. एका मतदारसंघापुरती बंदी घालणे चुकीचे आहे. आमदारांनी दहशतीबाबत बोलणे म्हणजे हा मोठा विनोद आहे. दहशत म्हणजे काय असते हे देवकर, शितोळे यांना विचारले तर बरे होईल. माझा पाण्याचा टँकर असल्याचे आमदारांनी सिद्ध करून दाखवावे. ज्याची जास्त दहशत त्याला आमदारांकडून महत्त्वाचे पद दिले जाते, असा आरोप राहुल कलाटे यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपा